शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला रोखण्याचे सर्वच पक्षांपुढे आव्हान!

By admin | Updated: February 20, 2017 01:25 IST

स्वबळावर बहुमताचा आकडा गाठणे हे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसमोरील, तर भाजपाला बहुमतापासून रोखणे हे इतर सर्वच राजकीय पक्षांसमोरील

रवी टाले / अकोलास्वबळावर बहुमताचा आकडा गाठणे हे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसमोरील, तर भाजपाला बहुमतापासून रोखणे हे इतर सर्वच राजकीय पक्षांसमोरील आव्हान असल्याचे चित्र, अकोला महानगरपालिकेत आहे. महापालिका स्थापनेपासून प्रथमच तुटलेली भगवी युती, ऐन निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवक पळवून राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली काँग्रेसची गोची, मजलीस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी व भारिप-बहुजन महासंघाच्या गोटात निर्माण झालेली चिंता आणि हद्दवाढीमुळे शहरात समाविष्ट झालेला ग्रामीण भाग व चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे बदललेली समीकरणे, या पार्श्वभूमीवर अकोला महापालिकेची चवथी निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. गेल्या निवडणुकीत बंडखोरी करून विजयी झालेल्या नगरसेवकांना सोबत घेऊन, अखेरच्या अडीच वर्षांत मनपाची सत्ता ताब्यात घेतलेल्या भाजपाने या वेळी स्वबळावर सत्तेत येण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे, तर काहीही करून ते होऊ न देण्याची इतर सर्वच पक्षांची रणनीती आहे; परंतु सर्वच पक्षांमध्ये रंगलेल्या अंतर्गत कलगीतुऱ्यांचा परिणाम, काही प्रभागांमध्ये अनपेक्षित निकाल लागण्यात होऊ शकतो आणि त्यामुळे सत्ता स्थापनेच्या समीकरणांमध्येही उलटफेर होऊ शकतो. महापालिका स्थापनेपासून प्रथमच भाजपा व शिवसेना स्वतंत्ररीत्या लढत असले तरी, उभय पक्षांची शहरातील प्रभावक्षेत्रे बव्हंशी वेगवेगळी असल्याने त्यांच्या संख्याबळावर युती तुटल्याचा फार परिणाम होण्याची शक्यता दिसत नाही; मात्र शिवसेनेतील बडे प्रस्थ असलेल्या गुलाबराव गावंडे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधल्याने शिवसेनेला तगडा झटका बसला आहे. त्यामधून सावरून मनपातील सत्तास्थापनेच्या खेळात निर्णायक खेळी करण्याइतपत संख्याबळ मिळविणे हे स्थानिक सेना नेतृत्वापुढील आव्हान आहे. गावंडेच्या राकाँ प्रवेशाचा निकालावर होणारा परिणाम अकोल्यातील स्थानिक राजकारणास नवे वळण देणारा ठरू शकतो. दुसरीकडे राकाँने काँग्रेसचे नगरसेवक पळवून त्यांना उमेदवारी दिल्याने उभय पक्षांमधील संबंध विकोपास गेले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर बसलेला हा झटका, स्थानिक नेत्यांमध्ये उफाळलेल्या संघर्षामुळे आधीच कमकुवत भासत असलेल्या काँग्रेस पक्षासाठी वर्मी बसलेला घाव ठरू शकतो. हे कमी की काय म्हणून, काँग्रेसची भिस्त असलेल्या अल्पसंख्याक मतपेढीवर नजर ठेवून असलेल्या एमआयएमनेही निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. मनपात खाते उघडण्याची अपेक्षा करीत असलेल्या एमआयएमचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, हे २३ फेब्रुवारीलाच स्पष्ट होणार असले तरी, तो पक्ष काँग्रेसचे संख्याबळ घटविण्यास नक्कीच हातभार लावू शकतो. नेमक्या याच कारणामुळे राकाँ आणि काही प्रमाणात भारिप-बमसंनेही एमआयएमची धास्ती घेतली आहे.