शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

सर्व गिरणी कामगारांना घरे मिळणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

By admin | Updated: May 10, 2016 04:14 IST

एकही गिरणी कामगार घरापासून वंचित राहणार नाही. मुंबईचा नवा विकास आराखडा येत असून, त्यात परवडणाऱ्या घरांसाठी अधिक जागा आरक्षित करण्यात आली आहे.

मुंबई : एकही गिरणी कामगार घरापासून वंचित राहणार नाही. मुंबईचा नवा विकास आराखडा येत असून, त्यात परवडणाऱ्या घरांसाठी अधिक जागा आरक्षित करण्यात आली आहे. या परवडणाऱ्या घरांमध्ये मोठा वाटा गिरणी कामगारांना मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सोमवारी गिरणी कामगारांच्या २ हजार ६३४ घरांची सोडत काढण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. आॅगस्टमध्ये गिरणी कामगारांसाठी एमएमआरडीएच्या २ हजार ४१८ घरांची लॉटरी काढण्याची घोषणा करून मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई महानगर क्षेत्रात विविध ठिकाणी ११ लाख घरे बांधण्याचे नियोजन सरकारने केले आहे. या नियोजनात गिरणी कामगारांना प्रमुख स्थान दिले जाईल. गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता म्हणाले की, आघाडी सरकारने १५ वर्षांत ६ हजार घरांचे वाटप केले. याउलट युती सरकारने अवघ्या दोन ) वर्षांमध्ये सुमारे पाच हजार घरे देण्याची वचनपूर्ती केली आहे. आॅगस्टमध्ये लॉटरी काढण्यात येणाऱ्या एमएमआरडीएच्या घरांची किंमत ६ लाख रुपये इतकी ठरवण्यात आली आहे. गिरणी कामगारांच्या कृती समितीसोबत चर्चा करून ही किंमत ठरवण्यात आल्याने कामगार नाराज होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मुंबईकरांसाठी जूनमध्ये ९७० घरांची सोडतमुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या स्वस्त घरांची सोडत जूनमध्ये काढण्याची घोषणा महेता यांनी यावेळी केली आहे. या सोडतीची जाहिरात येत्या आठ ते १० दिवसांत प्रकाशित करण्यात येईल. त्यात एकूण ९७० घरांसाठी मुंबईकरांना अर्ज करता येईल, असेही त्यांनी सांगितले.................................भाजपाचा वरचष्मारंगशारदा सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत प्रकाश महेता, मुंबई उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे, खासदार पूनम महाजन, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार अशी दिग्गज मंडळी उपस्थित होती. याउलट शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे व्यतिरिक्त कोणताही बडा नेता याठिकाणी दिसला नाही. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सर्व प्रमुख पाहुणे गेल्यावर सभागृहात हजेरी लावली. तर गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याची चर्चा होती.