शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच जीवांना न्याय हवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 07:37 IST

ऊसतोडणी करताना पश्चिम महाराष्ट्रातील शेतात अगदी सहज दिसणारा हा लहानसा वैशिष्ट्यपूर्ण जीव आता बघायलाही मिळत नाही.

काही वर्षांपूर्वी मध्य भारतासह अनेक ठिकाणी सहजतेने आढळणारे खवले मांजर (पँगोलीन) आज बेसुमार शिकारीमुळे जणू नष्टप्राय झाले आहे. ऊसतोडणी करताना पश्चिम महाराष्ट्रातील शेतात अगदी सहज दिसणारा हा लहानसा वैशिष्ट्यपूर्ण जीव आता बघायलाही मिळत नाही. कुठे गेला हा जीव? काय मिळत होते त्याच्यापासून? या प्रश्नांची उत्तरे मग या प्राण्यांच्या शरीरावर असणाऱ्या खवल्यांवर येऊन थांबतात. मध्य भारतातील काही शहरांत जेव्हा पोत्यांनी या प्राण्यांची खवले जप्त झाली त्यावेळी मोठा उलगडा झाला. हे खवले पद्धतशीरपणे परदेशात वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींसाठी पाठवले जात असल्याचे स्पष्ट झाले. हा व्यापार इतका सुरळीत सुरू होता की, हे प्रकरण समोर येईपर्यंत हा प्राणी संकटग्रस्तांच्या यादीत येऊन ठेपला आहे. हे असे एकाच प्राण्याच्या बाबतीत घडले असे नाही. वाघ, बिबटसारख्या लोकप्रिय व प्रसिद्ध प्राण्यांच्या बातम्यांना नेहमीच जागा मिळते, पण पाणमांजर, खवले मांजर यासह अनेक कमी माहीत असलेल्या जीवांना मात्र नष्ट होण्याची वेळ येऊन ठेपते. हे काही फक्त प्राण्यांनाच लागू नाही. पक्ष्यांवरही हीच वेळ आल्याचे आपल्याला दिसून येईल. माळढोक पक्षी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.किती टक्के जंगल वाढले, किती टक्के कमी झाले याची साग्रसंगीत आकडेवारी प्रसिद्ध होते. मग आपले राज्यकर्ते पाठ थोपटून घेण्यात चढाओढ करताना दिसतात. वस्तुस्थिती आणि परिस्थिती बघितल्यावर वेगळेच चित्र डोळ्यासमोर येते. जंगलांना दुभागून अनेक महामार्ग आरपार जात आहेत. उद्योगांची प्रचंड साखळी सागर किनाºयांवर उभी राहत आहे. मोठी धरणे जंगलांच्या अतिसंरक्षित क्षेत्रापर्यंत विस्तारत आहेत. शिकार-चोरांच्या टोळ्या पुन्हा सक्रिय होण्याच्या सूचना येत आहेत. ही यादी न संपणारी आहे. पर्यायाने निसर्गचक्रातील प्रत्येक जीवाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्याचा फटका बसत आहे. जैवविविधता दिनाच्या निमित्ताने फक्त या बाबींचा ऊहापोह करायचा की आपल्या गळ्यापर्यंत आलेल्या या प्रकाराचा गंभीर विचार करून तोडगा काढायचा, हा कळीचा प्रश्न आहे.देशाच्या एकूण भूभागापैकी केवळ चार टक्के भूभाग संरक्षित क्षेत्राखाली येतो. पाचशेहून अधिक संरक्षित क्षेत्रांमध्ये देशातील साडेतीनशे सस्तन प्रजातींचे घर आहे. केवळ आकाराने मोठे व प्रसिद्ध असणारे वाघ, हत्ती, बिबट, सिंह यासारखे महत्त्वपूर्ण प्राणी सातत्याने प्रकाशझोतात राहतात. कच्छच्या रणमध्ये जंगली गाढव, मणिपुरातील मणिपुरी हरिण, ईशान्येकडील जंगलात दिसणाºया अनेक दुर्लभ प्रजाती महत्त्वाच्या आहेत. जैवविविधतेचे आर्थिक मूल्य अथवा परिस्थितीकीय मूल्यांचा अभ्यास करूनही, केवळ ते कागदावरच राहिल्याचे आता वारंवार घडत आहे. विकासाची चढाओढ कुठल्या थराला जाऊन संपेल हे काळच ठरवेल. देशाची स्थिती आणि महाराष्टÑाची स्थिती यात वेगळा काही फरक नाही. घाटमाथ्यांना जोडणाºया अद्वितीय, अजोड जंगलांमधून जाणाºया रस्त्यांचे जाळे वाढतच आहे. मध्य भारतातील प्रसिद्ध अशा व्याघ्र प्रकल्पांना या सर्व गतीचा फटका बसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दररोज रस्ते अपघातात प्राणी मरत असल्याचे चित्र आहे. गवताळ प्रदेशाच्या परिसंस्थेत झाडे लावण्याची चढाओढ सुरू आहे आणि खारफुटींच्या वनांनाही विकास कामांचा फटका बसत आहे.पर्यावरण संरक्षण कायदा, वन कायदा, वन्यजीव कायदे अत्यंत कठोरपणे अमलात आणण्याची गरज निर्माण झाली आहे. जैवविविधता सांभाळताना, त्यात वृद्धी करताना प्रत्येक घटकाचा स्वतंत्र विचार केला पाहिजे. काही राज्यांनी वन्यजीवांच्या अधिवासाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा अभ्यास करून वन्यजीवांचे पुनर्वसन केले आहे. महाराष्टÑानेही क्षेत्रालगतच्या गावांसाठी श्यामाप्रसाद जनवन योजना अमलात आणली आहे. स्थानिक राजकारण्यांना हाताशी धरून या योजना जोरकसपणे राबविण्याची गरज आहे. अशा योजनांसाठी पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची बाब आहे.निसर्ग संवर्धनाचा हा टप्पा प्रदीर्घ आहे. यात सातत्य, चिकाटी, पारदर्शकता येण्याची नितांत गरज आहे. वनविभागाने यात अधिक पुढाकार घेण्याची गरज आहे. फक्त वाघावरच लक्ष केंद्रित न करता जैवसाखळीतील प्रत्येक घटकाचा सांगोपांग विचार करून शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याची गरज आहे, तसेच वेगवेगळ्या माध्यमांतून सामान्य जनेतपर्यंत या सर्व जीवांचे महत्त्व या क्षेत्रात काम करणाºया स्वयंसेवी संस्थांमार्फत नेण्याची आवश्यकता आहे.१२० सस्तन प्राणी प्रजाती नष्टनैसर्गिक संसाधनांच्या बेसुमार वापराचे परिणाम सातत्याने जाणवत आहेत. अमाप लोकसंख्या वाढीने पाणी, वनांवरील ताण प्रचंड वाढला आहे. जीवन पद्धतीत वाढता उपभोगवादही जैवविविधतेच्या ºहासाला कारणीभूत ठरत आहे. १७ व्या शतकापासून जगभरातील जवळपास १२० सस्तन प्राणी आणि १५० पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे आता नष्ट होण्याचा वेग अधिक वाढू लागला आहे. यातून मार्ग काढण्याची आवश्यकता आहे.- संजय करकरेसहसंचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, नागपूर 

टॅग्स :International Day for Biological Diversityजागतिक जैवविविधता दिवसwildlifeवन्यजीव