शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खिलाडी अक्षय कुमारनेही अनुभवला 'नकोसा' स्पर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 13:38 IST

बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमारनं खासगी आयुष्यातील एका मोठी गोष्ट सर्वांसमोर उघड केली आहे.  ''लहानपणी मीदेखील नकोसा स्पर्श अनुभवला आहे'', असे अक्षय कुमारने सांगितले आहे.

मुंबई, दि. 28 - बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमारनं खासगी आयुष्यातील एका मोठी गोष्ट सर्वांसमोर उघड केली आहे.  ''लहानपणी मीदेखील नकोसा स्पर्श अनुभवला आहे'', असे खिलाडी अक्षय कुमारने राज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशन यांनी आयोजित केलेल्या महिला तस्करीविरोधातील परिषदेत बोलत होता. 

या नकोशा स्पर्शाबाबत अक्षय कुमारनं सांगितले की, '' मी लहान होतो. त्यावेळी मी मित्राच्या घरीत जात असताना लिफ्टमॅननं मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. यावेळी लिफ्टमॅननं माझ्या पार्श्वभागाला वाईट हेतून स्पर्श केला. त्या स्पर्शानं मला फारच विचित्र वाटले. त्यानंतर मी घरी गेलो आणि आईवडिलांना घडला प्रकार सांगितला. मग त्यांनी लिफ्टमनविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली. आईवडिलांसोबत मी संवाद साधला म्हणून ते याविरोधात योग्य भूमिका घेऊ शकले''. यानंतरही त्या लिफ्टमननं आणखी एका मुलासोबत असेच काहीसे करण्याचा प्रयत्न केल्याचे माहिती समोर आली.

दरम्यान, लैंगिक शोषणावर बोलताना अक्षय कुमार म्हणाला की, पालकांनीच पुढाकार घेऊन आपल्या मुलांना याबाबत जागरुक करणे गरजेचे आहे. लैंगिक शोषणाबाबत पालक आपल्या मुलांसोबत बोलू शकले तर अशा गोष्टींना नक्कीच आळा बसू शकतो.

आपण समाजाचे पहारेकरी होऊ- अक्षय कुमारमानवी तस्करीसारखा घृणास्पद गुन्हा पाहिला की या समाजाला नक्की झालंय तरी काय असा प्रश्न पडतो. ही तस्करी आपल्या समाजाला गिळत चालली आहे. आपण सर्वांनी बळी पडणार्या लोकांना वाचवण्यासाठी समाजाचे पहारेकरी म्हणून काम केले पाहिजे. मी स्वत: दोन वर्षांमध्ये १० हजार महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत. त्यामुळे मुलींना त्यांच्या हक्काची जाणिव करुन देणे आणि स्वसंरक्षण हे महिला तस्करीविरोधात लढण्यास मदत करतील असे मला वाटते. 

मानवी तस्करी घृणास्पद गुन्हा - मुख्यमंत्रीदरम्यान,  महिला आणि मुलांची तस्करी हा मानवतेविरोधातीलच गुन्हा मानला पाहिजे, एखाद्या व्यक्तीच्या आत्मप्रतिष्ठेशी खेळणे हा सर्वात गंभीर गुन्हा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच परिषदेत केले.  यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मानवी तस्करी नावाच्या राक्षसी गुन्ह्याविरोधात आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. मानवी तस्करी हा जगातील दोन नंबरचा ब्लॅक ट्रेड म्हणून ओळखला जातो, हे थांबवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. महिलांची तस्करी म्हणजे त्यांच्या आत्मसन्मानाशी केलेला खेळच म्हणावा लागेल, एखाद्या व्यक्तीच्या हत्येपेक्षाही हीन दर्जाचा असा हा गुन्हा आहे. एकेकाळी मानवी तस्करीचा धोका केवळ गरीब वर्गापर्यंत मर्यादित होता, मात्र तंत्रज्ञान, माहितीसंवाद क्षेत्रात झालेली वाढ व इंटरनेटमुळे हा प्रश्न च्या दारात उभा ठाकला आहे. या गुन्ह्याला कोणत्याही सीमा नाहीत, त्याला जागतिक स्वरुप आलेले आहे. 

तस्करीला बळी पडलेल्या महिलांची केवळ सूटका करुन उपयोग नाही तर त्यांना पुन्हा स्वबळावर उभे करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात मुस्कान मोहिमेंतर्गत तस्करीला बळी पडलेल्या १० हजार मुलांची सूटका करण्यात यश आले आहे. मानवी तस्करी करणारे गुन्हेगार तंत्रज्ञानात अत्यंत हुशार असतात त्यामुळे सर्व देशांनी कडक कायद्यांच्या मदतीने एकत्र प्रयत्न केल्यास हे प्रकार कमी करता येतील असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. 

महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनीही महिला तस्करीबाबत राज्य सरकार आणि महिला आयोग करत असलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती दिली. जगातील प्रत्येक देशातील प्रश्न वेगवेगळे प्रश्न असू शकतील मात्र महिलांचे प्रश्न सर्वत्र सारखेच आहेत. महिलांना एक वस्तू म्हणून जगभर पाहिले जाते, हा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. तस्करीतून महिलांची सूटका झाल्यावर त्यांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न योग्य रितीने होण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. 

यावेळेस दिशा परिवर्तनाची, सिक्युरिटी जस्टीस, रिस्टोरिंग फ्रिडम या पुस्तकांचे प्रकाशनही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे महिला तस्करीचे दर्शन घडवणारे प्रदर्शन आणि लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी मांडलेल्या रिक्षाचे उद्घाटनही झाले. ही रिक्षा देशात सर्वत्र फिरुन महिला तस्करी विरोधात जागृती करणार आहे.