शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अकोला - सोयबीन पीक पडले पिवळे

By admin | Updated: August 30, 2016 14:35 IST

पाण्याचा ताण पडल्याने पिके करपत असून, सोयाबीन पिवळे पडल्याने राज्यातील शेतक-यांच्या हरित स्वप्नावर पाणी फेरण्याची शक्यता निर्माण झाली आहे

- ऑनलाइन लोकमत
पिके परिपक्वतेच्या अवस्थेत असताना  पावसाने मारली प्रदिर्घ दडी
अकोला, दि. 30 - खरीप हंगामातील पीके परिपक्वतेच्या अवस्थेत असतानाच पावसाने प्रदिर्घ दडी मारली. पाण्याचा ताण पडल्याने पिके करपत असून, सोयाबीन पिवळे पडल्याने राज्यातील शेतक-यांच्या हरित स्वप्नावर पाणी फेरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
यावर्षी वेळेवर पावसाचे आगमन झाल्याने पेरण्यांना हा पाऊस पोषक ठरला. जूलै-ऑगस्ट महिन्यातच पावसाने जवळपास सरासरी गाठली. पिकांची वाढही जोमदार झाली पण पिके परिपक्वतेच्या अवस्थेत आली असतानाच पावसाने प्रदिर्घ दडी मारल्याने खरीप पिकांवर दुष्परिणाम होत असून, सोयाबीनचे पीक अनेक ठिकाणी पिवळी पडली आहे.
 
पश्चिम विदर्भातील ३२ लाख हेक्टरपैकी साडे चौदा लाख हेक्टरवर यावर्षी सोयाबीनची पेरणी झाली आहे.  सोयाबीनचे पीक ७० टक्के शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे. ज्या शेतक-यांनी १० जुलैनंतर पेरणी केली तेथे हे पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे. शेंगा धरण्याच्या अवस्थेतच पावसाने दडी मारली आहे. परिणामी, सोयाबीनच्या दाण्याचा आकार कमी राहण्याची शक्यता आहे. हलक्या जमिनीतील सोयाबीनवर अधिक परिणाम होऊ शकतो, तर भारी, काळ्या जमिनीतील शेंगांवर या तुलनेत कमी दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.मागील तीन,चार वर्षानंतर यावर्षी सोयाबीन पीक जोमदार वाढल्याने शेतकरी आंनदीत आहे.पण पाऊस त्यांच्या आनंदावर विरजण टाकतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या मूग, उडीद काढणीला सुरुवात झाली आहे; पण पाऊसच नसल्याने मुरमाळ व हलक्या जमिनीतील मुगाच्या शेंगांमधील दाणे अपरिपक्व आहे. यावर्षी शेतक-यांनी धाडस करू न या पिकांची पेरणी केली; पण सुरुवातीला आशेचा किरण दाखवणाºया पावसाने शेतकºयांना निराश केले आहे.
 
मान्सूनपूर्व बीटी कापसाने बोंड्या धरल्या असून, इतरही बीटी कापसाला फुले आली आहेत. यावर्षी कापसाचे पीक उत्तम असल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत; पण पाण्याचा ताण सहन करण्यापलीकडे या पिकाची क्षमता संपली आहे. शेतकºयांना आता पाऊस हवा असल्याने शेतकºयांचे डोळे पुन्हा नभाकडे लागले आहेत.ज्वारी पीक सध्यातरी ताण सहन करू न या अवस्थेत आहे. तूर हे आंतरपीक आहे; पण याही पिकाला पाण्याची गरज आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरीलही सोयाबीन पिवळे पडले आहे.