शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

पाणीटंचाई निवारण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासनाची नौटंकी

By admin | Updated: May 24, 2014 01:10 IST

१ कोटी ६६ लाखांची थकबाकी, ग्रामसेवक संकटात

अकोला जिल्‘ातील पाणीटंचाई वाढीस जिल्हा प्रशासनाचे गलथान धोरण कारणीभूत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. गतवर्षी ग्रामपंचायत, बीडीओ व पाणीपुरवठा विभागाने केलेल्या कामाचे १ कोटी ६६ लाख रुपयांचे बिल प्रलंबित असताना, नव्याने कामे करण्याच्या जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने शासकीय कर्मचारी संकटात सापडले आहेत. यंदा पाणीटंचाईची झळ अनेक गावांना बसत आहे. दिवसाआड निघणारे मोर्चे आणि जनक्षोभ लक्षात घेता जिल्हाधिकार्‍यांनी पाणीटंचाई निवारण्यासाठी कामे करा, असे आदेश दिले आहेत. या कामात कुचराई करणार्‍यांवर जिल्हाधिकारी कारवाई करणार असल्याने सरपंच व ग्रामसेवकांसह संबंधित अधिकार्‍यांची बोलती बंद झाली आहे. सन २०१२ ते २०१३ या काळात जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने ४१० गावांत पाणीटंचाई निवारण्यासाठी युद्धपातळीवर कामे करण्यात आली. यामध्ये टँकरने पाणीपुरवठा, विंधन विहीर दुरुस्ती, नळयोजना दुरुस्ती व तात्पुरती नळ योजना या कामांचा समावेश होता. गावागावांत कामे झाल्यामुळे काही प्रमाणात का होईना ग्रामस्थांची तहान भागली होती. या कामासाठी १ कोटी ६६ लाख २० हजार रुपये खर्च झालेत. हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेला सुपूर्द करायचा असतो; परंतु हा निधीच ग्रामीण पाणीपुरवठा योजनेला प्राप्त झाला नसल्याची माहिती मिळाली आहे. जिल्‘ातील सरपंच आणि ग्रामसेवकांनी अनेकदा जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले; परंतु काहीच उपयोग झाला नाही. मागील थकबाकी कायम असताना यंदा नव्याने कामे कशी करायची, असा प्रश्न आता अधिकार्‍यांना पडला आहे. पाणीटंचाई निवारण कार्यक्रमात कुचराई केल्यास प्रशासकीय स्तरावर कारवाई करण्याचे संकेत मिळाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सन २०१२ व २०१३ मध्ये कामे करताना ग्रामपंचायतींनी उधारीवर साहित्य आणून कामे केलीत. यंदा निधी नसल्यामुळे कामे कशी करायची, असा प्रश्न सरपंच व ग्रामसेवकांपुढे उभा ठाकला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळणारा निधी ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयामार्फत कामे करणार्‍या यंत्रणेला दिला जातो; परंतु आतापर्यंत एक रुपयासुद्धा मिळाला नाही, हे विशेष. तात्पुरती पुरक नळ योजनेच्या कामासाठी मोरगाव भाकरे ग्रामपंचायतला १३ लाखांचे साहित्य पुरविले होते; परंतु दोन वर्षांचा कालावधी उलटत असला तरी एक पैसाही प्राप्त झाला नाही.