शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

अकोल्यात २५ हजार शेतकरी वंचित

By admin | Updated: March 30, 2015 02:17 IST

जिल्ह्यातील २ लाख ८३ हजार ६०६ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपैकी २ लाख ५८ हजार ७७९ शेतकऱ्यांना १२९ कोटी २७ लाख ४५ हजार ३०७ रुपयांच्या मदतीचे वाटप शासनामार्फत

जिल्ह्यातील २ लाख ८३ हजार ६०६ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपैकी २ लाख ५८ हजार ७७९ शेतकऱ्यांना १२९ कोटी २७ लाख ४५ हजार ३०७ रुपयांच्या मदतीचे वाटप शासनामार्फत २० मार्चपर्यंत करण्यात आले. उर्वरित २४ हजार ८२७ शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक उपलब्ध नसल्याने २० कोटी २४ लाख परत पाठविण्यात आले़ दुष्काळग्रस्तांसाठी ९ जानेवारी रोजी ७५ कोटी आणि ४ फेबु्रवारी रोजी ७५ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला. पैकी १४५ कोटी ९ लाख ६९ हजार ३६ रुपये तहसील कार्यालयस्तरावर वितरीत करण्यात आले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश बँकांमध्ये जमा करण्याचे काम १४ जानेवारीपासून सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील एकूण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपैकी २ लाख ५८ हजार ७७९ शेतकऱ्यांसाठी १२९ कोटी २७ लाख ४५ हजार ३०७ रुपयांच्या मदतीचे धनादेश २० मार्चपर्यंत बँकांमध्ये जमा करण्यात आले. उर्वरित दुष्काळग्रस्त २४ हजार ८२७ शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक उपलब्ध झाले नसल्याने या शेतकऱ्यांच्या मदतीचा २० कोटी २४ लाख ६१ हजार ४४६ रुपयांचा निधी २० मार्च रोजी शासनाकडे परत पाठविण्यात आला. बुलडाण्यात ३० टक्के शेतकरी वंचितबुलडाणा जिल्ह्यात बँक खाते माहितीअभावी ९५ हजार ३६८ शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत़ ३० टक्के निधीचे वाटप अद्याप झालेले नाही. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. ४ लाख ७६ हजार ८४१ लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसला. या शेतकऱ्यांना २८७ कोटी ९४ लाखांची मदत जाहीर झाली़ पैकी २३९ कोटी ५३ लाखांची मदत प्राप्त झाली. बँकांकडे २१२ कोटी ४० लाखांची रक्कम देण्यात आली. त्यापैकी १६९ कोटी ९२ लाखांची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली.