शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

माफी मागितल्यामुळे अजित पवार, विखे-पाटील, धनंजय मुंडे त्रिकूट बेरोजगार - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 3, 2016 08:30 IST

अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे हे त्रिकूट पुढचे काही दिवस तरी बेरोजगार अवस्थेत फिरताना दिसेल अशी उपरोधक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे वगैरे विरोधी पक्षांतील बुळबुळीत लोकांच्या तोंडचा घास काढून घेतला आहे. ‘व्यंगचित्रप्रकरणी ‘माफी माफी’ असे ते शिवसेनेच्या नावाने ‘खडे’ फोडीत होते, पण आम्ही समस्त मराठा समाजाच्या मायभगिनींपुढे विनम्र नतमस्तक झालो. घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याने आमच्या नावाने ‘खडे’ फोडणार्‍या या त्रिकुटाच्या दाताखाली खडे आले व त्यांचे दात पडले. या मंडळींच्या तोंडचा राजकीय घासच अशा प्रकारे काढून घेतल्याने पुढचे काही दिवस तरी हे त्रिकूट बेरोजगार अवस्थेत फिरताना दिसेल अशी उपरोधक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे. 
 
आता आधी केलेल्या पापाचे प्रायश्‍चित्त घेऊन माफी मागण्याचे मंगलकार्य ही मंडळी कधी करणार आहेत? मराठा समाजातील लेकी-सुना न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत, पण लश्कर-ए-तोयबाची अतिरेकी इशरत जहांला ‘देशाची मुलगी’ ठरवून निरपराध संतीण ठरवण्याचा जो प्रकार राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने केला तो आज रस्त्यावर उतरलेल्या सर्व मराठा माय-भगिनींचा अपमान ठरावा. आज मराठा समाजाच्या मुली म्हणजे रणरागिणी आहेत. इशरत जहांला देशाची लेक बनवण्याचा जो घाणेरडा प्रकार झाला त्याबद्दल धनंजय मुंडे माफी मागणार आहेत का? असा उलट सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 
 
उजनी धरणाचे हक्काचे पाणी मागणार्‍या दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना उद्देशून ‘पाणीच नाही तर सोडणार कोठून? मग मुतता काय तिथं?’ असे उर्मट विधान करणार्‍या अजित पवारांनी समाजाची माफी मागितल्याची नोंद नाही. हे धरणातले पाणी शिवांबूने गढूळ करून शेवटी समस्त जाती-धर्मांच्या मुखातच जाणार होते ना? पण यावर थातूरमातूर उत्तरे देऊन अजित पवारांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला पुन्हा अजित पवारांच्या या मुक्ताफळांबाबत शरद पवारांनी त्यावेळी कानावर हात ठेवले होते असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
ओसाड गावच्या विखे-पाटलांविषयी काय बोलावे? आज त्यांना मराठा म्हणून जाग आली आहे, पण आज जागे झालेले विखे-पाटील अनेक वर्षे काँग्रेस पक्षात अडगळीत पडून अपमानाचेच जिणे जगत होते. त्यांना तेथे पायपुसण्याचीही किंमत नव्हती. शिवसेनेत येताच या पायपुसण्याचे भाग्य फळफळले व विखे पिता-पुत्रांना प्रथमच लाल दिव्याचा मान मिळाला होता. शिवसेनेमुळे त्यांना हा लाभ झाला. अन्यथा पावसाळ्यातील गांडुळांप्रमाणे यांचे राजकीय जीवन अल्पजिवीच ठरले असते, पण गांडुळांना कधी शेषनाग होता येत नाही व फूत्कारही सोडता येत नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.