शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

माफी मागितल्यामुळे अजित पवार, विखे-पाटील, धनंजय मुंडे त्रिकूट बेरोजगार - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 3, 2016 08:30 IST

अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे हे त्रिकूट पुढचे काही दिवस तरी बेरोजगार अवस्थेत फिरताना दिसेल अशी उपरोधक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे वगैरे विरोधी पक्षांतील बुळबुळीत लोकांच्या तोंडचा घास काढून घेतला आहे. ‘व्यंगचित्रप्रकरणी ‘माफी माफी’ असे ते शिवसेनेच्या नावाने ‘खडे’ फोडीत होते, पण आम्ही समस्त मराठा समाजाच्या मायभगिनींपुढे विनम्र नतमस्तक झालो. घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याने आमच्या नावाने ‘खडे’ फोडणार्‍या या त्रिकुटाच्या दाताखाली खडे आले व त्यांचे दात पडले. या मंडळींच्या तोंडचा राजकीय घासच अशा प्रकारे काढून घेतल्याने पुढचे काही दिवस तरी हे त्रिकूट बेरोजगार अवस्थेत फिरताना दिसेल अशी उपरोधक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे. 
 
आता आधी केलेल्या पापाचे प्रायश्‍चित्त घेऊन माफी मागण्याचे मंगलकार्य ही मंडळी कधी करणार आहेत? मराठा समाजातील लेकी-सुना न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत, पण लश्कर-ए-तोयबाची अतिरेकी इशरत जहांला ‘देशाची मुलगी’ ठरवून निरपराध संतीण ठरवण्याचा जो प्रकार राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने केला तो आज रस्त्यावर उतरलेल्या सर्व मराठा माय-भगिनींचा अपमान ठरावा. आज मराठा समाजाच्या मुली म्हणजे रणरागिणी आहेत. इशरत जहांला देशाची लेक बनवण्याचा जो घाणेरडा प्रकार झाला त्याबद्दल धनंजय मुंडे माफी मागणार आहेत का? असा उलट सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 
 
उजनी धरणाचे हक्काचे पाणी मागणार्‍या दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना उद्देशून ‘पाणीच नाही तर सोडणार कोठून? मग मुतता काय तिथं?’ असे उर्मट विधान करणार्‍या अजित पवारांनी समाजाची माफी मागितल्याची नोंद नाही. हे धरणातले पाणी शिवांबूने गढूळ करून शेवटी समस्त जाती-धर्मांच्या मुखातच जाणार होते ना? पण यावर थातूरमातूर उत्तरे देऊन अजित पवारांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला पुन्हा अजित पवारांच्या या मुक्ताफळांबाबत शरद पवारांनी त्यावेळी कानावर हात ठेवले होते असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
ओसाड गावच्या विखे-पाटलांविषयी काय बोलावे? आज त्यांना मराठा म्हणून जाग आली आहे, पण आज जागे झालेले विखे-पाटील अनेक वर्षे काँग्रेस पक्षात अडगळीत पडून अपमानाचेच जिणे जगत होते. त्यांना तेथे पायपुसण्याचीही किंमत नव्हती. शिवसेनेत येताच या पायपुसण्याचे भाग्य फळफळले व विखे पिता-पुत्रांना प्रथमच लाल दिव्याचा मान मिळाला होता. शिवसेनेमुळे त्यांना हा लाभ झाला. अन्यथा पावसाळ्यातील गांडुळांप्रमाणे यांचे राजकीय जीवन अल्पजिवीच ठरले असते, पण गांडुळांना कधी शेषनाग होता येत नाही व फूत्कारही सोडता येत नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.