शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

अजित पवार गोत्यात

By admin | Updated: July 16, 2015 00:21 IST

सिंचन घोटाळ्यांप्रकरणी पाठविलेल्या प्रश्नावलीस माजी उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या उत्तरांनी समाधान न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक

रत्नागिरी : तालुक्यात सहा शाळा शून्य शिक्षकी असून, शिक्षकांची ८८ पदे रिक्त असल्याने शैक्षणिक विकासाचे बारा वाजले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शैक्षणिक दर्जा वाढीसाठी शासनाकडून जोरदार प्रयत्न सुरु असून, त्यासाठी नवनवीन उपक्रम राबवून प्रयोग केले जात आहेत. शिक्षणाच्या विविध उपक्रमांवर शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, शिक्षक भरती न करता असलेल्या शिक्षकांना कामगिरीवर काढण्याचे शासनाचे धोरण शैक्षणिकदृष्ट्या मारक ठरत आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थी कमी, पण शिक्षकांची संख्या जादा असतानाही त्यांना जादाकडून कमीकडे वळवता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, त्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे, अशी एकूण स्थिती आहे.जिल्ह्यातील अन्य तालुक्यांचीही हीच स्थिती आहे. प्रत्येक तालुक्यात रिक्तपदांची मोठी यादीच आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे केवळ गरिब विद्यार्थ्यांचाच ओढा राहिला आहे. रिक्त पदांमुळे कार्यरत असलेल्या शिक्षकांवर विविध विषयांची जबाबदारी येऊन पडली असून त्यांना तारेवरची कसरत करतच ज्ञानार्जन करावे लागत आहे. शासनाने उदासिनता दाखवत या पदभरतीकडे दुर्लक्ष केल्याने कित्येक महिने ही पदे रिक्तच आहेत.रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३३६ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये उपशिक्षकांची ६८४ आणि पदवीधरांची २०९ पदे मंजूर आहेत. मात्र, तालुक्यात उपशिक्षकांची ७६ पदे, तर पदवीधर शिक्षकांची १२ रिक्त आहेत. त्यामुळे कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत शिक्षकांची संख्या अधिक असूनही गटशिक्षणाधिकाऱ्यांना कामगिरीवर काढता येत नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित पाहता ३२ शिक्षकांना कामगिरीवर काढणे आवश्यक आहे. मात्र, शासनाचे नियम आड येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या इयत्ता चौथीपर्यंत असलेल्या ६ शाळा शून्यशिक्षकी आहेत.या शाळांवर केंद्रातीलच शिक्षक देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे दिले जात आहेत. शून्य शिक्षकी नसल्याने या शाळांमधील शिक्षक नेहमीच बदलते ठेवण्यात आले आहेत. याबाबत पंचायत समिती सभापती प्रकाश साळवी यांनी वेळोवेळी शिक्षण विभागाकडे शिक्षक देण्याची मागणी केली असल्याचे सांगितले. (शहर वार्ताहर)रत्नागिरी तालुक्यात शिक्षकांची ८८ पदे रिक्त.तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३३६ प्राथमिक शाळा.उपशिक्षकांची ६८४, तर पदवीधरांची २०९ पदे मंजूर.उपशिक्षकांची ७६, तर पदवीधरांची १२ पदे रिक्त.कमी विद्यार्थीसंख्येच्या काही शाळांवर जादा शिक्षक.शून्यशिक्षकी शाळा विद्यार्थी संख्याशाळेचे नावविद्यार्थी संख्यानाखरे खांबड२निवळी बौध्दवाडी६वेतोशी क्र. ४८संदखोल१२नांदिवडे-आंबुवाडी१९मालगुंड तळेपाट क्र. २१५