शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पुरंदरमध्ये विमानतळाचा छुपा सर्व्हे

By admin | Updated: October 3, 2016 01:44 IST

शनिवारी खानवडी गावच्या बालधोंडी माळावर एका पथकाने पाहणी केली.

खळद : शनिवारी खानवडी गावच्या बालधोंडी माळावर एका पथकाने पाहणी केली. त्यांच्यासमवेत महसूल खात्यातील काही कर्मचारी होते. ही बातमी परिसरात पसरताच ग्रामस्थांनी या भागाकडे धाव घेतली. मात्र ते येईपर्यंत हे पथक निघून गेले. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. वाघापूर, राजेवाडी, पारगाव, मुंजवडी, खानवडी या गावांतील ग्रामस्थ सरकार विश्वासात घेत नसल्याने संताप व्यक्त करीत आहेत. आम्ही ग्रामसभा घेऊन विरोध नोंदवला असतानाही हे पथक सर्व्हे करतेच कसा? हा ग्रामस्थांवर अन्याय आहे, हुकूमशाहीचे राजकारण जर स्थानिक नेते करणार असतील, शासन दडपशाही करणार असेल तर खानवडीकर इतिहास घडविल्याशिवाय राहणार नाहीत अशी भूमिका ग्रामपंचायत सदस्य रमेश बोरावके यांनी मांडली. अधिक तीव्र आंदोलन करून ग्रामस्थ, महिला, मुले, गुरेढोरांसह तहसील कचेरीवर मोर्चा काढू असे माजी सरपंच रामदास होले यांनी सांगितले. (वार्ताहर) >ग्रामस्थांचे उपोषणपारगाव मेमाणे येथील ग्रामस्थांनी रविवारी गांधी जयंतीच्या औचित्याने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. यापुढील सर्व लढा हा बाधित गावांनी एकत्रित येऊन लढण्याचे ठरले. या वेळी एखतपूर-मुंजवडीकर ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समितीचे सदस्य दत्ता झुरंगे यांनी, आमच्या घरादारावर नांगर फिरवणारे निर्णय शासन का घेते असा संतप्त सवाल केला. ग्रामपंचायत सदस्या दक्षता मेमाणे यांनी आजपर्यंत पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलेली जमीन कोणी जर हिरावत असेल तर येथील महिला आता शांत बसणार नाहीत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रसंगी त्यांच्याही पुढे एक पाऊल पुढे राहात तीव्र लढा देणार असल्याचे सांगितले.>ग्रामसभेत विरोधविमानतळाला विरोध होऊ लागला आहे. वाघापूर वगळता इतर गावांतून गामसभा घेऊन विरोध करण्यात आला असून, विमानतळाला इंचभरही जमीन देणार नसल्याचा या वेळी ठराव करण्यात आला आहे. जमीन आमच्या बापाची, नाही कोणाच्या बापाची, विमानतळ हाय हाय, अशा घोषणा देऊन राममंदिर सभागृह दणाणून गेला होता.