शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

समुद्रावरून हवाई वाहतूक तीन महिन्यांत - नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 05:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील नद्या, तलाव, धरण क्षेत्र, समुद्रकिनारा यांचा उपयोग जल-हवाई वाहतुकीसाठी करण्यासाठीची नियमावली तीन महिन्यांत तयार केली जाईल. सध्या विविध देशांच्या नियमांचा अभ्यास सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय जल वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.देशात जल हवाई वाहतूक सुरू करण्याच्या संधी तपासण्यासाठी स्पाइस जेटने शनिवारी येथील गिरगावच्या समुद्रात ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील नद्या, तलाव, धरण क्षेत्र, समुद्रकिनारा यांचा उपयोग जल-हवाई वाहतुकीसाठी करण्यासाठीची नियमावली तीन महिन्यांत तयार केली जाईल. सध्या विविध देशांच्या नियमांचा अभ्यास सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय जल वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.देशात जल हवाई वाहतूक सुरू करण्याच्या संधी तपासण्यासाठी स्पाइस जेटने शनिवारी येथील गिरगावच्या समुद्रात सी-प्लेनची चाचणी घेतली. या निमित्ताने गडकरींनी सांगितले की, देशाला ७,५०० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. १११ नद्यांचा उपयोग जल वाहतुकीसाठी होणार असल्याने आणखी २० हजार किमी जलमार्ग उपलब्ध होईल. त्यावर ४० नदी बंदरे विकसित केली जातील. या सोर्इंचा उपयोग जल हवाई वाहतुकीसाठीही होऊ शकतो.भारतीय हवाई क्षेत्र देशांतर्गत सेवांमध्ये जगात तिसºया व आंतरराष्टÑीय सेवांमध्ये चौथ्या स्थानी आहे. यासाठी ‘उडान’ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. आता जल हवाई वाहतूक ही ‘उडान टप्पा दोन’ असेल, असे नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितले.‘कोडीअ‍ॅक १००’ या १४ आसनी उभयचर अर्थात, जमीन व पाणी दोन्हीवर उतरू शकणाºया विमानाद्वारे ही चाचणी घेण्यात आली. हे विमान जपानच्या सेतेउची होल्डिंग्स कंपनीचे आहे. त्यांच्याकडून स्पाइस जेटने ते भाडेतत्त्वावर घेतले. आम्ही लवकरच देशांतर्गत जल हवाई वाहतूक सेवा सुरू करण्यास तयार आहोत. केंद्र सरकारच्या नियमांची प्रतीक्षा आहे, असे स्पाइस जेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी सांगितले. सेतेउची कंपनीचे सीईओ काझुयुकी ओकाडा या वेळी उपस्थित होते.दृश्यतेचा फटकामुंबई शहर आणि उपनगरात सध्या दिवसभर धुलिकण आणि दवबिंदू यांचे मिश्रण असलेले ‘हेझ’आहे. त्यामुळे अंधुक असलेल्या वातावरणातील १५०० मीटरपेक्षा कमी दृश्यतेचा फटका चाचणीला बसला.विमानाला मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्टÑीय विमानतळावरून उड्डाणास विलंब झाला. तोपर्यंत मान्यवरांना समुद्रात बोटीत ताटकळत बसून राहावे लागले.राज्यात बांधणार ३० जेट्टी : जल वाहतुकीसाठी राज्यभरात ३० जेट्टी बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्टÑ मेरिटाइम मंडळाला केंद्र सरकार निधी देईल, तसेच ठाणे-विरार वाहतुकीसाठीही ५०० कोटी रुपये निधी दिला जाईल, असे गडकरींनी सांगितले.

टॅग्स :MumbaiमुंबईNitin Gadakriनितिन गडकरी