शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रावरून हवाई वाहतूक तीन महिन्यांत - नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 05:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील नद्या, तलाव, धरण क्षेत्र, समुद्रकिनारा यांचा उपयोग जल-हवाई वाहतुकीसाठी करण्यासाठीची नियमावली तीन महिन्यांत तयार केली जाईल. सध्या विविध देशांच्या नियमांचा अभ्यास सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय जल वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.देशात जल हवाई वाहतूक सुरू करण्याच्या संधी तपासण्यासाठी स्पाइस जेटने शनिवारी येथील गिरगावच्या समुद्रात ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील नद्या, तलाव, धरण क्षेत्र, समुद्रकिनारा यांचा उपयोग जल-हवाई वाहतुकीसाठी करण्यासाठीची नियमावली तीन महिन्यांत तयार केली जाईल. सध्या विविध देशांच्या नियमांचा अभ्यास सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय जल वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.देशात जल हवाई वाहतूक सुरू करण्याच्या संधी तपासण्यासाठी स्पाइस जेटने शनिवारी येथील गिरगावच्या समुद्रात सी-प्लेनची चाचणी घेतली. या निमित्ताने गडकरींनी सांगितले की, देशाला ७,५०० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. १११ नद्यांचा उपयोग जल वाहतुकीसाठी होणार असल्याने आणखी २० हजार किमी जलमार्ग उपलब्ध होईल. त्यावर ४० नदी बंदरे विकसित केली जातील. या सोर्इंचा उपयोग जल हवाई वाहतुकीसाठीही होऊ शकतो.भारतीय हवाई क्षेत्र देशांतर्गत सेवांमध्ये जगात तिसºया व आंतरराष्टÑीय सेवांमध्ये चौथ्या स्थानी आहे. यासाठी ‘उडान’ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. आता जल हवाई वाहतूक ही ‘उडान टप्पा दोन’ असेल, असे नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितले.‘कोडीअ‍ॅक १००’ या १४ आसनी उभयचर अर्थात, जमीन व पाणी दोन्हीवर उतरू शकणाºया विमानाद्वारे ही चाचणी घेण्यात आली. हे विमान जपानच्या सेतेउची होल्डिंग्स कंपनीचे आहे. त्यांच्याकडून स्पाइस जेटने ते भाडेतत्त्वावर घेतले. आम्ही लवकरच देशांतर्गत जल हवाई वाहतूक सेवा सुरू करण्यास तयार आहोत. केंद्र सरकारच्या नियमांची प्रतीक्षा आहे, असे स्पाइस जेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी सांगितले. सेतेउची कंपनीचे सीईओ काझुयुकी ओकाडा या वेळी उपस्थित होते.दृश्यतेचा फटकामुंबई शहर आणि उपनगरात सध्या दिवसभर धुलिकण आणि दवबिंदू यांचे मिश्रण असलेले ‘हेझ’आहे. त्यामुळे अंधुक असलेल्या वातावरणातील १५०० मीटरपेक्षा कमी दृश्यतेचा फटका चाचणीला बसला.विमानाला मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्टÑीय विमानतळावरून उड्डाणास विलंब झाला. तोपर्यंत मान्यवरांना समुद्रात बोटीत ताटकळत बसून राहावे लागले.राज्यात बांधणार ३० जेट्टी : जल वाहतुकीसाठी राज्यभरात ३० जेट्टी बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्टÑ मेरिटाइम मंडळाला केंद्र सरकार निधी देईल, तसेच ठाणे-विरार वाहतुकीसाठीही ५०० कोटी रुपये निधी दिला जाईल, असे गडकरींनी सांगितले.

टॅग्स :MumbaiमुंबईNitin Gadakriनितिन गडकरी