शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

वातानुकूलित एसटी आजपासून धावणार

By admin | Updated: June 10, 2017 03:18 IST

कोकणवासीयांचे आरामदायक आणि एसी प्रवासाचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाची वातानुकूलित

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोकणवासीयांचे आरामदायक आणि एसी प्रवासाचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाची वातानुकूलित शिवशाही एसटी मुंबई-रत्नागिरी मार्गावर शनिवारी मार्गस्थ होणार आहे. मुंबई ते रत्नागिरी ‘शिवशाही’साठी प्रवाशाला ५५६ रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान, ‘कोकणात वातानुकूलित एसटी सेवा सुरू होणार’ हे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते.प्रवाशांची संख्या वाढावी आणि एसटीची अत्याधुनिक प्रतिमा प्रवाशांच्या मनात उमटवण्यासाठी एसटी प्रशासन भविष्यात विविध उपाययोजना राबवणार आहे. त्या योजनेंतर्गत वातानुकूलित एसटी प्रवास हा प्रयोग करण्यात येत आहे. कोकणातील वाढती प्रवासी संख्या पाहता शिवशाही ही अत्याधुनिक एसटी सर्वप्रथम मुंबई-रत्नागिरी मार्गावर सुरू करण्यात येत आहे. त्यानंतर ती राज्यातील विविध भागांत लवकरच सुरू करण्यात येईल. एसटीची विश्वासार्हता आणि अत्याधुनिक व आरामदायक प्रवास यामुळे प्रवाशांना आणि प्रशासनाला फायदा होईल, असे मत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी व्यक्त केले. सध्याच्या ‘हिरकणी’ या निमआराम बस तिकिटांच्या जवळपास शिवशाहीचे तिकीट असल्यामुळे वातानुकूलित एसटीला प्रवासी नक्कीच चांगला प्रतिसाद देतील, असेही देओल यांनी सांगितले. एसटीची वातानुकूलित बस सेवा नसल्यामुळे खासगी वाहतूक यंत्रणा अवास्तव भाडे आकारीत होत्या. यामुळे एसटीने वातानुकूलित सेवा सुरू केली आहे. परिणामी, आगामी काळात राज्यातील सर्व भागांत ही एसटी सेवा प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सुरू करण्यात येणार आहे.‘शिवशाही’ मुंबई - रत्नागिरी एसटी थांबेमुंबई सेंट्रल - दादर - कुर्ला नेहरू नगर - पनवेल - रामवाडी - माणगाव - महाड - भरणा - नाकाम - चिपळूण - संगमेश्वर - रत्नागिरीशिवशाही एसटी दर (रुपये)मुंबई ते रत्नागिरी ५५६ मुंबई ते संगमेश्वर४८३मुंबई ते चिपळूण ४२०खासगी वाहतूक यंत्रणा मुंबई ते रत्नागिरी या वातानुकूलित प्रवासाच्या अंतरासाठी ७०० रुपयांपर्यंत तिकीट आकारते. हाच प्रवास शिवशाही एसटीने ५५६ रुपयांत करता येणार आहे. ‘अ‍ॅडव्हान्स’ बुकिंग जोरातच्लक्झरी प्रकारात येणारी ‘शिवशाही’ची घोषणा केल्यानंतर शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत मुंबई-रत्नागिरीसाठी १६ सीट आणि रत्नागिरी-मुंबईसाठी २८ सीटची अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाल्याची माहिती एसटी सूत्रांनी दिली.च्मुंबईहून शनिवारी रात्री ९.४५ वाजता ही एसटी सुटेल आणि रत्नागिरीला रविवारी सकाळी ७ वाजता पोहोचेल. रत्नागिरी येथून रात्री १० वाजता सुटेल आणि मुंबईला सकाळी ७ वाजता पोहोचेल.