शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

वातानुकूलित एसटी आजपासून धावणार

By admin | Updated: June 10, 2017 03:18 IST

कोकणवासीयांचे आरामदायक आणि एसी प्रवासाचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाची वातानुकूलित

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोकणवासीयांचे आरामदायक आणि एसी प्रवासाचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाची वातानुकूलित शिवशाही एसटी मुंबई-रत्नागिरी मार्गावर शनिवारी मार्गस्थ होणार आहे. मुंबई ते रत्नागिरी ‘शिवशाही’साठी प्रवाशाला ५५६ रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान, ‘कोकणात वातानुकूलित एसटी सेवा सुरू होणार’ हे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते.प्रवाशांची संख्या वाढावी आणि एसटीची अत्याधुनिक प्रतिमा प्रवाशांच्या मनात उमटवण्यासाठी एसटी प्रशासन भविष्यात विविध उपाययोजना राबवणार आहे. त्या योजनेंतर्गत वातानुकूलित एसटी प्रवास हा प्रयोग करण्यात येत आहे. कोकणातील वाढती प्रवासी संख्या पाहता शिवशाही ही अत्याधुनिक एसटी सर्वप्रथम मुंबई-रत्नागिरी मार्गावर सुरू करण्यात येत आहे. त्यानंतर ती राज्यातील विविध भागांत लवकरच सुरू करण्यात येईल. एसटीची विश्वासार्हता आणि अत्याधुनिक व आरामदायक प्रवास यामुळे प्रवाशांना आणि प्रशासनाला फायदा होईल, असे मत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी व्यक्त केले. सध्याच्या ‘हिरकणी’ या निमआराम बस तिकिटांच्या जवळपास शिवशाहीचे तिकीट असल्यामुळे वातानुकूलित एसटीला प्रवासी नक्कीच चांगला प्रतिसाद देतील, असेही देओल यांनी सांगितले. एसटीची वातानुकूलित बस सेवा नसल्यामुळे खासगी वाहतूक यंत्रणा अवास्तव भाडे आकारीत होत्या. यामुळे एसटीने वातानुकूलित सेवा सुरू केली आहे. परिणामी, आगामी काळात राज्यातील सर्व भागांत ही एसटी सेवा प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सुरू करण्यात येणार आहे.‘शिवशाही’ मुंबई - रत्नागिरी एसटी थांबेमुंबई सेंट्रल - दादर - कुर्ला नेहरू नगर - पनवेल - रामवाडी - माणगाव - महाड - भरणा - नाकाम - चिपळूण - संगमेश्वर - रत्नागिरीशिवशाही एसटी दर (रुपये)मुंबई ते रत्नागिरी ५५६ मुंबई ते संगमेश्वर४८३मुंबई ते चिपळूण ४२०खासगी वाहतूक यंत्रणा मुंबई ते रत्नागिरी या वातानुकूलित प्रवासाच्या अंतरासाठी ७०० रुपयांपर्यंत तिकीट आकारते. हाच प्रवास शिवशाही एसटीने ५५६ रुपयांत करता येणार आहे. ‘अ‍ॅडव्हान्स’ बुकिंग जोरातच्लक्झरी प्रकारात येणारी ‘शिवशाही’ची घोषणा केल्यानंतर शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत मुंबई-रत्नागिरीसाठी १६ सीट आणि रत्नागिरी-मुंबईसाठी २८ सीटची अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाल्याची माहिती एसटी सूत्रांनी दिली.च्मुंबईहून शनिवारी रात्री ९.४५ वाजता ही एसटी सुटेल आणि रत्नागिरीला रविवारी सकाळी ७ वाजता पोहोचेल. रत्नागिरी येथून रात्री १० वाजता सुटेल आणि मुंबईला सकाळी ७ वाजता पोहोचेल.