शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
2
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
3
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
4
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
5
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
6
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
7
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
8
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
9
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न
10
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
11
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
12
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
13
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
14
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
15
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
16
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
17
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
18
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
19
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
20
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं

वातानुकूलित बसला मिडी बसचा पर्याय

By admin | Updated: April 17, 2017 21:27 IST

पांढरा हत्ती ठरलेल्या बेस्ट उपक्रमाने आजपासून वातानुकूलित बसगाड्या बंद केल्या.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 17 - पांढरा हत्ती ठरलेल्या बेस्ट उपक्रमाने आजपासून वातानुकूलित बसगाड्या बंद केल्या. मात्र यास नागरिकांकडून विरोध होत असल्याने 50 वातानुकूलित बसगाड्या घेण्याचा प्रशासनाचा विचार आहे. विशेष म्हणजे मिडी बसचा प्रस्ताव यापूर्वी दोन वेळा बेस्ट समितीने नाकारला आहे. तरीही वातानुकूलित बसगाडीला पर्याय म्हणून मिडी बस घेण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीपुढे लवकरच मांडण्यात येणार आहे. महापालिकेकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी बेस्ट उपक्रमाने आयुक्तांच्या आदेशानुसार कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार सर्वाधिक नुकसान करणारे वातानुकूलित बस मार्ग बंद करण्यात आले आहेत. मात्र वातानुकूलित बस मार्ग तुटीत असले तरी या बसगाड्यांमधून दररोज 18 ते 20 हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. ही सेवा ऐन उन्हाळ्यात बंद करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे वातानुकूलित बस गाडीला पर्याय म्हणून मिडी बस गाड्या आणण्याचा बेस्ट प्रशासनाचा प्रस्ताव होता. मात्र या बसगाड्या म्हणजे खासगीकरणाचा डाव असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. वातानुकूलित बस मार्ग बंद केल्यामुळे प्रवाशांसाठी मिडी बस आणण्याचा प्रशासनाचा पुन्हा विचार सुरू आहे. किंग लॉन बसचा दर्जा अत्यंत सुमार असल्याने बस प्रवाशांनी या बससेवेकडे पाठ फिरविली. तसेच मुंबई व इतर परिसरात वातानुकूलित प्रवासाचे अनेक पर्याय निर्माण झाल्याने बेस्टची ही सेवा तोट्यात गेली, नियमित वातानुकूलित बस गाडीने जाणाऱ्या प्रवाशांसाठी मिडी वातानुकूलित बसगाड्यांचा पर्याय आणण्यात येत आहे.स्वयंचलित दरवाजे असलेल्या या बसगाडीचे नियंत्रण संपूर्णपणे चालकाकडे असणार आहे. प्रवाशांना बस स्टॉपवर तिकिट खरेदी करुन या बसगाडीमध्ये चढता येईल. म्हणजे या बसगाडीमध्ये कंडक्टरची गरज पडणार नाही. एका बसगाडीची किंमत ४० ते ४५ लाख रुपये आहे. म्हणून या बसगाडीला विरोध होत आहे. वातानुकूलित बस गाड्या बंद करण्याची मागणी गेल्या चार वर्षांपासून बेस्ट समितीमध्ये करण्यात येत होती. मात्र त्यावेळेस सत्तेत असलेल्या शिवसेना व भाजपने याकडे दुर्लक्ष केल्यानेच बेस्ट वर ही वेळ आली आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. आर्यमन संपलेल्या ८०० बसगाड्या बेस्टमध्ये आहेत. या बसगाड्या टप्याटप्याने कमी केल्यानंतर बेसच्या सेवेवर त्याचा परिणाम होईल. म्हणून नवीन बसगाड्यांची ताफा सज्ज ठेवणे बेस्टला भाग आहे. २७ बस मार्गांवरील २६६ वातानुकूलित बस गाड्या सोमवारपासून बंद करण्यात आल्या आहे. या बस गाड्यांमुळे वार्षिक तीनशेहून अधिक कोटींचे नुकसान बेस्टला होत होते.