शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

राष्ट्रवादीशी हवा काडीमोड

By admin | Updated: May 30, 2014 01:03 IST

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी परिश्रम घेतले. मात्र या निवडणुकीत युवा स्वाभिमान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेच्या

मंथन बैठक : जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या सभेत ठराव पारितअमरावती : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काँग्रेस आघाडीच्या  उमेदवाराच्या विजयासाठी परिश्रम घेतले. मात्र या निवडणुकीत युवा स्वाभिमान व राष्ट्रवादी  काँग्रेसच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम न केल्यामुळे उमेदवाराचा पराभव झाला.  यापूर्वीच्या निवडणुकीची परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस  उमेदवारांसाठी समन्वयाने काम करीत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे येत्या विधानसभा  निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस व इतर  कुठल्याही पक्षाशी युती न करता निवडणुकीला सामोरे जावे, असा ठराव अमरावती जिल्हा ग्रामीण  काँग्रेस कमिटीच्या बैठकीत गुरुवारी सर्वानुमते घेण्यात आला. येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीच्या  अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख होते. शेतकरी, शेतजमुर व बेरोजगारांसाठी शासनाने सुरू केलेल्या योजनांची तातडीने अंमलबजावणी  करावी, जिल्ह्यातील भारनियमन बंद करावे, कृषिपंपाच्या प्रलंबित असलेल्या वीज जोडण्या त्वरित  पूर्ण कराव्यात, खरिप हंगाम लक्षात घेता शेतकर्‍यांना पुरेसे खत व बी-बियाणे उपलब्ध करुन द्यावे,  सच्चर समितीच्या शिफारसी लागू कराव्यात, अशा मागण्याही करण्यात आल्या. हा ठराव  सर्वानुमते मंजुर करुन हा ठराव प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात येणार आहे. या बैठकीला हरिशंकर अग्रवाल, सुधाकर भारसाकळे, प्रकाश काळबांडे, रावसाहेब लंगोटे, अनंत  साबळे, बंडू देशमुख, महेंद्र गैलवार, विलास पवार, प्रमोद काळबांडे, संजय वानखडे, प्रमोद दाळू,  संजय तट्टे, संजय लायदे, सुफी, भागवत खांडे, मुरलीधर नाईक, लोभीलाल मालवीय, प्रकाशसिंह  तरवले, स्वप्निल कोकाटे, प्रल्हाद ठाकरे, कैलास आवारे, मुकुंद देशमुख, अजय नागमोते, मोहन  सिंघवी, सुरेश आळे, किशोर किटुकले, प्रतिभा बुक्कावार, दयाराम काळे यांच्यासह पदाधिकारी व  कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सभेचे संचालन संजय मापले व आभार प्रदर्शन भैयासाहेब  मेटकर यांनी केले. (प्रतिनिधी)