शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे निधन

By admin | Updated: December 13, 2015 03:06 IST

शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्कांसाठी जन्मभर लढलेले शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार शरद जोशी यांचे शनिवारी सकाळी ९ वाजता पुण्यातील राहत्या घरी निधन झाले़ ते ८१ वर्षांचे होते.

पुणे : शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्कांसाठी जन्मभर लढलेले शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार शरद जोशी यांचे शनिवारी सकाळी ९ वाजता पुण्यातील राहत्या घरी निधन झाले़ ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने शेतकरी चळवळीचा प्रणेता गेल्याची भावना व्यक्त होत आहे़ जोशी यांच्या दोन्ही कन्या सध्या परदेशात असून, त्या सोमवारी परतणार आहेत़ त्यानंतर अंत्यसंस्कार कधी व कोठे होणार, हे जाहीर करण्यात येणार आहे़ निधनाचे वृत्त समजताच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या बोपोडी येथील निवासस्थानी गर्दी केली होती. शेतकऱ्यांशी समरस होण्यासाठी त्यांनी पुणे जिल्ह्यातील आंबेठाण येथे जमीन घेऊन शेती करण्यास सुरुवात केली़ शिकलेला आणि परदेशात राहिलेला पांढरपेशी माणूस काय शेती करणार आणि शेतीचे काय प्रश्न सोडविणार, असे सुरुवातीला त्यांच्याविषयी बोलले जात होते़ जोशी यांनी १९७९मध्ये शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारी शेतकरी संघटना स्थापन केली़ ‘शेतमालास रास्त भाव’ हा एककलमी कार्यक्रम घेऊन त्यांनी चाकण येथे सर्वप्रथम कांदा उत्पादकांचे आंदोलन उभारले़ त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला़कांदा, ऊस, तंबाखू, दूध, भात, कापूस इत्यादी पिकांसाठी त्यांनी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने केली़ त्यासाठी उपोषणे, मेळावे, तुरुंगवास, शिबिरे या मार्गांनी त्यांनी अनेक मागण्या मान्य करून घेतल्या़ शेती आणि शेतकरी यांचा अभ्यास असणारे अनेक नेते त्यांनी घडविले़ शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचे वर्णन करणारी ‘इंडिया विरुद्ध भारत’ ही संकल्पना क्रांतिकारी ठरली़ विकसित देशांत शेतकऱ्यांना सबसिडी दिली जाते, तर भारतात शेतकऱ्यांना उणे सबसिडी दिली जात असल्याचे त्यांनी दाखवून दिले़ संपूर्ण भारतातील विविध शेतकरी संघटनांना एकत्र करण्याचा प्रयत्न त्यांनी केला़ शेतकऱ्यांबरोबरच शेतमजूर, शेतकरी महिला यांच्यासाठीही काम केले़ शेतमालावरील सर्व निर्बंध उठविण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती़ आपली ही भूमिका मांडण्यासाठी त्यांनी १९९४ मध्ये स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली़------------------------------------अल्पपरिचयशरद जोशी यांचा जन्म सातारा जिल्ह्यात ३ सप्टेंबर १९३५ रोजी झाला़ प्राथमिक शिक्षण बेळगाव व माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले़ बँकिंग विषयासाठीचे सी रँडी सुवर्णपदक त्यांनी पटकाविले़ कोल्हापूर येथील कॉमर्स कॉलेजमध्ये त्यांनी अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विषयाचे व्याख्याते म्हणून काम केले़ १९५८मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते भारतीय टपाल सेवेत रूजू झाले़ १९५८ ते १९६८ या काळात टपाल खात्यात काम करीत असताना, त्यांचा पिनकोड यंत्रणेच्या पायाभरणीचे प्रवर्तक म्हणून सहभाग होता़ वेगवेगळ्या पदांवर काम करत असताना त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत (युनो) झेप घेतली़ तेथे काम करीत असताना त्यांनी जगातील आणि भारतीय शेतकऱ्यांच्या स्थितीबाबत अभ्यास केला़ भारतीय शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहून ते अस्वस्थ झाले़ त्यातून त्यांनी युनोतील नोकरीचा राजीनामा दिला व शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी ते भारतात परत आले़ जुलै २००४ ते २०१० दरम्यान ते राज्यसभेचे खासदार होते़ खासदार म्हणून त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर आवाज उठविला़ केंद्रात अनेक समित्यांवर भरीव काम केले़----------------------------------शेतकऱ्यांचे प्रश्न हिरिरीने मांडणारा चळवळीतील कार्यकर्ता, शेती अर्थव्यवस्थेचा जागतिक अभ्यासक आणि चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारा नेता आपण गमावला आहे. शेतकऱ्यांना उत्तम बाजारपेठ मिळावी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक समृद्ध व्हावी यासाठी त्यांचे समर्पित जीवन आणि संघर्ष कायम स्मरणात राहील.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीशेती, शेतकरी आणि महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्राच्या सदैव स्मरणात राहील. - एकनाथ खडसे, कृषीमंत्रीशरद जोशी हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी आयुष्यभर प्रामाणिक राहिले. राज्यसभेत ते माझे सहकारी होते. काही विषयांवर आमचे वैचारिक मतभेदही होते, परंतु मला त्यांच्या त्यागाचा आणि प्रामाणिक निष्ठेचा नेहमीच आदर वाटत आला. शेतकऱ्यांमधील आत्मभान जागवून आपले प्रश्न ताठरपणे मांडायला त्यांनीच शिकविले. - खा. विजय दर्डा, ‘लोकमत’च्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमनशेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. वाढते वयोमान व आजारपण आडवे आले नसते, तर कदाचित अखेरच्या श्वासापर्यंत शरद जोशी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरच लढताना दिसले असते. - खा. अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष