शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे निधन

By admin | Updated: December 13, 2015 03:06 IST

शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्कांसाठी जन्मभर लढलेले शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार शरद जोशी यांचे शनिवारी सकाळी ९ वाजता पुण्यातील राहत्या घरी निधन झाले़ ते ८१ वर्षांचे होते.

पुणे : शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्कांसाठी जन्मभर लढलेले शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार शरद जोशी यांचे शनिवारी सकाळी ९ वाजता पुण्यातील राहत्या घरी निधन झाले़ ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने शेतकरी चळवळीचा प्रणेता गेल्याची भावना व्यक्त होत आहे़ जोशी यांच्या दोन्ही कन्या सध्या परदेशात असून, त्या सोमवारी परतणार आहेत़ त्यानंतर अंत्यसंस्कार कधी व कोठे होणार, हे जाहीर करण्यात येणार आहे़ निधनाचे वृत्त समजताच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या बोपोडी येथील निवासस्थानी गर्दी केली होती. शेतकऱ्यांशी समरस होण्यासाठी त्यांनी पुणे जिल्ह्यातील आंबेठाण येथे जमीन घेऊन शेती करण्यास सुरुवात केली़ शिकलेला आणि परदेशात राहिलेला पांढरपेशी माणूस काय शेती करणार आणि शेतीचे काय प्रश्न सोडविणार, असे सुरुवातीला त्यांच्याविषयी बोलले जात होते़ जोशी यांनी १९७९मध्ये शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारी शेतकरी संघटना स्थापन केली़ ‘शेतमालास रास्त भाव’ हा एककलमी कार्यक्रम घेऊन त्यांनी चाकण येथे सर्वप्रथम कांदा उत्पादकांचे आंदोलन उभारले़ त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला़कांदा, ऊस, तंबाखू, दूध, भात, कापूस इत्यादी पिकांसाठी त्यांनी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने केली़ त्यासाठी उपोषणे, मेळावे, तुरुंगवास, शिबिरे या मार्गांनी त्यांनी अनेक मागण्या मान्य करून घेतल्या़ शेती आणि शेतकरी यांचा अभ्यास असणारे अनेक नेते त्यांनी घडविले़ शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचे वर्णन करणारी ‘इंडिया विरुद्ध भारत’ ही संकल्पना क्रांतिकारी ठरली़ विकसित देशांत शेतकऱ्यांना सबसिडी दिली जाते, तर भारतात शेतकऱ्यांना उणे सबसिडी दिली जात असल्याचे त्यांनी दाखवून दिले़ संपूर्ण भारतातील विविध शेतकरी संघटनांना एकत्र करण्याचा प्रयत्न त्यांनी केला़ शेतकऱ्यांबरोबरच शेतमजूर, शेतकरी महिला यांच्यासाठीही काम केले़ शेतमालावरील सर्व निर्बंध उठविण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती़ आपली ही भूमिका मांडण्यासाठी त्यांनी १९९४ मध्ये स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली़------------------------------------अल्पपरिचयशरद जोशी यांचा जन्म सातारा जिल्ह्यात ३ सप्टेंबर १९३५ रोजी झाला़ प्राथमिक शिक्षण बेळगाव व माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले़ बँकिंग विषयासाठीचे सी रँडी सुवर्णपदक त्यांनी पटकाविले़ कोल्हापूर येथील कॉमर्स कॉलेजमध्ये त्यांनी अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विषयाचे व्याख्याते म्हणून काम केले़ १९५८मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते भारतीय टपाल सेवेत रूजू झाले़ १९५८ ते १९६८ या काळात टपाल खात्यात काम करीत असताना, त्यांचा पिनकोड यंत्रणेच्या पायाभरणीचे प्रवर्तक म्हणून सहभाग होता़ वेगवेगळ्या पदांवर काम करत असताना त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत (युनो) झेप घेतली़ तेथे काम करीत असताना त्यांनी जगातील आणि भारतीय शेतकऱ्यांच्या स्थितीबाबत अभ्यास केला़ भारतीय शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहून ते अस्वस्थ झाले़ त्यातून त्यांनी युनोतील नोकरीचा राजीनामा दिला व शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी ते भारतात परत आले़ जुलै २००४ ते २०१० दरम्यान ते राज्यसभेचे खासदार होते़ खासदार म्हणून त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर आवाज उठविला़ केंद्रात अनेक समित्यांवर भरीव काम केले़----------------------------------शेतकऱ्यांचे प्रश्न हिरिरीने मांडणारा चळवळीतील कार्यकर्ता, शेती अर्थव्यवस्थेचा जागतिक अभ्यासक आणि चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारा नेता आपण गमावला आहे. शेतकऱ्यांना उत्तम बाजारपेठ मिळावी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक समृद्ध व्हावी यासाठी त्यांचे समर्पित जीवन आणि संघर्ष कायम स्मरणात राहील.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीशेती, शेतकरी आणि महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्राच्या सदैव स्मरणात राहील. - एकनाथ खडसे, कृषीमंत्रीशरद जोशी हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी आयुष्यभर प्रामाणिक राहिले. राज्यसभेत ते माझे सहकारी होते. काही विषयांवर आमचे वैचारिक मतभेदही होते, परंतु मला त्यांच्या त्यागाचा आणि प्रामाणिक निष्ठेचा नेहमीच आदर वाटत आला. शेतकऱ्यांमधील आत्मभान जागवून आपले प्रश्न ताठरपणे मांडायला त्यांनीच शिकविले. - खा. विजय दर्डा, ‘लोकमत’च्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमनशेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. वाढते वयोमान व आजारपण आडवे आले नसते, तर कदाचित अखेरच्या श्वासापर्यंत शरद जोशी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरच लढताना दिसले असते. - खा. अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष