शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यास कटिबद्ध- कृषिमंत्री अब्दुल सत्तार

By सुनील काकडे | Updated: September 23, 2022 18:34 IST

मंगरूळपिरात झाला हिंदू गर्व गर्जना मेळावा

वाशिम: संततधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सर्वेक्षण आणि पंचनाम्याचे आदेश प्रशासनाला यापूर्वीच देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही; तर भरीव आर्थिक मदत देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.आज, २३ सप्टेंबर रोजी मंगरुळपीर येथील जुन्या पंचायत समिती सभागृहात हिंदू गर्व गर्जना शिवसेना संपर्क अभियानांतर्गत पार पडलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भावना गवळी होत्या. शिंदे गट जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे, नवी मुंबईचे माजी नगरसेवक संजू आधारवाडे, तालुका प्रमुख मनिष गहुले, अनिल गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी खासदार गवळी यांनीही शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी विद्यमान राज्य सरकारचे सर्वंकष प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पीक विमा कंपन्यांनी नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा; अन्यथास विमा कंपनीच्या प्रतिनिधींना रस्त्यावरही फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. जिल्हाप्रमुख ठाकरे, संजय वाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेतबांधावरील प्रयोगशाळेला सत्तार यांनी दिली भेट

अब्दुल सत्तार यांनी दाैऱ्यात मालेगांव येथील मालेगाव तालुका शेतकरी उत्पादक कंपनीने सुरु केलेल्या शेतबांधावरील प्रयोगशाळेलाही भेट दिली. मानव  विकास मिशन व कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात १३ ठिकाणी  शेतबांधावर प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या निविष्ठांवरील खर्चात मोठी बचत झाली आहे. प्रयोगशाळेत ट्रायकोडर्मा, वेस्ट डिकम्पोझर, सी विड व पोटॅशीयम हुमेट बेस निविष्ठा, निम व करंज बेस निविष्ठा आणि सिलीकॉन बेस निविष्ठांची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती डॉ. माने यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना दिली.

टॅग्स :washimवाशिमAbdul Sattarअब्दुल सत्तार