शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कृषी वीज बिलाची थकबाकी ४५ हजार कोटींवर; शेतकऱ्यांसह सरकारही चिंतेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 06:18 IST

थकबाकीदार शेतकऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. दुसरीकडे वितरण कंपनीची आर्थिक परिस्थिती अतिशय बिघडली आहे.अशा परिस्थितीत राज्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार मंथन करीत आहे.

- कमल शर्मा

नागपूर : महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांच्या वीज बिलाची थकबाकी केंद्र व राज्य सरकारांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. महाराष्ट्राचाच विचार केला तर वीज ग्राहकांवरील थकबाकी एकूण ७० हजार कोटीवर पोहोचली आहे. यात एकट्या कृषी कनेक्शनची थकबाकी ४५,७०० कोटी पेक्षा अधिक आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. दुसरीकडे वितरण कंपनीची आर्थिक परिस्थिती अतिशय बिघडली आहे.अशा परिस्थितीत राज्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार मंथन करीत आहे.

दिल्लीनंतर पंजाबमध्ये वीज वाढेल. दरांमध्ये कपात करण्यात आली आहे. विश्वसनीय सूत्रानुसार केंद्रातील भाजप सरकार गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी या संदर्भात ठोस पुढाकार घेण्याच्या तयारीत आहे. इलेक्ट्रिसिटी एक्टमध्ये प्रस्तावित सुधारणांवरून चौफेर घेरल्या गेलेले केंद्र सरकार आता त्यातून मार्ग काढण्याच्या तयारीत आहे. 

सूत्रांनुसार, सर्वात अगोदर शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. सरकारकडे दोन पर्याय आहे, पहिला पर्याय 'क्रॉस सबसिडी'मध्ये वाढ करणे. परंतु यामुळे घरगुती व इतर श्रेणीच्या ग्राहकांवर बोजा वाढेल. दुसरा पर्याय कृषी पंपांना सौर ऊर्जाशी जोडण्याचा आहे. ऊर्जा मंत्रालयातील विश्वस्त सूत्रानुसार सौर ऊर्जेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेलच; परंतु त्यांना वीज बिलापासूनही दिलासाही मिळेल. सरकारतर्फे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांना प्रोत्साहन देऊन एखादे नवे धोरण जाहीर करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार देशभरातील ऊर्जा तज्ज्ञांनी यावर चर्चा करून लवकरच मोठी घोषणा करू शकते, असा दावाही सूत्रांनी केला आहे.

थकबाकी माफ होऊ शकत नाहीमहावितरणच्या वरिष्ठ सूत्रांनुसार, राज्यात ४२ लाखापेक्षा अधिक शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांच्यावर एकूण ४५ हजार कोटी रुपयापेक्षा अधिकची थकबाकी आहे. व्याज माफ केल्यानंतरही बहुतांश शेतकरी थकबाकी भरायला तयार नाही. या परिस्थितीत महावितरण थकबाकी माफ करायला तयार नाही. दुसरीकडे लाखो शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापल्या जाण्याची शक्यता आहे. सध्या राजकीय कारणांमुळे हे शक्य होताना दिसून येत नाही. 

टॅग्स :agricultureशेती