शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी वीज बिलाची थकबाकी ४५ हजार कोटींवर; शेतकऱ्यांसह सरकारही चिंतेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 06:18 IST

थकबाकीदार शेतकऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. दुसरीकडे वितरण कंपनीची आर्थिक परिस्थिती अतिशय बिघडली आहे.अशा परिस्थितीत राज्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार मंथन करीत आहे.

- कमल शर्मा

नागपूर : महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांच्या वीज बिलाची थकबाकी केंद्र व राज्य सरकारांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. महाराष्ट्राचाच विचार केला तर वीज ग्राहकांवरील थकबाकी एकूण ७० हजार कोटीवर पोहोचली आहे. यात एकट्या कृषी कनेक्शनची थकबाकी ४५,७०० कोटी पेक्षा अधिक आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. दुसरीकडे वितरण कंपनीची आर्थिक परिस्थिती अतिशय बिघडली आहे.अशा परिस्थितीत राज्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार मंथन करीत आहे.

दिल्लीनंतर पंजाबमध्ये वीज वाढेल. दरांमध्ये कपात करण्यात आली आहे. विश्वसनीय सूत्रानुसार केंद्रातील भाजप सरकार गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी या संदर्भात ठोस पुढाकार घेण्याच्या तयारीत आहे. इलेक्ट्रिसिटी एक्टमध्ये प्रस्तावित सुधारणांवरून चौफेर घेरल्या गेलेले केंद्र सरकार आता त्यातून मार्ग काढण्याच्या तयारीत आहे. 

सूत्रांनुसार, सर्वात अगोदर शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. सरकारकडे दोन पर्याय आहे, पहिला पर्याय 'क्रॉस सबसिडी'मध्ये वाढ करणे. परंतु यामुळे घरगुती व इतर श्रेणीच्या ग्राहकांवर बोजा वाढेल. दुसरा पर्याय कृषी पंपांना सौर ऊर्जाशी जोडण्याचा आहे. ऊर्जा मंत्रालयातील विश्वस्त सूत्रानुसार सौर ऊर्जेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेलच; परंतु त्यांना वीज बिलापासूनही दिलासाही मिळेल. सरकारतर्फे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांना प्रोत्साहन देऊन एखादे नवे धोरण जाहीर करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार देशभरातील ऊर्जा तज्ज्ञांनी यावर चर्चा करून लवकरच मोठी घोषणा करू शकते, असा दावाही सूत्रांनी केला आहे.

थकबाकी माफ होऊ शकत नाहीमहावितरणच्या वरिष्ठ सूत्रांनुसार, राज्यात ४२ लाखापेक्षा अधिक शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांच्यावर एकूण ४५ हजार कोटी रुपयापेक्षा अधिकची थकबाकी आहे. व्याज माफ केल्यानंतरही बहुतांश शेतकरी थकबाकी भरायला तयार नाही. या परिस्थितीत महावितरण थकबाकी माफ करायला तयार नाही. दुसरीकडे लाखो शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापल्या जाण्याची शक्यता आहे. सध्या राजकीय कारणांमुळे हे शक्य होताना दिसून येत नाही. 

टॅग्स :agricultureशेती