शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कृषिपंप वीज जोडणी : विदर्भातील कंत्राटदारांकडून निविदांकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 05:42 IST

कृषीपंप वीज जोडणीच्या निविदांकडे विदर्भातील कंत्राटदारांनी पाठ फिरविली असून ते ‘लॉबी’ बनवून जास्त दर मागत असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली.

नागपूर : कृषीपंप वीज जोडणीच्या निविदांकडे विदर्भातील कंत्राटदारांनी पाठ फिरविली असून ते ‘लॉबी’ बनवून जास्त दर मागत असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली. यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रकाश गजभिये यांनी प्रश्न उपस्थित केला होता. पूर्व विदर्भातील कामांसाठी परिमंडळस्तरावर काढण्यात आलेल्या १४ निविदांपैकी १३ निविदांना व मंडळस्तरावर काढण्यात आलेल्या १६८ पैकी केवळ ८ निविदांना प्रतिसाद मिळाला. विदर्भातील कंत्राटदार ‘सीएसआर रेट’पेक्षा ३० टक्के अधिक दर मागत आहेत. यासंदर्भात चार वेळा बैठका झाल्या आहेत. राज्य शासनाने ८ टक्के अधिक दरावर काम देण्याची तयारी दाखविली आहे. मात्र तरीदेखील कंत्राटदार काम करायला तयार नाहीत. त्यांच्याशी चर्चा करुन सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.राज्यातील इतर भागांमधील कंत्राटदार विभागाच्या दरानुसार काम करायला तयार आहेत. मात्र विदर्भातील कंत्राटदार ‘लॉबिंग’ करत आहेत. मात्र कुठल्याही स्थितीत निविदेचा दर ३० टक्क्यांहून वाढविण्यात येणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाने आतापर्यंत राज्यात ५ लाख १० हजार शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीज जोडणी दिली आहे. २ लाख ३५ हजार शेतकºयांच्या जोडण्या प्रलंबित आहेत. १५ आॅगस्टपासून जोडणीसाठी सुरुवात करण्यात येईल व डिसेंबर २०१९ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :electricityवीजagricultureशेती