शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

गृहनिर्माण संस्थांत थेट पोहोचणार कृषिमाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 05:38 IST

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा निर्णय : मध्यस्थांचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न

मुंबई : राज्याच्या शहरी भागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये कृषी उत्पादनांची विक्री करता येणार आहे. अटल महापणन विकास अभियानांतर्गत ही योजना राबविण्याचा निर्णय शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे. कृषी उत्पादनांची विक्री व्यवस्था उभारणे, शेतकरी ते ग्राहक यांच्यातील मध्यस्थांचे उच्चाटन करणे आणि कृषिमालाला रास्त दर मिळवून देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या आवारात ‘शेतमाल कॉप शॉप’ चालविण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अभ्यासक रमेश प्रभू यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, ‘सहकारांतर्गत सहकार’ या मूल्यानुसार शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, शेतमाल उत्पादक कंपन्या, शेतकरी गट, बचत गट इत्यादींमार्फत शहरांतील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये राहणाºया नागरिकांना रास्त दरात स्वच्छ, ताजा आणि दर्जेदार कृषिमाल पुरविण्याचा उद्देश यामागे आहे.

संस्थेच्या आवारात उपरोल्लेखित पुरवठादारांना त्यांच्या कृषी उत्पादनांच्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उत्पादनांची विक्री मोबाइल शॉपद्वारे (वाहन) करता येईल. मोबाइल शॉप उभारण्यासाठी गृहनिर्माण संस्था आणि पुरवठादार संस्थेमध्ये जागा पुरवण्याबाबत १ ते ३ वर्षांपर्यंत करार करता येईल. अधिक माहितीसाठी संस्थांनी विभागाच्या जिल्हा उपनिबंधक, उपनिबंधक/ साहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्थेशी संपर्क साधावा.सामंजस्याने ठरतील दरगृहनिर्माण संस्थेने संस्थेच्या आवारात स्वत:मार्फत हे दुकान चालवायचे आहे. यासाठी संस्थेच्या आवारात किमान १०० चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी लागेल. दुकानाच्या उभारणीचा खर्च संस्थेने स्वत: करावयाचा आहे.गृहनिर्माण संस्थेचे सदस्य आणि पुरवठादार परस्पर सामंजस्याने उत्पादनांचे दर ठरवतील. संस्था एक किंवा गरजेनुसार एकापेक्षा अधिक सहकारी संस्था, शेतकरी गट/कंपनी, बचत गट यांच्यासोबत करार करू शकते.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी