शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू राहणार - राजू शेट्टी

By admin | Updated: June 10, 2017 19:04 IST

कर्जमाफीसह इतर मागण्यांवर सुकाणू समिती ठाम आहे. अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू राहणार, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - शेतक-यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांवर सुकाणू समिती ठाम आहे. अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू राहणार, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.  दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास मध्य प्रदेशातील शेतक-यांप्रमाणे तीव्र आंदोलन करू, असा इशारा रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे. 
 
पत्रकार परिषदेतील मुद्दे
कुणालाही वेठीस धरावं आमची अशी इच्छा नाही : राजू शेट्टी 
 
शेतक-यांवरील गुन्हे मागे घेण्याची सुकाणू समितीची आग्रही मागणी
 
सातबारा कोरा करा, हमीभाव द्या, या मागण्यांसाठी समिती आग्रही 
 
सरकारची भूमिका जाणून घेण्यासाठी उद्या सह्याद्री अतिथीगृहावर सुकाणू समितीचे सदस्य जातील : राजू शेट्टी
 
सुकाणू समितीच्या वतीनं 35 जण चर्चेसाठी जाणार 
 
आमचे कुणासोबतही मतभेद नाहीत : शेकाप आमदार जयंत पाटील 
 
उद्याच्या बैठकीत सूर्याजी पिसाळ निघायला नकोत, यासाठी दक्षता घेतली आहे : शेकाप आमदार जयंत पाटील
 
अंतिम तोडगा निघेपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार - सुकाणू समिती
 
 
शेतकरी संपासंदर्भात चर्चा करण्यासाठी सुकाणू समितीची शनिवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. सरकारच्या उच्चाधिकार मंत्रिगटाने सुकाणू समितीला चर्चेसाठी बोलावले आहे. राज्य सरकारच्या चर्चेच्या निमंत्रणासंदर्भात सुकाणू समितीतील सदस्यांची बैठकीत बोलणी झाली.  
 
या बैठकीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्यासह डॉ. अजित नवले, जयंत पाटील, अॅड.बीजी कोळसे पाटील उपस्थित होते.
दरम्यान,  मुंबईत झालेल्या बैठकीपूर्वी  सुकाणू समितीत फूट पडल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र शेकाप आमदार जयंत पाटील यांनी आमचे कुणासोबतही मतदभेद नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.  
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी आणि इतर प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उच्चाधिकार मंत्रिगटाची स्थापना केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे या समितीचे प्रमुख असतील. तर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख, परिवहनमंत्री दिवाकर रावते समितीचे सदस्य असणार आहेत. उच्चाधिकार मंत्रिगटानं सुकाणू समितीला चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे.
 
दरम्यान, शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी, वीजबिल माफी, दुधाच्या दरांमध्ये वाढ, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासह इतर मागण्या सुकाणू समितीने लावून धरल्या आहेत आणि त्यासाठी 12 जूनला सरकारी कार्यालयांना घेराव आणि 13 तारखेला रेलरोकोची घोषणा केली आहे.