शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

पाणीकपातीनंतरच्या योजनांसाठी आक्रमकता

By admin | Updated: September 6, 2015 01:37 IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातील पाण्याची पातळी घटल्याने भविष्यातील जलनियोजनाचा विचार करत महापालिका प्रशासनाने २० टक्के पाणीकपात लागू केली.

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातील पाण्याची पातळी घटल्याने भविष्यातील जलनियोजनाचा विचार करत महापालिका प्रशासनाने २० टक्के पाणीकपात लागू केली. मात्र पाणीकपातीनंतरच्या उपाय-योजनांबाबत काहीच हालचाली केल्या नाहीत. परिणामी, त्या उपाययोजनांबाबत कार्यवाही करण्यात यावी यासाठी आता राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत.यंदा पावसाने ओढ दिली. त्यामुळे राज्यासह मुंबईवरील पाण्याचे संकट गहिरे झाले. भविष्यातील नियोजनाचा विचार करत महापालिका प्रशासनाने निवासी क्षेत्रासाठी २० टक्के आणि औद्योगिक क्षेत्रासाठी ५० टक्के पाणीकपात केली. शिवाय जलतरण तलावांसाठीचा पाणीपुरवठा खंडित केला. परंतु प्रशासनाने गतवर्षीच यावर उपाययोजना केल्या असत्या तर पाणीकपातीचे संकट ओढावले नसते, अशी टीका महापालिकेतील सर्वच राजकीय पक्षांनी प्रशासनावर केली. शिवाय पाणीकपातीबाबत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनाही दोष दिला. दरम्यान, पाणीकपातीच्या प्रश्नावर मनसे अधिकच आक्रमक झाली असून, अद्यापही तलाव क्षेत्रात पुरेसा पाऊस होत नाही. त्यामुळे पाणीकपातीत आणखी १० टक्के वाढ होण्याची भीती पक्षाने व्यक्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे २० टक्के पाणीकपातीमुळे डोंगरावर राहणाऱ्या रहिवाशांना पाणी पोहोचत नसल्याची तक्रार संबंधितांनी केली आहे. परिणामी, मुंबईत पाणी प्रश्नाहून वाद भडकण्यापूर्वीच प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशा आशयाचे निवेदन मनसेचे पदाधिकारी दिलीप लांडे यांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)कपडे धुणे, गाड्या धुणे, उद्यानांसाठी विहिरींच्या पाण्याचा वापर करण्यात यावा. मुंबईतील अनेक ठिकाणी विहिरी आणि बोअरवेल आहेत; त्यांचा वापर अधिकाधिक नागरिकांनी करावा, म्हणून पालिकेने त्यांना आवाहन करावे. शासनाच्या नागरी संरक्षण दलाची याकामी मदत घ्यावी. महत्त्वाचे म्हणजे मुंबईतील विहिरी, बोअरवेलची दुरुस्ती करण्यात यावी. डोंगराळ भागात पाण्याच्या टाक्या बसवाव्यात आणि सामान्य जनतेला दिलासा द्यावा, असे मनसेने महापालिकेला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.