शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
2
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
5
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
6
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
7
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
8
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
9
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
10
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
11
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
12
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
13
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
14
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
15
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
16
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
17
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
18
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
19
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
20
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान

पाणीकपातीनंतरच्या योजनांसाठी आक्रमकता

By admin | Updated: September 6, 2015 01:37 IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातील पाण्याची पातळी घटल्याने भविष्यातील जलनियोजनाचा विचार करत महापालिका प्रशासनाने २० टक्के पाणीकपात लागू केली.

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातील पाण्याची पातळी घटल्याने भविष्यातील जलनियोजनाचा विचार करत महापालिका प्रशासनाने २० टक्के पाणीकपात लागू केली. मात्र पाणीकपातीनंतरच्या उपाय-योजनांबाबत काहीच हालचाली केल्या नाहीत. परिणामी, त्या उपाययोजनांबाबत कार्यवाही करण्यात यावी यासाठी आता राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत.यंदा पावसाने ओढ दिली. त्यामुळे राज्यासह मुंबईवरील पाण्याचे संकट गहिरे झाले. भविष्यातील नियोजनाचा विचार करत महापालिका प्रशासनाने निवासी क्षेत्रासाठी २० टक्के आणि औद्योगिक क्षेत्रासाठी ५० टक्के पाणीकपात केली. शिवाय जलतरण तलावांसाठीचा पाणीपुरवठा खंडित केला. परंतु प्रशासनाने गतवर्षीच यावर उपाययोजना केल्या असत्या तर पाणीकपातीचे संकट ओढावले नसते, अशी टीका महापालिकेतील सर्वच राजकीय पक्षांनी प्रशासनावर केली. शिवाय पाणीकपातीबाबत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनाही दोष दिला. दरम्यान, पाणीकपातीच्या प्रश्नावर मनसे अधिकच आक्रमक झाली असून, अद्यापही तलाव क्षेत्रात पुरेसा पाऊस होत नाही. त्यामुळे पाणीकपातीत आणखी १० टक्के वाढ होण्याची भीती पक्षाने व्यक्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे २० टक्के पाणीकपातीमुळे डोंगरावर राहणाऱ्या रहिवाशांना पाणी पोहोचत नसल्याची तक्रार संबंधितांनी केली आहे. परिणामी, मुंबईत पाणी प्रश्नाहून वाद भडकण्यापूर्वीच प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशा आशयाचे निवेदन मनसेचे पदाधिकारी दिलीप लांडे यांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)कपडे धुणे, गाड्या धुणे, उद्यानांसाठी विहिरींच्या पाण्याचा वापर करण्यात यावा. मुंबईतील अनेक ठिकाणी विहिरी आणि बोअरवेल आहेत; त्यांचा वापर अधिकाधिक नागरिकांनी करावा, म्हणून पालिकेने त्यांना आवाहन करावे. शासनाच्या नागरी संरक्षण दलाची याकामी मदत घ्यावी. महत्त्वाचे म्हणजे मुंबईतील विहिरी, बोअरवेलची दुरुस्ती करण्यात यावी. डोंगराळ भागात पाण्याच्या टाक्या बसवाव्यात आणि सामान्य जनतेला दिलासा द्यावा, असे मनसेने महापालिकेला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.