शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

शिक्षणात दिसणार संघाचा ‘अजेंडा’

By admin | Updated: November 27, 2014 00:25 IST

देशात भाजपाची सत्ता स्थापन झाल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघालादेखील ‘अच्छे दिन’ आले आहेत. समाजकारण, राजकारणासोबतच आता शिक्षणक्षेत्रातदेखील पाया मजबूत करण्याची भूमिका

शिक्षणाच्या भारतीयकरणासाठी केंद्राला संदेश योगेश पांडे - नागपूरदेशात भाजपाची सत्ता स्थापन झाल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघालादेखील ‘अच्छे दिन’ आले आहेत. समाजकारण, राजकारणासोबतच आता शिक्षणक्षेत्रातदेखील पाया मजबूत करण्याची भूमिका असलेल्या संघाकडून शिक्षणप्रणालीत बदलाचे संकेत देण्यात आले आहेत. निरनिराळ्या अभ्यासक्रमांतील पाश्चिमात्य प्रभाव कमी करुन त्या जागी देशातील पारंपरिक मूल्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न आहे. एकूणच देशातील शैक्षणिक अभ्यासक्रमांत संघाचा ‘अजेंडा’ समाविष्ट होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.पुनरुत्थान विद्यापीठाच्या वतीने नागपुरात मंगळवारपासून आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय विद्वत् परिषदेदरम्यान असाच सूर उमटला. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनीदेखील या परिषदेत आपल्या मार्गदर्शनादरम्यान शिक्षणक्षेत्रात बदलांची आवश्यकता असल्याचे मत करीत केंद्र शासनाला संघाच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक सुधारणा करण्याचा अप्रत्यक्षपणे संदेशच दिला.आजच्या युगात शिक्षणातूनच नवीन पिढीवर व पर्यायाने देशावर संस्कार होतात. त्यामुळे शिक्षणप्रणालीत संघ विचारांचा चेहरा उमटणे आवश्यक आहे हे पदाधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. देशात संघ परिवारातूनच समोर आलेल्या भाजपाची सत्ता असल्यामुळे या पाच वर्षांत शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल करून पुढील पिढ्यांमध्ये आपला पाया मजबूत करण्याचा संघाचा प्रयत्न आहे. आजच्या शिक्षणप्रणालीतील पाश्चिमात्य देशांचा प्रभाव दूर करून भारतीय संस्कृतीचे दर्शन यातून जास्तीतजास्त कसे होईल यासंदर्भात संघ परिवारातील शिक्षणतज्ज्ञ अध्ययन करीत आहेत. शिक्षणप्रणालीतून लुप्त होत चाललेली भारतीय मूल्ये परत रुजविण्यासाठी नेमके काय केले पाहिजे याचा ‘रोडमॅप’च या परिषदेच्या माध्यमातून देशभरातून आलेल्या शिक्षणतज्ज्ञांनी मांडला आहे. शिक्षणाचे ‘भारतीयकरण’ करण्याची योजना सर्वसमावेशक आणि व्यापक असावी अशी संघाची भूमिका आहे. यासाठी दीर्घकालीन उपाययोजना तयार करण्यावर संघ परिवार गुंतला आहे. पारंपरिक शिक्षणप्रणालीत काम करणाऱ्या संघटनेबाहेरील व्यक्तींजवळ जाऊन प्रयोग, अनुभव यांचे आदानप्रदान करण्याचीदेखील त्यांची तयारी आहे.आपल्या देशात शिक्षणक्षेत्रामध्ये काम करणारे लोक जुन्या प्रणालीला कंटाळले आहेत. त्यामुळे शिक्षणक्षेत्रात सकारात्मक परिवर्तन व्हायला हवे. परंतु हे परिवर्तन होत असताना नवीन समस्या उत्पन्न होणार नाही याचीदेखील काळजी घ्यायला हवी असे मत डॉ.भागवत यांनी व्यक्त केले. ‘केजी टू पीजी’ मध्ये बदलाची भूमिकाअगदी ‘केजी’ पासून ते उच्चशिक्षणात आमूलाग्र बदल करण्याची संघाची भूमिका आहे. पुनरुत्थान विद्यापीठाच्या माध्यमातून संघातर्फे यासंदर्भात जोरदार तयारी सुरू आहे. विद्यापीठ, माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाचा एकमेकांशी संबंध प्रस्थापित करणे, व्यापक परंतु सर्वसमावेशक अभ्यासक्रम लागू करणे, संशोधन पद्धतीत बदल आणणे यावर संघाचा भर आहे. या संपूर्ण योजनेचा प्रारंभ शिक्षणशास्त्राच्या पुनर्रचनेपासून करण्याचा संघ परिवाराचा मानस आहे. शिक्षणाचे भारतीयकरण या प्रक्रियेचे ६० वर्षांत विभाजन करण्यात आले असून पाच निरनिराळे टप्पे ठरविण्यात आले आहेत.