शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

शिवसेना सरकारविरोधात!!

By admin | Updated: March 10, 2015 01:44 IST

शेतक-यांच्या जमिनीच्या हक्कावर बहुमताच्या जोरावर अतिक्रमण करू नका, शेतकऱ्यांचा गळा आवळून सरकारला कायदा करताच येणार नाही

नवी दिल्ली : शेतक-यांच्या जमिनीच्या हक्कावर बहुमताच्या जोरावर अतिक्रमण करू नका, शेतकऱ्यांचा गळा आवळून सरकारला कायदा करताच येणार नाही, अशी क़णखर भूमिका शिवसेनेने भूमी संपादन विधेयकावरील चर्चेत घेतली. विरोधकांनी शिवसेनेच्या या भूमिकेचे बाके वाजवून स्वागत केले. विशेष म्हणजे, संसदेचे सभागृह ज्या जागेवर बांधले आहे ती जमीन शेतकऱ्यांना चिरडूनच ब्रिटीशांनी ताब्यात घेतल्याचा उल्लेख ऐकून अख्खे सभागृह हक्काबक्का झाले आणि शिवसेना प्रवक्ते खा. अरविंद सावंत आजच्या चर्चेतील हीरो ठरले!तब्बल दहा मिनिटे सावंत यांनी शिवसेनेची भूमिका मांडली. तेव्हा या विषयातील बारकावे, महाराष्ट्राचे प्रश्न, शेतीचा विषय व सरकारचा शेतकरीविरोधीतील निर्णय हे सारेच मुद्दे सभागृहात गंभीरता निर्माण करून गेले. शिवसेनेने काही बदल सुचविले आहेत, ते सरकारने स्वीकारले तरच शिवसेना समर्थन करेल असेही स्पष्ट करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनीही विरोधावर मते मांडून काही सूचना केल्या. ग्रामविकासमंत्री चौधरी वीरेंद्र सिंग यांनी हे विधेयक चर्चा व पारित करण्यासाठी लोकसभेत मांडले. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे की बदलली याकडे संपूर्ण सभागृहाचे लक्ष होते. अरविंद सावंत यांनी विधेयकाच्या सध्याच्या मसुद्याला पक्षाचा विरोध आहे, असे सांगून म्हटले, त्यातील तरतुदी शेतकरीविरोधी आहेत. संसद, राष्ट्रपती भवन बांधण्यासाठी ब्रिटिशांनी तेव्हाच्या पंजाब राज्यात असलेल्या गावातील शेतकऱ्यांना जबरदस्तीने हुसकावले. २३ शेतकऱ्यांचा बळी गेला. अशाच पध्दतीने केंद्र सरकार आता शेतकऱ्यांबाबत वागत आहे. विधेयकात त्यांच्या हक्कांवर बाधा आली आहे. महाराष्ट्रातील कोयना, गोसीखुर्द, मराठवाडा कृषि विद्यापीठ, मुंबईला पाणी देणारा वैतरणा अशा प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. पण ७५ टक्के प्रकल्पग्रस्तांचे अजूनही पुर्नवसन झालेले नाही. उद्योगासाठी उद्योगपती मोठ्या प्रमाणात जमिनी घेतात, पण कालांतराने तिथे घरे उभी होतात. त्यातून नफा मिळविला जातो. शेतकरी भरडला जातो. सरकारने पारदर्शी पध्दतीने हे विधेयक मांडले तरच शिवसेना समर्थन करेल असेही त्यांनी स्पष्ट केले. भूमि संपादन विधेयक पारदर्शी नाही, शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या मान्यतेशिवाय जमिनी घेऊ नयेत, असे म्हटले. तसेच भूमि संपादनासाठी महाराष्ट्रातील ज्या चांगल्या योजना आहेत, त्या देशात लागू करण्याचा आग्रह धरला. (विशेष प्रतिनिधी)