शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
3
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
4
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
5
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
6
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
7
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
8
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
9
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
10
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
11
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
12
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
13
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
14
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
15
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
16
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
17
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
18
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
19
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
20
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?

दोन महिन्यांनंतर आवर्तन बंद

By admin | Updated: March 6, 2017 01:24 IST

चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेले दुसरे आवर्तन शनिवारी रात्री ९ वाजता बंद करण्यात आले.

चासकमान : चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेले दुसरे आवर्तन शनिवारी रात्री ९ वाजता बंद करण्यात आले. चासकमान धरणात सध्या ३६.८१ टक्के पाणी साठा शिल्लक राहिला आहे. खेडसह शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार १२ जानेवारी रोजी रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले होते, अशी माहिती शाखा अधिकारी यू. एम. राऊत यांनी दिली.या आवर्तनाचा खेडसह शिरूर तालुक्यातील कांदा, बटाटा, गहू, ज्वारी, हरभरा, मेथी, आदी पिकांना फायदा झाला. ठरलेल्या नियमानुसार कालव्यातून सोडलेले आवर्तन बंद करण्यात आले आहे. चासकमान डाव्या कालव्यातून पाण्याची मोठ्याप्रमाणात गळती होत असून, शेतजमिनी नापीक झाल्या आहे. अस्तिकरण न झाल्याने पाण्याची नासाडीही मोठ्याप्रमाणात होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. या धरणातील पाण्याचा फायदा खेड, शिरूर तालुक्याला झाला. गेली अनेक वर्षे डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाते, मात्र ते पूर्ण क्षमतेने सोडले जात नाही. कारण, या कालव्याचे अस्तिकरणच झाले नाही. जर पूर्ण क्षमतेने पाणी सोडले तर कालवाफुटीची शक्यता आहे. असे वेळोवेळी प्रकारही घडले आहे. त्या मुळे कालव्यातून पाणी जरी सोडले, तर शिरूर तालुक्यात जाण्यासाठी मोठा कालावधी लागतो. या दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणात गळती होत असते. त्यामुळे परिसरात जमिनीत पाणी साचून शेतजमिनी नापीक झाल्या आहे. तसेच, डाव्या कालव्यावर अनेक गावांना, वस्त्यांना जाणाऱ्या मार्गावर लोखंडी पूल टाकण्यात आले आहे. मात्र, ते नादुरुस्त होऊन धोकादायक झाले आहे. त्यामुळे पुढील आवर्तन सोडताना दुरुस्ती व योग्य पाण्याचे नियोजन करून पुढील आवर्तन सोडावे. (वार्ताहर)जानेवारी महिन्यात धरणाचे पाणी सोडले, त्या वेळी चासकमान धरणामध्ये ७०.८४टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षी याच तारखेला चासकमान धरणामध्ये २५.८३टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ११टक्के पाणीसाठा जादा शिल्लक आहे.चासकमान धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पाणी सोडताना विश्वासात घेण्याची मागणी होत आहे, यामुळे पाण्याची नासाडी होणार नाही. मागील वर्षी धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे चासकमान धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. तसेच, धरणाकाठच्या गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या मुळे पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी नागरिक करत आहे. चासकमान धरणातून शुक्रवारी रात्री १२वाजता पाणी बंद करण्यात आले होते. परंतु प्रशासनाच्या आदेशाने ते शनिवारी पुन्हा सोडण्यात आले होते. नंतर रात्री पुन्हा ९ वाजता बंद करण्यात आले.