शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

दोन महिन्यांनंतर आवर्तन बंद

By admin | Updated: March 6, 2017 01:24 IST

चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेले दुसरे आवर्तन शनिवारी रात्री ९ वाजता बंद करण्यात आले.

चासकमान : चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेले दुसरे आवर्तन शनिवारी रात्री ९ वाजता बंद करण्यात आले. चासकमान धरणात सध्या ३६.८१ टक्के पाणी साठा शिल्लक राहिला आहे. खेडसह शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार १२ जानेवारी रोजी रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले होते, अशी माहिती शाखा अधिकारी यू. एम. राऊत यांनी दिली.या आवर्तनाचा खेडसह शिरूर तालुक्यातील कांदा, बटाटा, गहू, ज्वारी, हरभरा, मेथी, आदी पिकांना फायदा झाला. ठरलेल्या नियमानुसार कालव्यातून सोडलेले आवर्तन बंद करण्यात आले आहे. चासकमान डाव्या कालव्यातून पाण्याची मोठ्याप्रमाणात गळती होत असून, शेतजमिनी नापीक झाल्या आहे. अस्तिकरण न झाल्याने पाण्याची नासाडीही मोठ्याप्रमाणात होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. या धरणातील पाण्याचा फायदा खेड, शिरूर तालुक्याला झाला. गेली अनेक वर्षे डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाते, मात्र ते पूर्ण क्षमतेने सोडले जात नाही. कारण, या कालव्याचे अस्तिकरणच झाले नाही. जर पूर्ण क्षमतेने पाणी सोडले तर कालवाफुटीची शक्यता आहे. असे वेळोवेळी प्रकारही घडले आहे. त्या मुळे कालव्यातून पाणी जरी सोडले, तर शिरूर तालुक्यात जाण्यासाठी मोठा कालावधी लागतो. या दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणात गळती होत असते. त्यामुळे परिसरात जमिनीत पाणी साचून शेतजमिनी नापीक झाल्या आहे. तसेच, डाव्या कालव्यावर अनेक गावांना, वस्त्यांना जाणाऱ्या मार्गावर लोखंडी पूल टाकण्यात आले आहे. मात्र, ते नादुरुस्त होऊन धोकादायक झाले आहे. त्यामुळे पुढील आवर्तन सोडताना दुरुस्ती व योग्य पाण्याचे नियोजन करून पुढील आवर्तन सोडावे. (वार्ताहर)जानेवारी महिन्यात धरणाचे पाणी सोडले, त्या वेळी चासकमान धरणामध्ये ७०.८४टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षी याच तारखेला चासकमान धरणामध्ये २५.८३टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ११टक्के पाणीसाठा जादा शिल्लक आहे.चासकमान धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पाणी सोडताना विश्वासात घेण्याची मागणी होत आहे, यामुळे पाण्याची नासाडी होणार नाही. मागील वर्षी धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे चासकमान धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. तसेच, धरणाकाठच्या गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या मुळे पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी नागरिक करत आहे. चासकमान धरणातून शुक्रवारी रात्री १२वाजता पाणी बंद करण्यात आले होते. परंतु प्रशासनाच्या आदेशाने ते शनिवारी पुन्हा सोडण्यात आले होते. नंतर रात्री पुन्हा ९ वाजता बंद करण्यात आले.