शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

कांद्यावर निर्यातबंदी आणू नये, शेतक-यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 11:42 IST

कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवू नये तसेच निर्यात बंदी करू नये, अशी मागणी शेतकरी व व्यापारी वर्गाने केली आहे.

वणी (नाशिक), दि. 31 - कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवू नये तसेच निर्यात बंदी करू नये, अशी मागणी शेतकरी व व्यापारी वर्गाने केली आहे. सध्या परराज्यात विशेषतः परदेशात कांद्याला मागणी वाढली आहे. राज्यातील नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यात कांदा उपलब्ध असून मलेशिया, दुबई, सिंगापूरमध्येही कांद्याची मागणी वाढली आहे. त्यात नाशिकचा कांदा दर्जेदार असल्याने मागणीमध्ये वाढ होत आहे. नाशिकमधील कांद्याची मागणी वाढल्यामुळे उत्पादक आनंदित असून सरकारने निर्यात बंदी करू नये, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. 15 दिवसांत टोमॅटो होणार स्वस्त

दरम्यान, टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने, सामान्यांच्या स्वयंपाकघरातून टोमॅटो सद्या गायब झाल्याचे चित्र दिसत आहे, पण आगामी १५ दिवसांत टोमॅटोच्या दरात मोठी कपात होईल, असे मत भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) व्यक्त केले आहे. दक्षिण आणि अन्य राज्यातून टोमॅटोची आवक आगामी काळात वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

टोमॅटोच्या टंचाईमुळे सद्या हे दर १०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशाच्या अनेक भागांत टोमॅटोचे दर एक महिन्यापासून गगनाला भिडले आहेत. किरकोळ विक्रीत हे दर किमान १०० रुपये किलो आहेत. पाऊस आणि पूर यामुळे भाजी मंडईत भाजीपाला घेऊन येण्यासाठी वेळ तर लागत आहे. दिल्ली टोमॅटो मर्चंट असोसिएशनचे अशोक कौशिक यांनी सांगितले की, मालवाहतुकीसाठी अधिक वेळ लागत असल्याने खर्चात वाढ होत आहे. आगामी दोन आठवड्यात आवक वाढू शकेल. २०१६-१७ या वर्षात म्हणजेच, जुलै ते जून या काळात देशात टोमॅटोचे उत्पादन १५ टक्के अधिक १८७ लाख टन होण्याची शक्यता आहे. मात्र, सद्याच्या नुकसानीचे मूल्यांकन केल्यानंतरच वास्तविक आकडेवारी समोर येईल.