शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कांद्यावर निर्यातबंदी आणू नये, शेतक-यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 11:42 IST

कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवू नये तसेच निर्यात बंदी करू नये, अशी मागणी शेतकरी व व्यापारी वर्गाने केली आहे.

वणी (नाशिक), दि. 31 - कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवू नये तसेच निर्यात बंदी करू नये, अशी मागणी शेतकरी व व्यापारी वर्गाने केली आहे. सध्या परराज्यात विशेषतः परदेशात कांद्याला मागणी वाढली आहे. राज्यातील नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यात कांदा उपलब्ध असून मलेशिया, दुबई, सिंगापूरमध्येही कांद्याची मागणी वाढली आहे. त्यात नाशिकचा कांदा दर्जेदार असल्याने मागणीमध्ये वाढ होत आहे. नाशिकमधील कांद्याची मागणी वाढल्यामुळे उत्पादक आनंदित असून सरकारने निर्यात बंदी करू नये, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. 15 दिवसांत टोमॅटो होणार स्वस्त

दरम्यान, टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने, सामान्यांच्या स्वयंपाकघरातून टोमॅटो सद्या गायब झाल्याचे चित्र दिसत आहे, पण आगामी १५ दिवसांत टोमॅटोच्या दरात मोठी कपात होईल, असे मत भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) व्यक्त केले आहे. दक्षिण आणि अन्य राज्यातून टोमॅटोची आवक आगामी काळात वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

टोमॅटोच्या टंचाईमुळे सद्या हे दर १०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशाच्या अनेक भागांत टोमॅटोचे दर एक महिन्यापासून गगनाला भिडले आहेत. किरकोळ विक्रीत हे दर किमान १०० रुपये किलो आहेत. पाऊस आणि पूर यामुळे भाजी मंडईत भाजीपाला घेऊन येण्यासाठी वेळ तर लागत आहे. दिल्ली टोमॅटो मर्चंट असोसिएशनचे अशोक कौशिक यांनी सांगितले की, मालवाहतुकीसाठी अधिक वेळ लागत असल्याने खर्चात वाढ होत आहे. आगामी दोन आठवड्यात आवक वाढू शकेल. २०१६-१७ या वर्षात म्हणजेच, जुलै ते जून या काळात देशात टोमॅटोचे उत्पादन १५ टक्के अधिक १८७ लाख टन होण्याची शक्यता आहे. मात्र, सद्याच्या नुकसानीचे मूल्यांकन केल्यानंतरच वास्तविक आकडेवारी समोर येईल.