शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

आईपाठोपाठ पितृछत्र हरपले; ‘त्या’ मुली पाेरक्या, २० दिवसांत पाहिल्या २ तिरड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 22:44 IST

समाजमन हेलावणारी ही करुण कहानी आहे, आरमाेरी तालुक्याच्या अरसाेडा गावच्या जांगळे कुटुंबाची

आरमोरी : नियती कधी, कुणासाेबत व कधी क्रूर थट्टा करील, याची चाहूलही लागत नाही; पण ह्या क्रूर थट्टेलाही काही सीमा असावी. जर सीमाच राहिली नाही तर दु:ख सहन करणाऱ्याच्याच पदरात जगातील सर्व दु:खे पडतील, अशीच क्रूर थट्टा नियतीने तीन निरागस बहिणींसाेबत केली. आई वाघाच्या हल्ल्याला बळी पडली, तर दिव्यांग वडील पत्नीचा विरह व आजारपणामुळे कायमची साथ साेडून गेले. २० दिवसांत झालेल्या दाेन दु:खद आघातांनी तिन्ही मुली पाेरक्या झाल्या. शिक्षण घेण्याच्या वयात आता त्यांच्यावर एकमेकींचा सांभाळ करण्याची वेळ आली.

समाजमन हेलावणारी ही करुण कहानी आहे, आरमाेरी तालुक्याच्या अरसाेडा गावच्या जांगळे कुटुंबाची. आजारी पती आणि शिक्षण घेणाऱ्या तीन मुलींचा आईवडील बनून सांभाळ करून कुटुंबाचा गाडा रेटणाऱ्या नलूबाई बाबूलाल जांगळे यांचा १३ मे राेजी वाघाने बळी घेतला. नलू व बाबूलाल हे आपल्या तीन मुली सोनाली (ज्ञानेश्वरी), मोनाली व देवकन्या यांच्यासाेबत आनंदात राहत होते. पती १०-१२ वर्षांपासून दिव्यांग व आजारी असल्याने खाटेवरच पडून राहायची. कुटुंबाच्या पालनपाेषणासह मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी एकट्या नलूबाईवर होती. मजुरी व स्वमालकीची थोडी शेती करून कुटुंबाचे पालनपोषण सुरू हाेते; मात्र नियतीची वक्रदृष्टी पडली. नलूबाईनंतर दिव्यांग वडिलांचा त्या मुलींना शब्दाचा आधार आणि पाठबळाची हिंमत होती. मात्र आता तोही आधार नियतीने हिरावला अन् तिन्ही मुली आता कायमच्याच पोरक्या झाल्या.

२० दिवसांत पाहिल्या दाेन तिरड्या

गवताच्या झोपडीत परिस्थितीशी झगडून आनंदी जीवन जगणारे कुटुंब काही दिवसांतच अस्ताव्यस्त झाले. अचानक भयाण वादळ यावे आणि क्षणातच सर्व काही संपून जावे, असेच गंभीर संकट जांगळे परिवारावर ओढवले. आईवडील काळाच्या पडद्याआड गेल्याने २० दिवसांत घरून दोन तिरड्या निघाल्या आणि पुन्हा घरावर आभाळ कोसळले.

वनविभागाने मुलीला राेजगार द्यावा

नलूबाई यांची मुलगी साेनाली (ज्ञानेश्वरी) ही नुकतीच इयत्ता बारावीची परीक्षा ६६ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. ती राेजगारासाठी पात्र असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी साेनालीसाठी बारमाही रोजगार उपलब्ध करावा. तेव्हाच ती दाेन्ही बहिणीचा सांभाळ करू शकेल. अन्यथा त्या निराधार मुली जगणार कशा, असा सवालही गाववासीय करीत आहेत.