शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

आईपाठोपाठ पितृछत्र हरपले; ‘त्या’ मुली पाेरक्या, २० दिवसांत पाहिल्या २ तिरड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 22:44 IST

समाजमन हेलावणारी ही करुण कहानी आहे, आरमाेरी तालुक्याच्या अरसाेडा गावच्या जांगळे कुटुंबाची

आरमोरी : नियती कधी, कुणासाेबत व कधी क्रूर थट्टा करील, याची चाहूलही लागत नाही; पण ह्या क्रूर थट्टेलाही काही सीमा असावी. जर सीमाच राहिली नाही तर दु:ख सहन करणाऱ्याच्याच पदरात जगातील सर्व दु:खे पडतील, अशीच क्रूर थट्टा नियतीने तीन निरागस बहिणींसाेबत केली. आई वाघाच्या हल्ल्याला बळी पडली, तर दिव्यांग वडील पत्नीचा विरह व आजारपणामुळे कायमची साथ साेडून गेले. २० दिवसांत झालेल्या दाेन दु:खद आघातांनी तिन्ही मुली पाेरक्या झाल्या. शिक्षण घेण्याच्या वयात आता त्यांच्यावर एकमेकींचा सांभाळ करण्याची वेळ आली.

समाजमन हेलावणारी ही करुण कहानी आहे, आरमाेरी तालुक्याच्या अरसाेडा गावच्या जांगळे कुटुंबाची. आजारी पती आणि शिक्षण घेणाऱ्या तीन मुलींचा आईवडील बनून सांभाळ करून कुटुंबाचा गाडा रेटणाऱ्या नलूबाई बाबूलाल जांगळे यांचा १३ मे राेजी वाघाने बळी घेतला. नलू व बाबूलाल हे आपल्या तीन मुली सोनाली (ज्ञानेश्वरी), मोनाली व देवकन्या यांच्यासाेबत आनंदात राहत होते. पती १०-१२ वर्षांपासून दिव्यांग व आजारी असल्याने खाटेवरच पडून राहायची. कुटुंबाच्या पालनपाेषणासह मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी एकट्या नलूबाईवर होती. मजुरी व स्वमालकीची थोडी शेती करून कुटुंबाचे पालनपोषण सुरू हाेते; मात्र नियतीची वक्रदृष्टी पडली. नलूबाईनंतर दिव्यांग वडिलांचा त्या मुलींना शब्दाचा आधार आणि पाठबळाची हिंमत होती. मात्र आता तोही आधार नियतीने हिरावला अन् तिन्ही मुली आता कायमच्याच पोरक्या झाल्या.

२० दिवसांत पाहिल्या दाेन तिरड्या

गवताच्या झोपडीत परिस्थितीशी झगडून आनंदी जीवन जगणारे कुटुंब काही दिवसांतच अस्ताव्यस्त झाले. अचानक भयाण वादळ यावे आणि क्षणातच सर्व काही संपून जावे, असेच गंभीर संकट जांगळे परिवारावर ओढवले. आईवडील काळाच्या पडद्याआड गेल्याने २० दिवसांत घरून दोन तिरड्या निघाल्या आणि पुन्हा घरावर आभाळ कोसळले.

वनविभागाने मुलीला राेजगार द्यावा

नलूबाई यांची मुलगी साेनाली (ज्ञानेश्वरी) ही नुकतीच इयत्ता बारावीची परीक्षा ६६ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. ती राेजगारासाठी पात्र असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी साेनालीसाठी बारमाही रोजगार उपलब्ध करावा. तेव्हाच ती दाेन्ही बहिणीचा सांभाळ करू शकेल. अन्यथा त्या निराधार मुली जगणार कशा, असा सवालही गाववासीय करीत आहेत.