शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

सात वर्षांनंतरही जिल्ह्यात मनसेची बाल्यावस्था कायम

By admin | Updated: October 20, 2014 22:28 IST

मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कोकणाकडे विशेष लक्ष दिलेले नाही,

रत्नागिरी : मोठ्या डामडौलात स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शिवसेनेइतके नाही, पण शिवसेनेच्या खालोखाल यश मिळेल, अशी अटकळ मनसेच्या स्थापनेप्रसंगी केली जात होती. मात्र, मनसेचे कोकणाकडे असलेले दुर्लक्ष आणि मनसे स्वतंत्र झाल्यानंतरही न फुटलेली शिवसेना यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मनसेला मतांमधील आपला वाटा वाढवता आलेला नाही. त्यादृष्टीने मनसे अजूनही बाल्यावस्थेतच आहे.कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेला सर्वात मोठे यश प्रथम कोकणानेच मिळवून दिले. याच शिवसेनेतून मनसे वेगळी झाली. पण, रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिक मात्र शिवसेनेसोबतच ठाम राहिले. शिवसेनेतून एकही मोठा पदाधिकारी मनसेकडे वळला नाही. त्यामुळेच कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेची वाढ झाली नाही. शिवसैनिकांनी पक्ष बदलला नाही. या कारणाबरोबरच मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कोकणाकडे विशेष लक्ष दिलेले नाही, हेही तेवढेच खरे. त्यामागची समीकरणे अजून फारशी स्पष्ट झालेली नाहीत. पण, त्यांनी कोकणात आपला पक्ष वाढवण्यासाठी कोणताही विशेष प्रयत्न केलेला नाही, हे खरे आहे.पक्षाकडून दुर्लक्ष होत असतानाही कोकण विभागीय संघटक वैभव खेडेकर यांनी एका बाजूने मनसे वाढवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. अडीअडचणीला धावून जाणे, महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये पुढाकार घेणे, या त्यांच्या कामामुळे खेड आणि लगतच्या दापोलीमध्ये मनसेने थोडे हातपाय पसरले. त्यामुळे खेड नगर परिषद आणि दापोली नगरपंचायतीत मनसेने आपला वाटा मिळवला. पण, मनसेची ही घोडदौड फार काळ सुरू राहिली नाही. कारण मनसेकडे तळागाळातील कार्यकर्तेच नाहीत. आजच्या घडीला रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस अत्यंत क्षीण झाली आहे. तरीही ग्रामीण भागात आजही काँग्रेसकडे थोडेफार कार्यकर्ते सापडतात. मनसेची अवस्था त्याहीपेक्षा खराब आहे. मनसेकडे तळागाळापर्यंत जाऊन काम करणारे कार्यकर्तेच नाहीत. केवळ तळागाळातील कार्यकर्तेच नाहीत, तर अनेक ठिकाणी पुरेसे पदाधिकारीही नाहीत. जे आहेत, त्यांच्यासमोर कसलाही कार्यक्रम नाही. पक्षाकडून सदस्य नोंदणीची मोहीम नाही.२00९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने रत्नागिरी जिल्ह्यात पाचही जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. दापोली मतदार संघात संतोष शिर्के यांनी १२ हजार ४८१ मते मिळवली होती. गुहागर मतदार संघात वैभव खेडेकर यांनी ६ हजार ८६0 मते घेतली. चिपळुणात सूर्यकांत साळुंके यांनी १0 हजार ६४२ मते मिळवली. रत्नागिरीत अ‍ॅड. संकेत घाग यांनी ५ हजार ६१७ मते मिळवली. राजापुरात अविनाश सौंदळकर यांनी ५ हजार ३९0 मते मिळवली. म्हणजेच २00९ साली रत्नागिरी जिल्ह्यात मनसेला ४0 हजार ९९0 मते मिळाली होती. निवडणुकीनंतर यातील थोडेच जण मनसेमध्ये कार्यरत राहिले. बाकीच्यांनी मनसे आणि राजकारण दोन्ही सोडून दिले.गतनिवडणुकीत जिल्ह्यात ४0 हजार मते पडलेली असतानाही या निवडणुकीत मनसेने सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा विचार केला नाही. यावेळी केवळ दापोली मतदार संघातच आपला उमेदवार उभा केला. कोकण विभागीय संघटक म्हणून काम करणाऱ्या खेडच्या वैभव खेडेकर यांनी या मतदार संघातून निवडणूक लढवली. गतवेळी ते खेड मतदार संघात उभे होते. यावेळी त्यांनी खेड मतदार संघ सोडून दापोलीमधून उमेदवारी दाखल केली. मात्र, तेथे त्यांना केवळ ८ हजार ९१२ मतांवर समाधान मानावे लागले. गतवेळी याच मतदार संघात मनसेला १२ हजाराहून अधिक मते मिळाली होती. यावेळी त्यात घट झाली आहे.लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभेला गुहागर मतदार संघात मनसे कार्यकर्त्यांनी ‘नोटा’चा वापर करण्याची भूमिका घेतली होती. पण नोटाचा वापर तेवढा दिसत नाही. मनसेची संघटनात्मक वाढ झालेली नाही, वैभव खेडेकर यांच्यानंतरच्या फळीत सक्षम नेतृत्त्व नाही. त्यामुळे मनसेची वाढ होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. समाजोपयोगी कामांमध्ये सहभाग नसल्यामुळे मनसे लोकांपर्यंत पोहोचलेलीच नाही. स्थापनेनंतर पहिली एक-दोन वर्षे मनसेमध्ये हलचल दिसली होती. पण पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून पुरेसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे ही हलचल पूर्णपणे थंडावली. त्यामुळेच २00९मध्ये पाच ठिकाणी लढून ४0 हजार मते मिळवणाऱ्या मनसेला या निवडणुकीत एकाच मतदार संघात लढून ८ हजार ९१२ मतांवर समाधान मानावे लागले. (प्रतिनिधी)