शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

समितीच्या अहवालानंतर वीजखरेदीचा निर्णय

By admin | Updated: August 3, 2016 03:45 IST

भाटिया समितीच्या अहवालानंतर घेण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली.

मुंबई : राज्यातील साखर कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पातून तयार झालेली २ हजार मेगावॅट वीज खरेदी करण्याचा निर्णय यासंदर्भात नेमण्यात आलेल्या भाटिया समितीच्या अहवालानंतर घेण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली. शेकापचे जयंत पाटील यांनी याबाबतची लक्षवेधी उपस्थित केली होती. शेतक-यांना एफ.आर.पी. देता यावी, यासाठी साखर कारखान्यांनी वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचे ठरविले आहे. मात्र त्यासाठीचे इन्फ्रास्टक्चर क्लिअरन्स प्रलंबित असल्याने वीज वितरण कंपनीबरोबर खरेदी करण्यात अडचणी येत असल्याबाबत शेकापचे जयंत पाटील, भाजपाचे प्रशांत परिचारक यांनी लक्षवेधी मांडली होती. यावेळी बावनकुळे म्हणाले की, अपारंपारिक ऊर्जा धोरणानुसार सहवीज निर्मिती प्रकल्पांतून १ हजार मेगावॅट वीज निर्मिती करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वीच्या सरकारने दोन हजार मेगावॅट वीज निर्मितीस दिलेल्या मंजूरीपैकी जळपास १ हजार १९५ मेगावॅट वीजेची निर्मिती झाली आहे. त्यामुळे नवीन ऊर्जा निर्मिती करणा-या साखर कारखान्यांना महाऊर्जाकडून परवानगी दिली जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सहवीज निर्मिती प्रकल्पातून ऊसाच्या चिफाडापासून जी वीज निर्मिती केली जाते ती वीज खरेदी करण्याचे धोरण राज्य सरकारने स्विकारले आहेत. ज्या कारखान्यांची वीज निर्मिती करण्याची क्षमता असेल, अशा कारखान्यांकडून भाटीया समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वीज खरेदी करण्याचा निर्णय गळीत हंगामापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.>शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईलसाखर कारखान्यांच्या वीज निर्मितीला २ रुपये प्रतियुनीट खर्च येतो. पण त्याची खरेदी ६ रुपये ९० पैसे या दराने करावी लागते. तसेच ही वीज १ रुपये २० पैसे या दराने शेतक-यांना द्यावी लागते. यामधील खर्चाचा बोजा सरकार किंवा वीज निर्मिती कंपनीलाच सोसावा लागतो. वीज निर्मिती कंपनीवर २२ हजार कोटींचे कर्ज आहे. दरवर्षी वाढणारा आर्थिक नुसानीचा वाढता आकडा वाढत आहे. सात प्रकल्प बंद पडले आहेत. याबाबत विचार करून शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.