शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

‘पेपर गायब’प्रकरणी अखेर पोलिसांत धाव

By admin | Updated: March 4, 2015 23:53 IST

‘लोकमत’च्या भांडाफोडनंतर कबुली : वाहतूक करताना रिक्षातून ‘पार्सल’ गहाळ झाल्याची फिर्याद

कऱ्हाड : बारावी परीक्षेच्या पाचशे उत्तरपत्रिका गायब असल्याचा भांडाफोड ‘लोकमत’ने केल्यानंतर प्रकरण अंगाशी येण्याची चिन्हे दिसू लागल्याने अखेर बुधवारी टपाल खात्याच्या अधिकाऱ्यांनी कऱ्हाड शहर पोलिसांत धाव घेतली. पार्सल गहाळ असल्याची फिर्याद त्यांनी पोलिसांत दिली. गत पाच दिवसांपासून टपाल खाते या गायब उत्तरपत्रिकांचा गुपचूप शोध घेत होते. मात्र, अद्यापही उत्तरपत्रिका हाती न लागल्याने आणि ‘लोकमत’ने या प्रकाराला वाचा फोडल्यामुळे बारावी परीक्षेतील भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकेचे दोन गठ्ठे गायब असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्यामुळे परीक्षा विभागासह टपाल खात्याची पुरती नाचक्की झाली. हे प्रकरण उजेडात आल्यामुळे टपाल खात्याच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री कऱ्हाड शहर पोलीस ठाणे गाठले. कऱ्हाडच्या टपाल कार्यालयाचे सहायक अधीक्षक एम. डी. पाटील यांनी याबाबत शहर पोलिसांत खबर दिली आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, शिवाजी हायस्कूलकडून आलेली व इतर पार्सल घेऊन मालवाहतूक रिक्षा दि. २७ फेब्रुवारी रोजी रात्री कऱ्हाडातून सातारला निघाली होती. संबंधित रिक्षावर आयुबखान इस्माईल मुल्ला (रा. सातारा) हा चालक होता. कऱ्हाडातून निघाल्यानंतर रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास महामार्गावर एका ट्रक चालकाने रिक्षातून काही पार्सल खाली पडल्याचे आयुबखान मुल्ला याला सांगितले. आयुबखान याने रिक्षासह पाठीमागे जाऊन पाहिले. मात्र, त्याला ते पार्सल मिळाले नाही. साताऱ्यात पोहोचल्यानंतर त्याने ही घटना टपाल खात्याच्या अधिकाऱ्यांना फोनवरून सांगितली. सहायक अधीक्षक पाटील यांनी दिलेल्या जबाबानुसार कऱ्हाड शहर पोलिसांत बुधवारी रात्री उशिरा पार्सल गहाळ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांच्यासमोर सहायक अधीक्षक पाटील यांचा जबाब नोंदविण्यात आला. पार्सल कसलं माहीत नाही सहायक अधीक्षक पाटील यांनी खबर देताना ‘पार्सल’ गहाळ झाल्याचे म्हटले आहे. ते पार्सल शिवाजी हायस्कूलकडून देण्यात आले होते. मात्र, त्यामध्ये काय होते, याबाबत कसलीच माहिती नसल्याचे पाटील यांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात चौकशीअंती जबाबदारी ठरविली जाईल. मात्र, सध्या उत्तरपत्रिका शोधण्यास प्राधान्य दिले आहे. कऱ्हाड ते सातारा या मार्गावर सर्वत्र या दोन गठ्ठ्यांचा शोध घेतला जात आहे. याकामी टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांचीही मदत घेतली जात आहे.- अभिषेककुमार सिंह,टपाल प्रवर अधीक्षक, सातारा.