शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार पीडितेशी विवाहानंतरही गुन्हा रद्द नाही

By admin | Updated: July 10, 2016 04:05 IST

मुलीवर बलात्कार करून तिच्याशी विवाह करणाऱ्या आरोपीवरील गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, आरोपी आणि पीडितेमधील तडजोडीला

मुंबई : मुलीवर बलात्कार करून तिच्याशी विवाह करणाऱ्या आरोपीवरील गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, आरोपी आणि पीडितेमधील तडजोडीला कायद्यामध्ये स्थान नाही, असे उच्च न्यायालयाने आरोपीची याचिका फेटाळताना म्हटले.मोहम्मद फैझन आमीर खान याने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरला विवाहाचे आमिष दाखवून २०१४पासून वारंवार तिच्यावर बलात्कार केला. याबद्दल पोलिसांनी त्याच्यावर भारतीय दंडसंहिता कलम ३७६ अंतर्गत गुन्हा नोंदवला.खानच्या म्हणण्यानुसार, त्याच्यात आणि त्याच्या जोडीदारामध्ये गैरसमज निर्माण झाला. त्यामुळे त्याच्या जोडीदारानेने पोलिसांत तक्रार केली. आता या दोघांमधील गैरसमज दूर झाले असून, त्यांनी विवाह केला आहे. त्यामुळे खानविरुद्ध नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा.आरोपीला त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविल्याचे समजले त्या वेळी आरोपी पीडितेशी विवाह करण्यास तयार झाला. आरोपीचे वर्तन समजून घ्यायला हवे. आपल्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे आणि पोलीस शोधत आहेत, हे समजल्यावर आरोपीने मुद्दाम पीडितेशी विवाह केला,’ असे निरीक्षण न्या. नरेश पाटील व न्या. पी. डी. नाईक यांच्या खंडपीठाने नोंदवले. आरोपीने पीडितेशी २९ एप्रिल रोजी विवाह केला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३० एप्रिल रोजी त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पीडितेने लगेचच गुन्हा रद्द करण्यासाठी संमतीपत्र दिले. एकंदरीत घटनेवरून आरोपीचे वर्तन संशयास्पद आहे. त्यामुळे आरोपीने पीडितेशी विवाह केला असला तरी आम्ही त्याच्यावरील एफआयआर रद्द करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, हत्या, बलात्कार, दरोडा इत्यादींसारखे गुन्हे तडजोड करून रद्द केले जाऊ शकत नाहीत, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, २०११मध्ये आरोपी आणि पीडितेमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. २०१४मध्ये आरोपीला मुंबईमध्ये नोकरी मिळाल्याने आरोपीने पीडितेला त्याच्याबरोबर उत्तर प्रदेशहून मुंबईत येण्यास सांगितले. मुंबईत हे दोघेही एकत्र राहत होते. या दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. पीडितेने त्यास विरोध केला नाही; कारण आरोपीने तिला विवाहाचे खोटे आश्वासन दिले. जानेवारी २०१६मध्ये आरोपी पीडितेला न सांगताच उत्तर प्रदेशला परत गेला. तिने त्याच्याशी संपर्क केला असता आरोपीने मुंबईस परत येण्यास नकार दिला. तसेच तिच्याशी विवाह करण्यासही नकार दिला. त्यामुळे मुलीने त्याच्याविरुद्ध पोलीस तक्रार केली. (प्रतिनिधी)