शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
4
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
5
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
6
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
7
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
8
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
9
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
10
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
11
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
12
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
13
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
14
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
15
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
16
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
17
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
18
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
19
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
20
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान

बलात्कार पीडितेशी विवाहानंतरही गुन्हा रद्द नाही

By admin | Updated: July 10, 2016 04:05 IST

मुलीवर बलात्कार करून तिच्याशी विवाह करणाऱ्या आरोपीवरील गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, आरोपी आणि पीडितेमधील तडजोडीला

मुंबई : मुलीवर बलात्कार करून तिच्याशी विवाह करणाऱ्या आरोपीवरील गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, आरोपी आणि पीडितेमधील तडजोडीला कायद्यामध्ये स्थान नाही, असे उच्च न्यायालयाने आरोपीची याचिका फेटाळताना म्हटले.मोहम्मद फैझन आमीर खान याने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरला विवाहाचे आमिष दाखवून २०१४पासून वारंवार तिच्यावर बलात्कार केला. याबद्दल पोलिसांनी त्याच्यावर भारतीय दंडसंहिता कलम ३७६ अंतर्गत गुन्हा नोंदवला.खानच्या म्हणण्यानुसार, त्याच्यात आणि त्याच्या जोडीदारामध्ये गैरसमज निर्माण झाला. त्यामुळे त्याच्या जोडीदारानेने पोलिसांत तक्रार केली. आता या दोघांमधील गैरसमज दूर झाले असून, त्यांनी विवाह केला आहे. त्यामुळे खानविरुद्ध नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा.आरोपीला त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविल्याचे समजले त्या वेळी आरोपी पीडितेशी विवाह करण्यास तयार झाला. आरोपीचे वर्तन समजून घ्यायला हवे. आपल्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे आणि पोलीस शोधत आहेत, हे समजल्यावर आरोपीने मुद्दाम पीडितेशी विवाह केला,’ असे निरीक्षण न्या. नरेश पाटील व न्या. पी. डी. नाईक यांच्या खंडपीठाने नोंदवले. आरोपीने पीडितेशी २९ एप्रिल रोजी विवाह केला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३० एप्रिल रोजी त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पीडितेने लगेचच गुन्हा रद्द करण्यासाठी संमतीपत्र दिले. एकंदरीत घटनेवरून आरोपीचे वर्तन संशयास्पद आहे. त्यामुळे आरोपीने पीडितेशी विवाह केला असला तरी आम्ही त्याच्यावरील एफआयआर रद्द करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, हत्या, बलात्कार, दरोडा इत्यादींसारखे गुन्हे तडजोड करून रद्द केले जाऊ शकत नाहीत, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, २०११मध्ये आरोपी आणि पीडितेमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. २०१४मध्ये आरोपीला मुंबईमध्ये नोकरी मिळाल्याने आरोपीने पीडितेला त्याच्याबरोबर उत्तर प्रदेशहून मुंबईत येण्यास सांगितले. मुंबईत हे दोघेही एकत्र राहत होते. या दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. पीडितेने त्यास विरोध केला नाही; कारण आरोपीने तिला विवाहाचे खोटे आश्वासन दिले. जानेवारी २०१६मध्ये आरोपी पीडितेला न सांगताच उत्तर प्रदेशला परत गेला. तिने त्याच्याशी संपर्क केला असता आरोपीने मुंबईस परत येण्यास नकार दिला. तसेच तिच्याशी विवाह करण्यासही नकार दिला. त्यामुळे मुलीने त्याच्याविरुद्ध पोलीस तक्रार केली. (प्रतिनिधी)