शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
8
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
9
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
10
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
11
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
12
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
13
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
14
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
15
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
16
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
17
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
18
सत्ता येते-जाते, साहित्यिक संस्थांवर ‘कब्जा’ हवा! मोक्याच्या जागेसाठी लागल्या राजकीय नजरा
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

लोकसभेनंतर शिवसेनेची ३७ जागांवर पिछाडी

By admin | Updated: October 22, 2014 06:07 IST

काँग्रेसला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत ०.१ टक्क्याची लहानशी वाढ झाली, मात्र राष्ट्रवादीला मिळालेली मतांची टक्केवारी १.२ ने वाढल्याचे दिसून आले

१) पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालापेक्षा विधानसभेच्या निकालात अनेक वैशिष्टपूर्ण बदल पाहायला मिळाले. लोकसभेच्या निवडणुकीत १०० विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेणाऱ्या शिवसेनेला विधानसभेत केवळ ६३ जागा जिंकता आल्या. त्याचवेळी काँग्रेसला अर्थातच ३७ जागांवरील शिवसेनेच्या जनाधारात पाचच महिन्यात घट झाल्याचे दिसून आले. तर भाजपाने लोकसभेच्या वेळी १३२ जागांवर आघाडी घेतली होती. विधानसभेत त्यांना १२२ जागा जिंकता आल्या़ म्हणजेच युती तुटल्यानंतर त्यांचे केवळ १० जागांचेच नुकसान झाले. २) मे महिन्यात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीने विधानसभेच्या २८८ पैकी २४४ जागांवर आघाडी घेतली होती. विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीतील सर्व पक्षांनी मिळविलेल्या जागांची एकूण संख्या १८६ आहे. म्हणजेच ५८ जागांवर या पक्षांचे नुकसान झाले. उलटपक्षी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला केवळ १४ विधानसभा क्षेत्रांमध्ये आघाडी घेता आली होती. परंतु विधानसभेत काँग्रेसला ४२ जागा राखता आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसही लोकसभेत २६ जागांवर आघाडीवर होता आणि आता त्यांना ४१ जागा जिंकता आल्या. त्याचवेळी मतांच्या टक्केवारीमध्येही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत वैविध्य दिसून आले. ३) काँग्रेसला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत ०.१ टक्क्याची लहानशी वाढ झाली, मात्र राष्ट्रवादीला मिळालेली मतांची टक्केवारी १.२ ने वाढल्याचे दिसून आले. भाजपाच्या मताधिक्यातही ०.५ ची वाढ झाली. परंतु शिवसेनेला मिळालेल्या मतांमध्ये मात्र १.३ टक्क्यांची मोठी घट झाल्याचे विधानसभा निकालावरून स्पष्ट झाले. विदर्भात शिवसेनेला लोकसभेच्या वेळी १९ टक्के मते मिळाली होती. परंतु विधानसभा निवडणुकीत याच विदर्भाने १२.३ टक्के मते दिली. अन्यत्रही सेनेच्या मताधिक्यात घट झालेली पाहायला मिळते. काँग्रेसने अधिक मताधिक्य विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात घेतले आहे. तर लोकसभेत भोपळाही फोडू न शकलेल्या पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला या वेळी ७ जागा जिंकता आल्या आहेत.