शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

शासकीय नोकरीत नियुक्तीनंतर कर्मचारी झाले चक्क दिव्यांग; लाभासाठी बनावट कागदपत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 07:04 IST

एक टक्का वाढ :बदली आणि इतर लाभांसाठी घेतली बनावट प्रमाणपत्रे?

सुधीर लंके

अहमदनगर : राज्य शासनाच्या नोकरीत नियुक्तीच्या वेळेस एकूण कर्मचाऱ्यांपैकी केवळ ०.३४ टक्के दिव्यांग कर्मचारी होते; मात्र आजमितीला दीड टक्के कर्मचारी दिव्यांग असल्याचे शासकीय कर्मचारी कोषातील आकडेवारी सांगते. नियुक्तीनंतर एवढे कर्मचारी दिव्यांग झाले कसे? हा प्रश्न आहे. 

नियुक्तीवेळी दिव्यांग नसलेले कर्मचारी नंतर अपघात अथवा आजारपणामुळे दिव्यांग बसू शकतात. पूर्वी सहा प्रकारांबाबत दिव्यांग प्रमाणपत्र दिले जात होते. २०१६ च्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमानुसार दिव्यांगत्वाचे २१ प्रकार आहेत. त्यामुळेही संख्या वाढू शकते. मात्र, विविध जिल्हा परिषदांच्या  बदली प्रक्रियांमध्ये अनेक कर्मचारी हे दिव्यांग नसताना केवळ बदली व इतर लाभ घेण्यासाठी दिव्यांग बनतात असे आढळले आहे. जिल्हा रुग्णालयांतून त्यांनी अशी प्रमाणपत्रे मिळविली आहेत. तर काहींनी बनावट प्रमाणपत्रेच सादर केली आहेत.

प्रमाणपत्रे देणारी यंत्रणाच संशयास्पद शासन आदेशानुसार जिल्हा व महापालिका रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये येथील त्रिसदस्यीय समिती दिव्यांगत्वाचे प्रमाण ठरवून तसे प्रमाणपत्र देते. ४० टक्के दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तीला शासकीय लाभ मिळतात. या प्रमाणपत्रांची नंतर शहानिशाच होत नाही. बीड जिल्हा परिषदेने केलेल्या फेरतपासणीत ५२ दिव्यांग कर्मचारी असे आढळले जे ४० टक्के दिव्यांग नसताना शासकीय रुग्णालयाने तसे प्रमाणपत्र वितरित केले होते. यावरून प्रमाणपत्र देणारी शासकीय रुग्णालयांतील प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाला आहे. 

अनेक कर्मचारी दिव्यांग नसताना या प्रमाणपत्रांचे फायदे घेतात हे खरे आहे. त्यामुळे शासनाने जातपडताळणीप्रमाणे आता दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय नोकऱ्यांतील दिव्यांगांचीही अशी पडताळणी होईल. यातून बनावट दिव्यांगांचा शोध लागून कारवाई होईल. - बच्चू कडू, मुख्य मार्गदर्शक, दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियान