शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
3
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
4
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
5
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
6
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
7
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
8
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
9
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
10
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
11
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
12
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
13
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
14
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
15
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
16
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
17
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
18
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
19
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
20
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
Daily Top 2Weekly Top 5

30 एप्रिलनंतर IPL सामने राज्याबाहेर हलवा- मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

By admin | Updated: April 13, 2016 18:33 IST

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल सामन्यांसाठी लाखो लीटर पाणी वाया जाणार असून मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयला ३० एप्रिल नंतरचे सामने राज्याबाहेर घेण्याचे आदेश दिले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ पडलेला असतानाच आयपीएल सामन्यांसाठी लाखो लीटर पाणी वाया जाणार असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयला ३० एप्रिल नंतरचे सामने राज्याबाहेर खेळवण्याचे आदेश दिले आहेत. 
आयपीएलच्या सामन्यांसाठी लागणारे पाणी दुष्काळग्रस्तांना देण्याचे आश्वासन बीसीसीआयने मुंबई उच्च न्यायालयाला दिले असूनही न्यायालयाने एप्रिल महिन्यानंतर महाराष्ट्रात सामने खेळू देण्यास नकार दर्शवला आहे. 
 
९ एप्रिल रोजी सुरू झालेल्या आयपीएलच्या ९ व्या सत्रात महाराष्ट्रात एकूण १९ सामने खेळवले जाणार होते. एप्रिलमध्ये ७ तर मे महिन्यात १२ सामने खेळवण्यात येणार असून त्यात २ सेमीफायनल व फायनलचाही समावेश आहे. मात्र आता न्यायालयाच्या आदेशानंतर हे उर्वरित सामने कुठे खेळवले जातील याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
 
दरम्यान  मुंबई आणि पुणे संघ मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 5 कोटींची मदत करणार  असल्याचे बीसीसीआयच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले होते. मात्र हे सामने 30 एप्रिलपर्यंतच खेळवा असा आदेशच कोर्टानं बीसीसीआयला दिला आहे.
आयपीएलसाठी वापरलं जाणारं पाणी दुष्काळग्रस्तांना देण्यास तयार आहात का, असा प्रश्न कोर्टानं बीसीसीआयला केला होता. त्यावर आज झालेल्या सुनावणीदरम्यान बीसीसीआयनं पाणी देण्यास सहमती दर्शवली असूनही,  30 एप्रिलनंतर राज्यात आयपीएल नको, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. महाराष्ट्र भीषण दुष्काळात होरपळतोय बीसीसीआय मुख्यमंत्री रिलीफ फंडला मदत करण्याचा विचार करतेय का, असाही सवाल मुंबई उच्च न्यायालयानं विचारला होता. त्यावर दुष्काळग्रस्तांना पाणी देण्यास तयार असल्याचं बीसीसीआयनं न्यायालयाला सांगितलं होतं.