शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

30 एप्रिलनंतर IPL सामने राज्याबाहेर हलवा- मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

By admin | Updated: April 13, 2016 18:33 IST

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल सामन्यांसाठी लाखो लीटर पाणी वाया जाणार असून मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयला ३० एप्रिल नंतरचे सामने राज्याबाहेर घेण्याचे आदेश दिले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ पडलेला असतानाच आयपीएल सामन्यांसाठी लाखो लीटर पाणी वाया जाणार असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयला ३० एप्रिल नंतरचे सामने राज्याबाहेर खेळवण्याचे आदेश दिले आहेत. 
आयपीएलच्या सामन्यांसाठी लागणारे पाणी दुष्काळग्रस्तांना देण्याचे आश्वासन बीसीसीआयने मुंबई उच्च न्यायालयाला दिले असूनही न्यायालयाने एप्रिल महिन्यानंतर महाराष्ट्रात सामने खेळू देण्यास नकार दर्शवला आहे. 
 
९ एप्रिल रोजी सुरू झालेल्या आयपीएलच्या ९ व्या सत्रात महाराष्ट्रात एकूण १९ सामने खेळवले जाणार होते. एप्रिलमध्ये ७ तर मे महिन्यात १२ सामने खेळवण्यात येणार असून त्यात २ सेमीफायनल व फायनलचाही समावेश आहे. मात्र आता न्यायालयाच्या आदेशानंतर हे उर्वरित सामने कुठे खेळवले जातील याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
 
दरम्यान  मुंबई आणि पुणे संघ मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 5 कोटींची मदत करणार  असल्याचे बीसीसीआयच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले होते. मात्र हे सामने 30 एप्रिलपर्यंतच खेळवा असा आदेशच कोर्टानं बीसीसीआयला दिला आहे.
आयपीएलसाठी वापरलं जाणारं पाणी दुष्काळग्रस्तांना देण्यास तयार आहात का, असा प्रश्न कोर्टानं बीसीसीआयला केला होता. त्यावर आज झालेल्या सुनावणीदरम्यान बीसीसीआयनं पाणी देण्यास सहमती दर्शवली असूनही,  30 एप्रिलनंतर राज्यात आयपीएल नको, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. महाराष्ट्र भीषण दुष्काळात होरपळतोय बीसीसीआय मुख्यमंत्री रिलीफ फंडला मदत करण्याचा विचार करतेय का, असाही सवाल मुंबई उच्च न्यायालयानं विचारला होता. त्यावर दुष्काळग्रस्तांना पाणी देण्यास तयार असल्याचं बीसीसीआयनं न्यायालयाला सांगितलं होतं.