शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

अखेर राज्यातील ४९२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

By admin | Updated: April 21, 2017 23:54 IST

गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या पोलीस दलातील निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांना (जीटी) अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्यातील ४९२ निरीक्षकांच्या बदल्या

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या पोलीस दलातील निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांना (जीटी) अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्यातील ४९२ निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी रात्री उशिरा त्याबाबतचे आदेश पोलीस मुख्यालयातून जारी करण्यात आले.मुंबई, नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील ५०हून अधिक अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना नवीन जागी हजर होण्यासाठी त्वरित कार्यमुक्त करण्याचे आदेश घटकप्रमुखांना देण्यात आले आहेत.दरवर्षी ‘जीटी’ या साधारण मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होतात. या वेळी मात्र एक महिन्यापूर्वी बदल्यांचे आदेश जारी करून अधिकाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक वर्षे सुरू होण्यापूर्वी बदलीच्या ठिकाणी जाता येणार आहे. मुंबई आयुक्तालयात आठ वर्षे व अन्य आयुक्तालय व परिक्षेत्रात सहा वर्षे आणि एका जिल्ह्यात दोन वर्षांहून अधिक काळ सेवा पूर्ण झालेल्या राज्यभरातील २६७ निरीक्षक व विनंती केलेल्या २१५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांना त्वरित नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी घटकप्रमुखांनी कार्यमुक्त करावे, असे आदेश महासंचालकांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)