शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

अखेर शिट्टी वाजलीच नाही

By admin | Updated: May 17, 2014 02:02 IST

कॉंग्रेसने पालघर लोकसभा मतदारसंघात प्रचंड हाराकिरी केली. प्रचार मध्यावर आलेला असताना आपले राज्यमंत्री राजेंद्र गावित यांची उमेदवारी मागे घेऊन बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देण्याची खेळी खेळली.

कॉंग्रेसने पालघर लोकसभा मतदारसंघात प्रचंड हाराकिरी केली. प्रचार मध्यावर आलेला असताना आपले राज्यमंत्री राजेंद्र गावित यांची उमेदवारी मागे घेऊन बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देण्याची खेळी खेळली. काँग्रेसचा उमेदवार नसला की भाजपाचा आणि बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यात सरळ लढत होईल व जाधव पुन्हा विजयी होतील. असे सत्तेचे साधे गणित काँग्रेस व आघाडीने मांडले; परंतु बविआची मदार नालासोपारा, वसई अशा शहरी पॉकेटस्वर होती तर वनगांचा भर आदिवासी मतदारांवर होता. पालघर नगरपालिका निवडणुकीत बविआच्या २१ उमेदवारांचे जप्त झालेले डिपॉझिट आणि वसई विधानसभा मतदारसंघात बबिआचा झालेला पराभव तिथे झालेला शिवसेनेच्या विवेक पंडित यांचा विजय याबाबी बबिआचा घटता प्रभाव स्पष्ट करणार्‍या होत्या. त्यामुळे अधिक सावध अशी व्यूहरचना करण्यावर बविआने भर दिला नाही, तर दामू शिंगडा यांनी पुकारलेले बंड व श्रेष्ठींचा आदेश धुडकावून त्यांचा पुत्र सचिन याने माघारीची मुदत टळून गेल्यानंतर ही उमेदवारी कायम ठेवणे, त्यातून मतदारांना गेलेला चुकीचा संदेश या सगळ्याची किंमत आघाडीला मोजावी लागली. येथे राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने बविआच्या उमेदवाराच्या पाठीशी सर्व ताकद उभी केलीच नाही. एकीकडे अशी अवस्था असताना दुसरीकडे वनगांचीही अवस्था फारशी काही चांगली नव्हती. पक्षाचा एकही मोठा नेता प्रचारास आलेला नाही. पक्षाने पाठविलेला निधी प्रमुख मातब्बरांनी पोहचूच दिला नाही. अशा स्थितीत त्यांची ही नौका दोलायमान होती. परंतु, मतदार मोदी लाटेवर स्वार झाले आणि त्यांनी वनगांना पुन्हा एकदा खासदारकी बहाल करणारा कौल दिला. यावरून आघाडीला आणि काँग्रेस व राष्ट्रवादीला येथे संघटन बळकट करण्याचा संदेश मतदारांनी दिला आहे हे स्पष्ट होते.