शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

अखेर आर्चीच्या कलागुणांना न्याय

By admin | Updated: June 16, 2017 05:00 IST

सैराट चित्रपटातील दमदार अभिनयाच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या रिंकू राजगुरू उर्फ आर्चीच्या अभिनयाला पुणे बोर्डाकडून न्याय मिळणार आहे.

- दीपक जाधव। लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सैराट चित्रपटातील दमदार अभिनयाच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या रिंकू राजगुरू उर्फ आर्चीच्या अभिनयाला पुणे बोर्डाकडून न्याय मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती ठरल्याबद्दल कलागुणांसाठी देण्यात येणारे गुण तिला देण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाकडून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर कलागुणांचा शाळेकडून प्रस्ताव पाठवूनही तांत्रिक कारणास्तव त्यांचे गुण न मिळालेल्या इतर विद्यार्थ्यांनाही त्याचे गुण देण्यात येणार आहेत. अभिनयातला राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळवूनही केवळ तांत्रिक कारणास्तव अभिनायासाठी दिले जाणारे कलागुण रिंकू राजगुरूला देण्यात आले नसल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले होते. यामुळे राज्य मंडळाकडून कलागुण देण्यासाठी अवलंबण्यात आलेल्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. एकीकडे स्थानिक पातळीवरच्या स्पर्धेमध्ये प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांना कलागुणांची खैरात करताना दुसरीकडे अभिनयातल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेतीला मात्र कलागुणांपासून वंचित राहावे लागले होते. राज्य शासनाने विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला, अभिनय आदी क्षेत्रांत प्रावीण्य मिळविणाऱ्यांना दहावीच्या परीक्षेत ५ ते २५ गुणांपर्यंत वाढीव गुण देण्याचा निर्णय घेतला. रिंकू राजगुरूने १७ नंबरचा फॉर्म भरून बहिस्थ विद्यार्थी म्हणून दहावीची परीक्षा दिली होती. तिला चित्रकलेतील प्रावीण्याबद्दल त्याचे ५ गुण बोर्डाकडून दिले गेले. मात्र अभिनयाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळविल्याबद्दलचे १० गुण देण्यात आले नाहीत. ती बहिस्थ विद्यार्थी असल्याने तिला राष्ट्रीय पुरस्काराचे गुण देण्यात आले नसल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र ती बहिस्थ विद्यार्थी असताना तिला चित्रकलेचे ५ गुण देण्यात आले मात्र राष्ट्रीय पारितोषिकासाठी मात्र वेगळा निकष वापरण्यात आला होता. बोर्डाकडून एकाच विद्यार्थ्याला कलागुण देण्यासाठी परस्परविरोधी कार्यपद्धती अवलंबण्यात आली होती. वस्तुत: राज्य शासनाच्या आदेशामध्ये बहिस्थ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पुरस्काराचे कलागुण देण्यात येऊ नयेत असा कुठेही उल्लेख नसताना बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर याबाबतचा निर्णय घेतला होता. तांत्रिक मुद्द्यांमुळे वंचितांनाही न्याय...विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याचे धोरण शासनाकडून आखले गेले. त्यानुसार योग्य ती प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांना राज्य मंडळाकडून गुण दिले जाणे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात मंडळाकडून तांत्रिक मुद्द्यांवर बोट ठेवून अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या गुणांपासून वंचित ठेवल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला. - रिंकू राजगुरू प्रमाणेच तांत्रिकेतच्या मुद्द्यांवर कलागुण देण्याचा निर्णय राखून ठेवलेल्या इतर विद्यार्थ्यांनाही कलागुण देण्यात येणार असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.सैराट चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरू हिस राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल कलागुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल.- बबन दहिफळे, अध्यक्ष, राज्य मंडळ, पुणे विभाग