शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अखेर आर्चीच्या कलागुणांना न्याय

By admin | Updated: June 16, 2017 05:00 IST

सैराट चित्रपटातील दमदार अभिनयाच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या रिंकू राजगुरू उर्फ आर्चीच्या अभिनयाला पुणे बोर्डाकडून न्याय मिळणार आहे.

- दीपक जाधव। लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सैराट चित्रपटातील दमदार अभिनयाच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या रिंकू राजगुरू उर्फ आर्चीच्या अभिनयाला पुणे बोर्डाकडून न्याय मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती ठरल्याबद्दल कलागुणांसाठी देण्यात येणारे गुण तिला देण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाकडून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर कलागुणांचा शाळेकडून प्रस्ताव पाठवूनही तांत्रिक कारणास्तव त्यांचे गुण न मिळालेल्या इतर विद्यार्थ्यांनाही त्याचे गुण देण्यात येणार आहेत. अभिनयातला राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळवूनही केवळ तांत्रिक कारणास्तव अभिनायासाठी दिले जाणारे कलागुण रिंकू राजगुरूला देण्यात आले नसल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले होते. यामुळे राज्य मंडळाकडून कलागुण देण्यासाठी अवलंबण्यात आलेल्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. एकीकडे स्थानिक पातळीवरच्या स्पर्धेमध्ये प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांना कलागुणांची खैरात करताना दुसरीकडे अभिनयातल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेतीला मात्र कलागुणांपासून वंचित राहावे लागले होते. राज्य शासनाने विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला, अभिनय आदी क्षेत्रांत प्रावीण्य मिळविणाऱ्यांना दहावीच्या परीक्षेत ५ ते २५ गुणांपर्यंत वाढीव गुण देण्याचा निर्णय घेतला. रिंकू राजगुरूने १७ नंबरचा फॉर्म भरून बहिस्थ विद्यार्थी म्हणून दहावीची परीक्षा दिली होती. तिला चित्रकलेतील प्रावीण्याबद्दल त्याचे ५ गुण बोर्डाकडून दिले गेले. मात्र अभिनयाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळविल्याबद्दलचे १० गुण देण्यात आले नाहीत. ती बहिस्थ विद्यार्थी असल्याने तिला राष्ट्रीय पुरस्काराचे गुण देण्यात आले नसल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र ती बहिस्थ विद्यार्थी असताना तिला चित्रकलेचे ५ गुण देण्यात आले मात्र राष्ट्रीय पारितोषिकासाठी मात्र वेगळा निकष वापरण्यात आला होता. बोर्डाकडून एकाच विद्यार्थ्याला कलागुण देण्यासाठी परस्परविरोधी कार्यपद्धती अवलंबण्यात आली होती. वस्तुत: राज्य शासनाच्या आदेशामध्ये बहिस्थ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पुरस्काराचे कलागुण देण्यात येऊ नयेत असा कुठेही उल्लेख नसताना बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर याबाबतचा निर्णय घेतला होता. तांत्रिक मुद्द्यांमुळे वंचितांनाही न्याय...विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याचे धोरण शासनाकडून आखले गेले. त्यानुसार योग्य ती प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांना राज्य मंडळाकडून गुण दिले जाणे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात मंडळाकडून तांत्रिक मुद्द्यांवर बोट ठेवून अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या गुणांपासून वंचित ठेवल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला. - रिंकू राजगुरू प्रमाणेच तांत्रिकेतच्या मुद्द्यांवर कलागुण देण्याचा निर्णय राखून ठेवलेल्या इतर विद्यार्थ्यांनाही कलागुण देण्यात येणार असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.सैराट चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरू हिस राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल कलागुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल.- बबन दहिफळे, अध्यक्ष, राज्य मंडळ, पुणे विभाग