शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

५९ दिवसांच्या पायी वारीनंतर पालखी सोहळ्याची सांगता!

By admin | Updated: August 10, 2016 00:39 IST

माहेरी भक्तीभावात भव्य स्वागत: मंदिरातील रिंगण सोहळा नेत्रांचे पारणे फेडणारा!

गजानन कलोरे शेगाव (जि.बुलडाणा), दि. ९: पंढरपूर येथून श्री गजानन महाराजांच्या पालखीचे ९ ऑगस्ट रोजी येथे आगमन झाले. श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले.महाविद्यालयाच्या प्रांगणात श्री गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष डॉ.रमेशचंद्र डांगरा यांच्याहस्ते आरती करण्यात आली. यावेळी निळकंठदादा पाटील, श्रीकांतदादा पाटील, शरद शिंदे, तहसीलदार गणेश पवार, मुख्याधिकारी अतुल पंत, एसडीओ प्रभाकर बेंडे, नारायणराव पाटील, गोविंदराव कलोरे, अशोकराव देशमुख, विश्‍वेश्‍वर त्रिकाळ, शेगाव अर्बनचे अध्यक्ष अरुण चांडक, राजेंद्र शेगोकार, माजी आ. विजयराज शिंदे, प्रकाश देशमुख, कमलाकर काठोळे, राजेंद्र शेगोकार आदी उपस्थित होते.श्रींची पालखी महाविद्यालय परिसरात पोहचल्यानंतर वारकर्‍यांना भेट वस्तू देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर निळकंठदादा पाटील यांनी श्रींच्या रजतमुखवट्याचे पूजन केले. शेगाव शहराच्या मुख्य मार्गाने पालखी मिरवणुकीला दु. २ वा. सुरुवात करण्यात आली. श्रींच्या पालखीच्या स्वागतासाठी मुख्य मार्गावर ठिक़ठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. श्रींच्या पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. सायंकाळी पालखी मंदिरात पोहचली.यावेळी कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या उपस्थित श्रींच्या रजतमुखवट्याचे पूजन व महाआरती विश्‍वस्त निळकंठदादा पाटील यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी वारीत सहभागी टाळकर्‍यांचा रिंगन सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी शेगावसह बाहेरगावच्या भक्तांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती.खामगावात स्वागतसंत गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी खामगाव येथून शेगावकडे प्रस्थान झाले. यावेळी लाखो भाविकांनी श्रीेंचे दर्शन घेतले. संत गजानन महाराजांच्या पालखीने ११ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान केले होते. भगवान विठ्ठलाचे आषाढी एकादशीला दर्शन घेवून ही पालखी परतीच्या मार्गाला लागली. दरम्यान, दोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर श्रींची पालखी सोमवारी सकाळी खामगावात पोहोचली. मंगळवारी पहाटे ५ वाजता श्रींच्या पालखी शेगावकडे मार्गस्थ झाली. भाविकांनी यावेळी खामगाव ते शेगाव माउलींसोबत पायी वारी केली. पालखी सोहळ्यात स्वतंत्र विदर्भाचा गजर!स्वतंत्र विदर्भाचे महत्व पटवून देण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या विदर्भ माझा पक्षाकडून मंगळवारी श्रींच्या पालखी सोहळ्यात वेगळ्या विदर्भाचा गजर करण्यात आला.देशातील सत्तेचे राजकारण करणार्‍या काँगेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी वैदर्भीय जनतेचा विश्‍वासघात केला आहे. त्यामुळे आता या पक्षांवर जनतेचा विश्‍वास राहिलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर हा नवीन पक्ष वैदर्भिय जनतेच्या विश्‍वासास पात्र ठरेल असा प्रयत्न आम्ही करू ही ग्वाही देत वेगळा विदर्भ झालाच पाहिजे यासाठी मंगळवारी विदर्भ माझा पक्षाचे नागपूर जिल्हाध्यक्ष नाना ठाकरे आणि विदर्भ सरचिटणीस मंगेश तेलंग यांनी खामगाव येथून शेगावकडे येणार्‍या भक्तांना वेगळ्या विदर्भाच्या टोप्या घातल्या. सायंकाळपर्यंत तीन हजार टोप्यांचे वितरण यावेळी करण्यात आले. त्यानंतर शहरातील ऑटो आणि चौकाचौकात स्टीकर चिटकविण्यात आले.