शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

तब्बल ३९२ वर्षांनंतर झाली ‘त्या’ गावात जत्रा

By सचिन खुटवळकर | Updated: March 3, 2019 00:57 IST

सातेरी देवीचा जागर : ग्रामस्थांची एकजूट, सांस्कृतिक ठेव्याचे पुनरुज्जीवन

सचिन खुटवळकर/पणजीगावातील जत्रा बंद पडण्याचे प्रकार कोकण-गोव्यात काही नवे नाहीत. अनेक गावात मानपानावरून किंवा धार्मिक कारणांमुळे अनेक वर्षे जत्रा होत नाहीत. नंतर सामंजस्याची भूमिका घेऊन ग्रामस्थ पुनश्च जत्रा सुरू करतात, असाही अनुभव बऱ्याचदा येतो. कोकणात असाच एक गाव आहे, जिथे तब्बल ३९२ वर्षांनंतर जत्रा भरली. दशावतारी आले, ‘कालोत्सव’ झाला आणि गावच्या सांस्कृतिक कोंदणाला आणखी एक पैलू लाभला.ही कहाणी आहे मोर्ले गावाची. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यातील हा गाव. श्री सातेरी देवी पंचायतन हे इथले देवस्थान. गोव्याच्या सीमेपासून अवघ्या २२ किमी. अंतरावर असलेल्या या गावातील बुजूर्गांनाही कधी जत्रा झाल्याचे आपल्या बालपणात पाहिल्याचे, ऐकल्याचे स्मरत नाही. इतकेच नव्हे, तर देवस्थानशी निगडित काही संदर्भही काळाच्या ओघात लुप्त झाले होते. श्रीराम नवमी, वार्षिक हरिनाम सप्ताह, नवरात्रोत्सव, धालोत्सव, शिमगोत्सव असा प्रगल्भ सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या गावच्या अनेक पिढ्या गेल्या, त्या जत्रा होत नसल्याची वेदना उरात बाळगूनच. परंतु सध्याच्या पिढीने एक निर्धार केला, तो म्हणजे देवस्थानाशी निगडित जुने संदर्भ शोधायचे आणि खंडित झालेली धार्मिक कार्ये पुनश्च सुरू करायची.श्री सातेरी देवी देवस्थान कमिटी या कामी अग्रेसर राहिली. सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेतले गेले. कौल, प्रसाद या पारंपरिक धार्मिक रिवाजांचा आधार घेतला. हे कार्य करण्यात वाकबगार असणाऱ्या बांदा येथील एका जाणकाराने त्यासाठी सहकार्य केले. त्यातून एक-एक ऐतिहासिक संदर्भ जुळत गेला आणि देवस्थानशी निगडित अनेक बाबी उलगडू लागल्या. जत्रेची परंपरा खंडित होण्याचा कालावधी याच आधारे शोधला असता, तो ३९२ वर्षे असल्याचे स्पष्ट झाले. याच दरम्यान मंदिर प्राकारात असलेल्या पाषाणदेवतांचे महत्त्वही अधोरेखित झाले व ग्रामस्थांनी अथक परिश्रम करून काही दिवसांतच उघड्यावर असलेल्या श्री वेताळ पंचायतन, श्री नितकारी व श्री म्हारींगण देवतांच्या पाषाणांवर छपरे चढविली. त्यानंतर गावात जत्रा करण्यास अनुमती देणारा देवीचा ‘कौल’ मिळाला. मात्र धार्मिक संकेतानुसार, ग्रामस्थांनी जत्रा होईपर्यंत शाकाहारी भोजन व मद्यसेवन त्याज्य करणे आवश्यक होते. तब्बल ४५ दिवस सर्व ग्रामस्थांनी ही ‘पाळणूक’ केली.अखेर शनिवार दि. ९ फेब्रुवारी हा दिवस उजाडला. मंदिराचा आसमंत विद्युत रोशणाईने झगमगून गेला. गावात खेळण्यांची, खाजाची दुकाने आली. हॉटेलवाले, फूल विक्रेते, इतर दुकानदारांनी डेरा टाकला. लेकी माहेरी आल्या. मुंबईकर चाकरमानी कुटुंबासह दाखल झाले. गाव गजबजला. सायंकाळी दशावतारी कंपनी आली. हजारो भाविकांनी मंदिराला भेट दिली. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावात वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. तब्बल ३९२ वर्षांनी मध्यरात्री मंदिराभोवती अवसारी पुरुषांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात देवीची मानाची तळी फिरविण्यात आली. नंतर दशावतारी नाटक झाले व पहाटे दहीकाल्याने जत्रेची सांगता झाली.

शिवलिंगाचा २१ दिवसांत जीर्णोद्धार; उद्या महाशिवरात्री उत्सवश्री सातेरी मंदिराच्या उजव्या बाजूस उघड्यावर एका दगडी चौथऱ्याच्या मध्यभागी शिवलिंगाच्या आकाराचा एक दगड होता. पूर्वापार ‘लिंगाचा दगड’ म्हणून हे ठिकाण ओळखले जात असे. जत्रोत्सवासंबंधी चौकशी करताना हे ठिकाण म्हणजे काळाच्या ओघात लुप्त झालेले शिवलिंग असल्याचे निदर्शनास आले. जत्रेपूर्वी या शिवलिंगाची पुन:प्रतिष्ठापना करणे अनिवार्य होते. केवळ २१ दिवसांत मंदिर बांधणे आवश्यक असल्याने ग्रामस्थ तयारीला लागले. त्यासाठी कुडाळ येथील मूर्तिकारांना शिवलिंग, नंदी व गोमुख अशी तीन पाषाणे बनविण्याचे कार्य सोपविण्यात आले. ग्रामस्थ, महिला, युवकांनी रात्रंदिवस मेहनत करून गवंड्यांच्या मदतीने टुमदार ‘श्री लिंगेश्वर’ मंदिर उभारले. त्यानंतर जीर्ण झालेले शिवलिंग बुधवार दि. ६ फेब्रुवारी रोजी विधिवत काढून त्या जागी गुरुवार दि. ७ फेब्रुवारी रोजी नव्या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. या ठिकाणी सोमवार दि. ४ मार्च रोजी महाशिवरात्री उत्सव होणार आहे.

टॅग्स :konkanकोकण