शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

एसआरपीएफ जवानांची जिल्हा बदली आता १५ वर्षानंतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 15:45 IST

राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) जवानांना जिल्हा बदलीसाठी असलेला दहा वर्षे सेवेचा निकष बदलवून आता १५ वर्षे करण्यात आला आहे.

राजेश निस्ताने / ऑनलाइन लोकमत

यवतमाळ, दि. 26- राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) जवानांना जिल्हा बदलीसाठी असलेला दहा वर्षे सेवेचा निकष बदलवून आता १५ वर्षे करण्यात आला आहे. त्यामुळे तमाम जवानांमध्ये तीव्र रोष पहायला मिळत आहे. 

महाराष्ट्रात राज्य राखीव पोलीस दलाचे १६ गट असून त्यात सुमारे २० हजार पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. या जवानांच्या अनेक समस्या आहेत. मात्र त्या संघटितपणे मांडण्याची सोय नाही. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार ते सहन करीत आहे. एसआरपीएफमध्ये दहा वर्षे सेवा झालेल्या जवानांना जिल्हा बदली दिली जाते. राज्यात पोलीस कर्मचाºयांच्या एकूण रिक्त जागांच्या दहा टक्के जागा या जवानांसाठी राखीव ठेवल्या जातात. त्यानुसार वर्षाकाठी ३०० ते ४०० जवान जिल्हा पोलीस दलात दाखल होतात. केवळ दहा टक्केच्या कोट्यामुळे जवानांना वर्षानुवर्षे प्रतीक्षेत रहावे लागते. कित्येकदा १२ ते १४ वर्षांची सेवा होऊनही रिक्त जागांअभावी त्यांना जिल्ह्यासाठी सोडले जात नाही. दहा वर्षे सेवा हाच कालावधी खूप वाटत असताना शासनाने आता त्यात आणखी पाच वर्षांची भर घातली आहे. यापुढे एसआरपीएफमध्ये १५ वर्षे सेवा झालेल्या जवानांनाच जिल्हा बदलीवर सोडले जाणार आहे. गृहविभागाचे उपसचिव सुरेश खाडे यांच्या स्वाक्षरीने २१ आॅक्टोबर २०१६ रोजी या संबंधीचे आदेश जारी करण्यात आले. या नव्या निकषामुळे जिल्हा बदलीस पात्र जवानांची संख्या कमी होणार असली तरी तब्बल १५ वर्षे प्रतीक्षा करावी लागणार असल्याने बहुतांश जवानांमध्ये शासनाच्या या आदेशाबाबत तीव्र रोष पहायला मिळत आहे.

अखेर संभ्रम झाला दूर -

४२१ आॅक्टोबरच्या या आदेशाबाबत एसआरपीएफच्या जवानांमध्ये प्रचंड संभ्रम होता. हा आदेश खोटा असावा असे मानले जात होते. परंतु ‘लोकमत’ने गृह मंत्रालयाच्या पोल-५ (ब) सोबत संपर्क करून खातरजमा करून घेतली. हा आदेश खरा असल्याचे उपसचिव सुरेश खाडे यांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. 

याचिकेमुळे उगविला सूड -

दरवर्षी कोट्यातील दहा टक्के जागानुसार जिल्हा बदली होत नाही, असा आरोप करीत एसआरपीएफ गट क्र.२ च्या (पुणे) नितीन व काही जवानांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी उपमहानिरीक्षक विजयसिंह जाधव यांनी दरवर्षी दहा टक्के नियमित जिल्हा बदली केली जाईल, असे शपथपत्र दाखल केले होते. परंतु न्यायालयाच्या या निर्णयावरून तीन वर्षे लोटण्यापूर्वीच शासनाने जिल्हा बदलीचा निकष परस्परच  बदलविला. हा नवा आदेश म्हणजे याचिकेमुळे गृहमंत्रालयाने उगविलेला सूड असल्याची संतप्त प्रतिक्रिया या जवानांमधून व्यक्त होत आहे.