शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जाहिराती, डिजिटल मीडियाचा खुबीने वापर

By admin | Updated: February 25, 2017 04:49 IST

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बरोबरीने जागा जिंकण्याची किमया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने साधली.

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बरोबरीने जागा जिंकण्याची किमया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने साधली. हे करताना भाजपाने आपली पूर्ण शक्ती तर पणाला लावलीच; पण या विजयात जाहिरातींचा अत्यंत कौशल्याने केलेल्या वापराचाही मोठा वाटा होता. मुंबईमध्ये आतापर्यंत ६५ जागा लढविलेल्या भाजपाने या वेळी तब्बल १९४ जागा लढविल्या. त्यामुळे १३१ वॉर्ड असे होते की जिथे भाजपा पहिल्यांदाच मैदानात उतरली होती. युती तुटल्यानंतर प्रचारासाठी २० दिवसदेखील हाती नव्हते. ही बाब हेरून भाजपाच्या रणनीतीकारांनी जाहिरातींचा भक्कम आधार घेतला आणि त्यांची ही खेळी यशस्वीदेखील झाली.इतक्या मोठ्या जागा लढायच्या म्हटले तर भाजपाकडे कार्यकर्त्यांचे नेटवर्क नव्हते. याबाबत शिवसेना मात्र उजवी होती. शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सेनेचे कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मोहोळ ही जमेची बाजू होती. त्यावर मात करण्याचे आव्हान भाजपासमोर होते. ही कमतरता भरून काढण्याचे काम जाहिरातींनी केले. कार्यकर्त्यांच्या पलीकडे जाऊन जाहिरातींच्या माध्यमातून परिणाम साधण्याचे काम कौशल्याने करण्यात आले. २०१२च्या महापालिका निवडणुकीत भाजपाने ६५ जागा लढविल्या आणि त्यातील ३१ जिंकल्या होत्या. या वेळी शिवसेनेशी युती नव्हती आणि शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळविण्याचे आव्हान होते. जाहिरातीचे तंत्र भाजपासाठी धावून आले. वृत्तपत्रे, चॅनेल्स, होर्डिंग्ज आणि डिजिटल मीडियातून भाजपाच्या जाहिराती मुंबईभर झळकल्या आणि मनामनात पोहोचल्या. भाजपाने लाखो मतदारांवर दोन शब्द याच माध्यमातून बिंबवले आणि एक विश्वास निर्माण केला. एक म्हणजे, ‘परिवर्तन तर होणारच’ ही टॅगलाइन. मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता उलथविली जाऊ शकते हे त्यातून बिंबविले गेले. सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासक चेहरे होतेच. त्यातच, ‘हा माझा शब्द आहे’ अशी विकासाची आणि पारदर्शक कारभाराची हमी देणारी दुसरी टॅगलाइन मुख्यमंत्र्यांच्या छबीसह वापरून सर्वत्र जाहिराती करण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री मनामनात पोहोचले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनीही भाजपाच्या यशात जाहिरातबाजीचा मोठा वाटा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आक्रमक जाहिरात मोहिमेवर केलेला मोठा खर्च आणि त्यातून सगळीकडे भाजपाचा प्रभाव निर्माण करण्याचे तंत्र भाजपाने अवलंबिले, असे त्यांनी म्हटले आहे. महापालिका निवडणुकीत जाहिरातींचा विचार करता भाजपा अव्वल तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र हात आखडता घेतला. त्यांना पराजयाची पूर्वकल्पना होती की विजयाची आसच नव्हती, असा प्रश्न त्यातून निर्माण होतो. २०१२च्या निवडणुकीत प्रभावी जाहिरातबाजीचा प्रयत्न करणारे हे दोन्ही पक्ष या वेळी त्याबाबत ढेपाळले. (विशेष प्रतिनिधी)