शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जाहिराती, डिजिटल मीडियाचा खुबीने वापर

By admin | Updated: February 25, 2017 04:49 IST

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बरोबरीने जागा जिंकण्याची किमया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने साधली.

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बरोबरीने जागा जिंकण्याची किमया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने साधली. हे करताना भाजपाने आपली पूर्ण शक्ती तर पणाला लावलीच; पण या विजयात जाहिरातींचा अत्यंत कौशल्याने केलेल्या वापराचाही मोठा वाटा होता. मुंबईमध्ये आतापर्यंत ६५ जागा लढविलेल्या भाजपाने या वेळी तब्बल १९४ जागा लढविल्या. त्यामुळे १३१ वॉर्ड असे होते की जिथे भाजपा पहिल्यांदाच मैदानात उतरली होती. युती तुटल्यानंतर प्रचारासाठी २० दिवसदेखील हाती नव्हते. ही बाब हेरून भाजपाच्या रणनीतीकारांनी जाहिरातींचा भक्कम आधार घेतला आणि त्यांची ही खेळी यशस्वीदेखील झाली.इतक्या मोठ्या जागा लढायच्या म्हटले तर भाजपाकडे कार्यकर्त्यांचे नेटवर्क नव्हते. याबाबत शिवसेना मात्र उजवी होती. शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सेनेचे कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मोहोळ ही जमेची बाजू होती. त्यावर मात करण्याचे आव्हान भाजपासमोर होते. ही कमतरता भरून काढण्याचे काम जाहिरातींनी केले. कार्यकर्त्यांच्या पलीकडे जाऊन जाहिरातींच्या माध्यमातून परिणाम साधण्याचे काम कौशल्याने करण्यात आले. २०१२च्या महापालिका निवडणुकीत भाजपाने ६५ जागा लढविल्या आणि त्यातील ३१ जिंकल्या होत्या. या वेळी शिवसेनेशी युती नव्हती आणि शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळविण्याचे आव्हान होते. जाहिरातीचे तंत्र भाजपासाठी धावून आले. वृत्तपत्रे, चॅनेल्स, होर्डिंग्ज आणि डिजिटल मीडियातून भाजपाच्या जाहिराती मुंबईभर झळकल्या आणि मनामनात पोहोचल्या. भाजपाने लाखो मतदारांवर दोन शब्द याच माध्यमातून बिंबवले आणि एक विश्वास निर्माण केला. एक म्हणजे, ‘परिवर्तन तर होणारच’ ही टॅगलाइन. मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता उलथविली जाऊ शकते हे त्यातून बिंबविले गेले. सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासक चेहरे होतेच. त्यातच, ‘हा माझा शब्द आहे’ अशी विकासाची आणि पारदर्शक कारभाराची हमी देणारी दुसरी टॅगलाइन मुख्यमंत्र्यांच्या छबीसह वापरून सर्वत्र जाहिराती करण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री मनामनात पोहोचले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनीही भाजपाच्या यशात जाहिरातबाजीचा मोठा वाटा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आक्रमक जाहिरात मोहिमेवर केलेला मोठा खर्च आणि त्यातून सगळीकडे भाजपाचा प्रभाव निर्माण करण्याचे तंत्र भाजपाने अवलंबिले, असे त्यांनी म्हटले आहे. महापालिका निवडणुकीत जाहिरातींचा विचार करता भाजपा अव्वल तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र हात आखडता घेतला. त्यांना पराजयाची पूर्वकल्पना होती की विजयाची आसच नव्हती, असा प्रश्न त्यातून निर्माण होतो. २०१२च्या निवडणुकीत प्रभावी जाहिरातबाजीचा प्रयत्न करणारे हे दोन्ही पक्ष या वेळी त्याबाबत ढेपाळले. (विशेष प्रतिनिधी)