शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
5
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
6
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
7
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
8
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
9
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
10
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
11
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
12
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
13
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
14
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
15
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
16
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
17
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
18
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
19
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
20
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."

अकरावीच्या आॅनलाइन नोंदणीचा फायदा

By admin | Updated: August 3, 2016 02:19 IST

अर्जच भरले नसल्याने प्रक्रियेपासून बाहेर राहिलेल्या ८ हजार २४३ विद्यार्थ्यांनी गेल्या दोन दिवसांत अर्ज केले आहेत.

मुंबई : अकरावीच्या आॅनलाईन नोंदणीत अर्धवट अर्ज भरलेल्या किंवा अर्जच भरले नसल्याने प्रक्रियेपासून बाहेर राहिलेल्या ८ हजार २४३ विद्यार्थ्यांनी गेल्या दोन दिवसांत अर्ज केले आहेत. सोमवार व मंगळवारी या विद्यार्थ्यांसाठी अर्ज नोंदणी करण्याची संधी उपसंचालक कार्यालयाने दिली होती. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी ४ आॅगस्टला जाहीर होणार असून ५ व ६ आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येईल.याआधी मुंबई महानगर क्षेत्रातून एकूण २ लाख २२ हजार ६२२ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. त्यातील एकूण १ लाख २३ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत प्रवेश निश्चित केलेला आहे. तर नव्याने अर्ज केलेल्या ८ हजार २४३ विद्यार्थ्यांमुळे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आत्ता २ लाख ३० हजार ८६५ च्या घरात गेली आहे. दरम्यान, अर्ज भरताना उपसंचालक कार्यालयाने याआधी जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीतील दुसऱ्या कट आॅफचे बंधन घातले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी पर्याय निवडताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी केल्या. काही विद्यार्थ्यांना मिळालेले गुण दुसऱ्या कट आॅफहून कमी होते. या गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, त्यांना अखेरची संधी ५ व ६ आॅगस्ट रोजी होणाऱ्या विशेष फेरीत मिळणार आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज केलेल्या नाहीत, त्यांनी विशेष फेरीदरम्यान अर्ज करण्याचे आवाहन उपसंचालक कार्यालयाने केले आहे. (प्रतिनिधी)>विशेष फेरीतील अर्ज वाढणारयाआधी अर्धवट अर्ज भरलेल्या किंवा चूकीचा अर्ज भरल्याने प्रवेशप्रक्रियेबाहेर राहिलेल्या विद्यार्थ्यांना सोमवार व मंगळवारी विशेष संधी देण्यात आली होती.या संधीचा फायदा ८ हजार २४३ विद्यार्थ्यांनी करून घेतला आहे. ९५९ विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्धवट अर्ज भरल्याचे निदर्शनास आले आहे.२४४ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरले असून ते कन्फर्म केलेले नाहीत.३ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी अर्ज कन्फर्म केल्यानंतर अप्रूव्ह केलेले नाहीत.३ हजार ३२४ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज अर्धवट भरलेला आहे.१,०६० विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज पूर्ण भरल्यानंतरही कन्फर्म केला नव्हता.विशेष फेरीत हजारो विद्यार्थ्यांची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.