शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या आॅनलाइन नोंदणीचा फायदा

By admin | Updated: August 3, 2016 02:19 IST

अर्जच भरले नसल्याने प्रक्रियेपासून बाहेर राहिलेल्या ८ हजार २४३ विद्यार्थ्यांनी गेल्या दोन दिवसांत अर्ज केले आहेत.

मुंबई : अकरावीच्या आॅनलाईन नोंदणीत अर्धवट अर्ज भरलेल्या किंवा अर्जच भरले नसल्याने प्रक्रियेपासून बाहेर राहिलेल्या ८ हजार २४३ विद्यार्थ्यांनी गेल्या दोन दिवसांत अर्ज केले आहेत. सोमवार व मंगळवारी या विद्यार्थ्यांसाठी अर्ज नोंदणी करण्याची संधी उपसंचालक कार्यालयाने दिली होती. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी ४ आॅगस्टला जाहीर होणार असून ५ व ६ आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येईल.याआधी मुंबई महानगर क्षेत्रातून एकूण २ लाख २२ हजार ६२२ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. त्यातील एकूण १ लाख २३ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत प्रवेश निश्चित केलेला आहे. तर नव्याने अर्ज केलेल्या ८ हजार २४३ विद्यार्थ्यांमुळे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आत्ता २ लाख ३० हजार ८६५ च्या घरात गेली आहे. दरम्यान, अर्ज भरताना उपसंचालक कार्यालयाने याआधी जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीतील दुसऱ्या कट आॅफचे बंधन घातले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी पर्याय निवडताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी केल्या. काही विद्यार्थ्यांना मिळालेले गुण दुसऱ्या कट आॅफहून कमी होते. या गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, त्यांना अखेरची संधी ५ व ६ आॅगस्ट रोजी होणाऱ्या विशेष फेरीत मिळणार आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज केलेल्या नाहीत, त्यांनी विशेष फेरीदरम्यान अर्ज करण्याचे आवाहन उपसंचालक कार्यालयाने केले आहे. (प्रतिनिधी)>विशेष फेरीतील अर्ज वाढणारयाआधी अर्धवट अर्ज भरलेल्या किंवा चूकीचा अर्ज भरल्याने प्रवेशप्रक्रियेबाहेर राहिलेल्या विद्यार्थ्यांना सोमवार व मंगळवारी विशेष संधी देण्यात आली होती.या संधीचा फायदा ८ हजार २४३ विद्यार्थ्यांनी करून घेतला आहे. ९५९ विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्धवट अर्ज भरल्याचे निदर्शनास आले आहे.२४४ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरले असून ते कन्फर्म केलेले नाहीत.३ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी अर्ज कन्फर्म केल्यानंतर अप्रूव्ह केलेले नाहीत.३ हजार ३२४ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज अर्धवट भरलेला आहे.१,०६० विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज पूर्ण भरल्यानंतरही कन्फर्म केला नव्हता.विशेष फेरीत हजारो विद्यार्थ्यांची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.