शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘दुष्काळी पॅकेज’ला प्रशासनाची हरकत

By admin | Updated: July 29, 2014 02:50 IST

राज्यात उशिरा का होईना समाधानकारक पाऊस होत असला तरी काही जिल्ह्यांमध्ये आजही दुबार पेरणीचे संकट कायम आहे.

यदु जोशी, मुंबईराज्यात उशिरा का होईना समाधानकारक पाऊस होत असला तरी काही जिल्ह्यांमध्ये आजही दुबार पेरणीचे संकट कायम आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे पॅकेज मंत्रिपातळीवर हालचाली सुरू असतानाच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र अशा पॅकेजला हरकत घेतली असल्याचे सूत्रांकडून समजते.३० जुलै रोजी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळग्रस्तांना मदतीचा निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. मात्र अशा प्रकारचे पॅकेज देण्यास प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हरकत घेतल्याचे समजते. प्रशासकीय सूत्रांनी सांगितले की, दुबार पेरणीचे संकट पहिल्यांदाच आलेले नाही. पेरणीच झालेली नसेल तर पॅकेज कोणत्या निकषांवर देणार? दुबार पेरणीही बऱ्याचदा यशस्वी होते. तेव्हा पॅकेज देण्याची घाई आता करू नये, असे मत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात मदत, पुनर्वसन विभागाच्या बैठकीत व्यक्त केले आहे. गेल्या चार वर्षांत राज्य शासनाने शेतकऱ्यांना पॅकेज देताना तब्बल १३ हजार २२३ कोटी रुपये खर्च केले. त्यातून दुष्काळावर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना फारच कमी झाल्या. आताही पुन्हा एक पॅकेज देऊन फारसे काही साधेल, असे प्रशासनाला वाटत नाही. मात्र विधानसभा तोंडावर असल्यामुळे पॅकेज देण्याची तत्परता सत्ताधारी दाखवली जात आहे. त्यासाठी कसेही करून ही मदत निकषात बसविली जाणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे.