शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

आदित्य फॉर्म्युला: सत्तेसोबत युतीही हवी, पण भाजपवर टीका ही करायची

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 14:47 IST

सेनेकडून जरी भाजपवर टीका केली जात असली तरीही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या प्रत्येक सभेत युतीचा उल्लेख करत असल्याचे दिसत आहे.

मुंबई - गेल्यावेळी विधानसभा निवडणूक वेगवेगेळे लढवत, पुढे भाजप-शिवसनेने युती करत सत्तास्थापन केली होती. तर आगामी निवडणुकीत सुद्धा युती होणार असल्याचे दोन्ही पक्षातील नेते दावे करत आहे. मात्र असे असतानाही युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे आपल्या प्रत्येक सभेतून अप्रत्यक्षरीत्या भाजपवर टीका करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सत्ता व युती हवी पण भाजपवर सुद्धा टीका करण्याची संधी सोडायची नाही. अशा आदित्यांच्या फॉर्म्युल्याची चर्चा सद्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

गेली पाच वर्ष शिवसेना ही भाजप सोबत सत्तेत होती. मात्र सत्तेत असूनही भाजपवर टीका करण्याची कोणतेही संधी सेनेन सोडली नव्हती. लोकसभा निवडणुका एकत्र लढवणारे  हे  दोन्ही पक्ष आता विधानसभा सुद्धा एकत्र लढवणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र दुसरीकडे आदित्य ठाकरे हे शेतकरी कर्जमाफी व इतर मुद्यावरून भाजपवर अप्रत्यक्षरीत्या टीका करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सत्ता हवी त्याचबरोबर भाजपसोबत युती पण करायची आणि पुन्हा त्याच भाजपवर टीका सुद्धा करायची असा आदित्यांचा फॉर्म्युला चर्चेचा विषय बनला आहे.

सेनेकडून जरी भाजपवर टीका केली जात असली तरीही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या प्रत्येक सभेत युतीचा उल्लेख करत असल्याचे दिसत आहे. जनतेचा जनादेश घेऊन जात असून पुन्हा युतीची सरकार आणणार असल्याचे ते आपल्या सभेत सांगत आहे. तर राज्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचे आकडे फडणवीस सांगत असताना, दुसरीकडे आदित्य ठाकरे मात्र अजूनही शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्ज माफीचा लाभ मिळू शकत नसल्याचा दावा करत आहे.

नुकतेच सामनामधून शिवसेनेने देशात निर्माण झालेल्या आर्थिक मंदी आणि बेरोजगारीवरून सरकारवर जोरदार टीका केली होती. मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटबंदीच्या निर्णयात असल्याची टीका सामनामधून करण्यात आली होती. त्यामुळे सत्तेत राहून सुद्धा भाजपवर टीका सेनेकडून सुरूच आहे. त्यातच आता आदित्य यांच्या नवीन फॉर्म्युल्याची जोरदार चर्चा आहे.