शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आदित्य ठाकरेंसाठी खेळपट्टी तयार; उद्यापासून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 16:49 IST

या यात्रेत आदित्य लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानणार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी आशीर्वाद देण्याचे आवाहन करणार असल्याचे समजते.

मुंबई - भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत असलेला शिवसेना पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार अशा ताकीद शिवसेना नेत्यांकडून देण्यात येत आहे. परंतु, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तरी, त्यासाठी नाव कुणाचे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यातच आता उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी राज्यात जन आशीर्वाद यात्रा काढण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरे तर शर्यतीत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आदित्य यांच्या जन आशीर्वाद यात्रेला उद्या गुरुवारपासून सुरूवात होणार आहे.

शिवसेनेचे राज्यातील संघटन आणखी मजबूत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलने आणि संवाद यात्रांवर भर देण्यात येत आहे. त्यानुसार आदित्य ठाकरे महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रा काढणार आहे. या यात्रेत आदित्य लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानणार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी आशीर्वाद देण्याचे आवाहन करणार असल्याचे समजते.

आदित्य यांची जन आशीर्वाद यात्रा सहा टप्प्यांत पार पडणार आहे. या यात्रेचा पहिला टप्पा उद्या १८ जुलैपासून सुरू होणार आहे. या अंतर्गत ते जळगावमध्ये संवाद साधणार आहेत. या टप्प्यात, १९ जुलै धुळे, २० जुलै नाशिक शहर, २१ जुलै नाशिक ग्रामीण, नगर आणि २२ जुलै नगर, श्रीरामपूर आणि शिर्डी अशी असणार आहे.

या जन आशीर्वाद यात्रेतून आदित्य ठाकरे शिवसेनेचे आणि युवा सेनेचे राज्यातील संघटन आणखी मजबूत करणार आहेत. जेणे करून भविष्यातील सक्रिय राजकारणात त्यांना याचा लाभ घेता येईल. त्यासाठी शिवसैनिक देखील सरसावले असून अनेक शिवसैनिकांना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होताना पाहायची इच्छा आहे.