शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ : आदित्य म्हणाले किती शेतकऱ्यांना मिळाली कर्जमुक्ती, एका सुरात सगळे म्हणाले, नाहीsss!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 17:11 IST

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यभर जनआशीर्वाद यात्रा काढली. त्यांची ही यात्रा आज विदर्भातील बाळापूरमध्ये दाखल झाली होती. यावेळी आदित्य यांच्या समोर शेतकऱ्यांनी कर्जमाफीवरून नाराजी व्यक्त केली. 

आदित्य ठाकरे यांनी शेतकरी समस्यांवर बोलताना कर्जमाफीचा उल्लेख केला. अर्थात शिवसेनेकडून याला कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती संबोधले जाते. आदित्य यांनी उपस्थितांना प्रश्न केला की, ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली त्यांनी हात वर करा. त्यावेळी सभेत एकच गोंधळ उडाला. सभेत उपस्थित शेतकऱ्यांनी एका सुरात आवाज काढत कर्जमुक्ती मिळाली नसल्याचे म्हटले. त्यावर आदित्य यांनी तुम्ही कर्जमुक्तीसाठी पात्र आहात का, असा प्रश्न विचारला. त्यावर सर्वांना होकार दिला. त्यानंतर आदित्य यांनी कर्जमुक्ती संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली.

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. भाजपसोबत युती करताना आपण सरसकट कर्जमाफीची बोलणी केली होती. ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली त्यांनी आपली नावे माझ्याकडे द्यावी. हाच विषय मला महाराष्ट्रभर मांडायचा असल्याचे आदित्य यांनी सांगितले.  ते पुढे म्हणाले की, पीक विम्यासंदर्भात देखील असंच झालं होतं. पीकविमा कंपन्याच पैसा कमवत होत्या. परंतु, उद्धव साहेबांनी विमा कंपन्यांवर मोर्चा काढल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यांवर विम्याचे ९६० कोटी रुपये जमा झाल्याचा दावा आदित्य यांनी यावेळी केला.