शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

व्हिडीओ : आदित्य म्हणाले किती शेतकऱ्यांना मिळाली कर्जमुक्ती, एका सुरात सगळे म्हणाले, नाहीsss!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 17:11 IST

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यभर जनआशीर्वाद यात्रा काढली. त्यांची ही यात्रा आज विदर्भातील बाळापूरमध्ये दाखल झाली होती. यावेळी आदित्य यांच्या समोर शेतकऱ्यांनी कर्जमाफीवरून नाराजी व्यक्त केली. 

आदित्य ठाकरे यांनी शेतकरी समस्यांवर बोलताना कर्जमाफीचा उल्लेख केला. अर्थात शिवसेनेकडून याला कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती संबोधले जाते. आदित्य यांनी उपस्थितांना प्रश्न केला की, ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली त्यांनी हात वर करा. त्यावेळी सभेत एकच गोंधळ उडाला. सभेत उपस्थित शेतकऱ्यांनी एका सुरात आवाज काढत कर्जमुक्ती मिळाली नसल्याचे म्हटले. त्यावर आदित्य यांनी तुम्ही कर्जमुक्तीसाठी पात्र आहात का, असा प्रश्न विचारला. त्यावर सर्वांना होकार दिला. त्यानंतर आदित्य यांनी कर्जमुक्ती संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली.

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. भाजपसोबत युती करताना आपण सरसकट कर्जमाफीची बोलणी केली होती. ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली त्यांनी आपली नावे माझ्याकडे द्यावी. हाच विषय मला महाराष्ट्रभर मांडायचा असल्याचे आदित्य यांनी सांगितले.  ते पुढे म्हणाले की, पीक विम्यासंदर्भात देखील असंच झालं होतं. पीकविमा कंपन्याच पैसा कमवत होत्या. परंतु, उद्धव साहेबांनी विमा कंपन्यांवर मोर्चा काढल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यांवर विम्याचे ९६० कोटी रुपये जमा झाल्याचा दावा आदित्य यांनी यावेळी केला.