शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
5
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
6
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
7
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
8
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
9
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
10
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
11
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
12
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
13
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
14
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
15
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
16
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
17
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
18
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
19
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
20
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

व्हिडीओ : आदित्य म्हणाले किती शेतकऱ्यांना मिळाली कर्जमुक्ती, एका सुरात सगळे म्हणाले, नाहीsss!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 17:11 IST

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यभर जनआशीर्वाद यात्रा काढली. त्यांची ही यात्रा आज विदर्भातील बाळापूरमध्ये दाखल झाली होती. यावेळी आदित्य यांच्या समोर शेतकऱ्यांनी कर्जमाफीवरून नाराजी व्यक्त केली. 

आदित्य ठाकरे यांनी शेतकरी समस्यांवर बोलताना कर्जमाफीचा उल्लेख केला. अर्थात शिवसेनेकडून याला कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती संबोधले जाते. आदित्य यांनी उपस्थितांना प्रश्न केला की, ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली त्यांनी हात वर करा. त्यावेळी सभेत एकच गोंधळ उडाला. सभेत उपस्थित शेतकऱ्यांनी एका सुरात आवाज काढत कर्जमुक्ती मिळाली नसल्याचे म्हटले. त्यावर आदित्य यांनी तुम्ही कर्जमुक्तीसाठी पात्र आहात का, असा प्रश्न विचारला. त्यावर सर्वांना होकार दिला. त्यानंतर आदित्य यांनी कर्जमुक्ती संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली.

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. भाजपसोबत युती करताना आपण सरसकट कर्जमाफीची बोलणी केली होती. ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली त्यांनी आपली नावे माझ्याकडे द्यावी. हाच विषय मला महाराष्ट्रभर मांडायचा असल्याचे आदित्य यांनी सांगितले.  ते पुढे म्हणाले की, पीक विम्यासंदर्भात देखील असंच झालं होतं. पीकविमा कंपन्याच पैसा कमवत होत्या. परंतु, उद्धव साहेबांनी विमा कंपन्यांवर मोर्चा काढल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यांवर विम्याचे ९६० कोटी रुपये जमा झाल्याचा दावा आदित्य यांनी यावेळी केला.