शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आदित्य विरुद्ध अमित!

By admin | Updated: August 13, 2015 02:51 IST

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा लवकरच अमित ठाकरे यांच्याशी राजकीय सामना होण्याची चिन्हे दिसत आहेत. मनसेमधील फेरबदलात आदित्य शिरोडकर यांना सरचिटणीसपदी बढती

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा लवकरच अमित ठाकरे यांच्याशी राजकीय सामना होण्याची चिन्हे दिसत आहेत. मनसेमधील फेरबदलात आदित्य शिरोडकर यांना सरचिटणीसपदी बढती मिळाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण युवक सेनेचे नेतृत्व राज यांचे पुत्र अमित यांच्याकडे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.उद्धव व राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येणार, अशा चर्चेला ऊत आला असतानाच अगोदर उद्धव यांनी व त्यानंतर राज यांनी या वावड्या असल्याचे स्पष्ट केल्याने येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत या ठाकरे बंधूंचा सामना होणार हे स्पष्ट दिसत आहे. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुकीपासून महापालिका निवडणुकीपर्यंत आदित्य व अमित या दोन ज्युनिअर ठाकरेंच्या नेतृत्वाखाली युवक सेनांचा सामनाही अटळ असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.आदित्य शिरोडकर हे मनसेच्या युवक सेनेचे प्रमुख होते. फेरबदलात त्यांना पक्षाचे सरचिटणीस केल्याने आता युवक सेनेचे अध्यक्षपद रिक्त झाले आहे. यापूर्वी प्रचाराच्या रोड शोमध्ये केवळ सामील झालेले व विधानसभा निवडणूक निकालानंतर मतदारसंघांत फिरून पराभवाची चाचपणी केलेले अमित ठाकरे हे लवकरच या पदाची सूत्रे स्वीकारतील.मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाचा कस लागेल. त्यानंतर कल्याण-डोंबिवली, मुंबई या महापालिकांत वडिलांच्या खांद्याला खांदा लावून ते प्रचार करतील. आदित्य हे अनेकदा टिष्ट्वटर व अन्य माध्यमातून विरोधकांचा समाचार घेत असतात. राज यांचा सामना उद्धव यांच्याशी असल्याने आदित्य यांचा सामना यापुढे अमित करतील. (विशेष प्रतिनिधी)मनसेत झाला फेरबदलमनसेच्या फेरबदलात ‘नेता’ हे नवे पद निर्माण केले गेले आहे. बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांना या पदावर नियुक्त करताना शिरीष पारकर यांचा नेत्यांच्या यादीत समावेश न झाल्याने सध्या काहीसे दूर असलेले पारकर मनसेपासून दुरावल्याची चर्चा आहे. शिल्पा सरपोतदार यांचाही या यादीत कुठेच समावेश नसल्याने तसेच त्यांचा पुत्र युवासेनेत दाखल झाल्याने त्यांनाही मनसेला सोडचिठ्ठी देण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.