शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

औद्योगिक विकासासाठी यवतमाळ हवाई मार्गाने जोडा

By admin | Updated: December 30, 2014 00:52 IST

दळणवळणाच्या पुरेशा सोई उपलब्ध नसल्याने यवतमाळ जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही, असा ठोस निष्कर्ष डॉ. विजय केळकर समितीने काढला आहे. यवतमाळला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी

केळकर समितीची शिफारस : दळणवळणाच्या सोई-सुविधांचा अडसर, ब्रॉडगेज रेल्वे लाईनचाही प्रस्ताव राजेश निस्ताने - यवतमाळ दळणवळणाच्या पुरेशा सोई उपलब्ध नसल्याने यवतमाळ जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही, असा ठोस निष्कर्ष डॉ. विजय केळकर समितीने काढला आहे. यवतमाळला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, नियमित हवाई वाहतूक सुरू करण्याची शिफारसही या समितीने केली आहे. शासनाने महाराष्ट्राच्या समतोल प्रादेशिक विकासाच्या प्रश्नांवरील अभ्यासासाठी डॉ.विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली होती. या समितीमध्ये नऊ सदस्य आहेत. नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव के.बी. बक्षी समितीचे सदस्य सचिव आहेत. या समितीने आपला अहवाल नुकताच शासनाला सादर केला. हा अहवाल विधिमंडळाच्या पटलावरही ठेवला गेला. या अहवालात यवतमाळ जिल्ह्याच्या मागासलेपणाची कारणे आणि उपाययोजना यावर ऊहापोह केला गेला आहे. दळणवळणाच्या सोईसुविधांचा अभाव हे प्रमुख कारण डॉ. केळकर समितीने यवतमाळ जिल्ह्याच्या मागासलेपणासाठी नमूद केले आहे. रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग आणि हवाई मार्ग विकसित करण्यावर भर देण्याचे त्यांनी सुचविले आहे. यवतमाळात स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा विमानतळ आहे. तेथील धावपट्टीचा आणखी विस्तार करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणासाठी त्याचा वापर करावा, आमदारांनी सरकारवर दबाव वाढवावा शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्हा विकासात माघारला आहे. जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी दळणवळणाच्या पुरेशा सोई आवश्यक आहे. त्यांच्या कमतरतेवर डॉ. विजय केळकर समितीने शिक्कामोर्तब करताना उपाययोजनाही सूचविल्या आहेत. केळकर समितीचा हा अहवाल जिल्ह्यातील आमदार-खासदारांना विकासासाठीच्या लढाईत ‘अस्त्र’ म्हणून उपयोगी पडणारा आहे. विकासाच्या मुद्यावर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरुन एकत्र येणे व त्यातूनच केंद्र व राज्यातील सरकारवर दबाव निर्माण करणे अपेक्षित आहे. केळकर समितीच्या शिफारशींचा पाठपुरावा करण्यासोबतच लोकप्रतिनिधींनी आता वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नागपूर-बोरी-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला आहे. त्याचे काम वेगाने व्हावे म्हणून आमदारांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची अपेक्षा जिल्हाभरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.