शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

औद्योगिक विकासासाठी यवतमाळ हवाई मार्गाने जोडा

By admin | Updated: December 30, 2014 00:52 IST

दळणवळणाच्या पुरेशा सोई उपलब्ध नसल्याने यवतमाळ जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही, असा ठोस निष्कर्ष डॉ. विजय केळकर समितीने काढला आहे. यवतमाळला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी

केळकर समितीची शिफारस : दळणवळणाच्या सोई-सुविधांचा अडसर, ब्रॉडगेज रेल्वे लाईनचाही प्रस्ताव राजेश निस्ताने - यवतमाळ दळणवळणाच्या पुरेशा सोई उपलब्ध नसल्याने यवतमाळ जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही, असा ठोस निष्कर्ष डॉ. विजय केळकर समितीने काढला आहे. यवतमाळला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, नियमित हवाई वाहतूक सुरू करण्याची शिफारसही या समितीने केली आहे. शासनाने महाराष्ट्राच्या समतोल प्रादेशिक विकासाच्या प्रश्नांवरील अभ्यासासाठी डॉ.विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली होती. या समितीमध्ये नऊ सदस्य आहेत. नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव के.बी. बक्षी समितीचे सदस्य सचिव आहेत. या समितीने आपला अहवाल नुकताच शासनाला सादर केला. हा अहवाल विधिमंडळाच्या पटलावरही ठेवला गेला. या अहवालात यवतमाळ जिल्ह्याच्या मागासलेपणाची कारणे आणि उपाययोजना यावर ऊहापोह केला गेला आहे. दळणवळणाच्या सोईसुविधांचा अभाव हे प्रमुख कारण डॉ. केळकर समितीने यवतमाळ जिल्ह्याच्या मागासलेपणासाठी नमूद केले आहे. रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग आणि हवाई मार्ग विकसित करण्यावर भर देण्याचे त्यांनी सुचविले आहे. यवतमाळात स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा विमानतळ आहे. तेथील धावपट्टीचा आणखी विस्तार करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणासाठी त्याचा वापर करावा, आमदारांनी सरकारवर दबाव वाढवावा शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्हा विकासात माघारला आहे. जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी दळणवळणाच्या पुरेशा सोई आवश्यक आहे. त्यांच्या कमतरतेवर डॉ. विजय केळकर समितीने शिक्कामोर्तब करताना उपाययोजनाही सूचविल्या आहेत. केळकर समितीचा हा अहवाल जिल्ह्यातील आमदार-खासदारांना विकासासाठीच्या लढाईत ‘अस्त्र’ म्हणून उपयोगी पडणारा आहे. विकासाच्या मुद्यावर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरुन एकत्र येणे व त्यातूनच केंद्र व राज्यातील सरकारवर दबाव निर्माण करणे अपेक्षित आहे. केळकर समितीच्या शिफारशींचा पाठपुरावा करण्यासोबतच लोकप्रतिनिधींनी आता वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नागपूर-बोरी-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला आहे. त्याचे काम वेगाने व्हावे म्हणून आमदारांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची अपेक्षा जिल्हाभरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.