शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कारवाई करणार, सहकारमंत्र्यांचा इशारा

By admin | Updated: June 19, 2017 17:01 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि १९ : शेतकरी कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून काही बँका कर्ज देताना असहकार्याची भूमिका घेत आहेत. या कर्जाला शासन तारण असल्याने बँकांनी काळजी करण्याचे कारण नाही, तरीही काही बँकांनी असहकार्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसून येते. अशा बँकांवर ठोस कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला.शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर १० हजारांचे अग्रीम कर्ज मंजूर करण्याबाबत सोलापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी असमर्थता दर्शवली होती. याकडे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात कर्जवाटप करण्याची ही संधी आहे. काही बँका यात राजकारण करीत आहेत. कर्जवाटपाबाबत त्यांच्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. शेतकरी प्रेमाचा इतका पुळका आला असेल तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १० लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या थकबाकीदारांची यादी फलकावर लावा, असे थेट आव्हानच राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. राज्यातील १४ जिल्हा बँका अडचणीत आहेत़ त्यामुळे कर्ज वितरणाबाबत त्यांच्यासमोर अडचणी असल्याने अशा बँकांना लीड बँक, पालक बँका जोडून देण्यात आल्या आहेत. त्यांची मदत घेऊन कर्जवाटपात या बँका पुढाकार घेऊ शकतात, अशी माहिती सहकारमंत्री देशमुख यांनी दिली. खरंच या बँका असहाय्य असतील तर विविध कार्यकारी सोसायट्या आणि शेतकरी कंपन्या कर्जवाटपात एजन्सी म्हणून काम करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे. त्यांच्या अडचणी जाणून घेऊ. त्यानंतर सोडविण्याचा प्रयत्न करु, मात्र बँकांनी कर्जवाटपाबाबत सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ----------------------------जुन्या नोटांचा निर्णय लवकरचसोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १०२ कोटी जुन्या नोटा पडून आहेत. त्या बदलून दिल्यास नवीन कर्जवाटप करणे सुलभ होईल, असे बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात बोलताना सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, जुन्या नोटांच्या बाबत नाबार्डने तीनवेळा संबंधित बँकांची तपासणी केली आहे. त्याचा अहवाल रिझर्व्ह बँकेला देण्यात आला आहे. लवकरच त्यांच्या नोटा बदलून मिळतील मात्र ही बाब सांगून त्यांना कर्जवाटप थांबवता येणार नाही, बँकांमध्ये पैसा असून, शेतकऱ्यांना देणार नसाल तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही सहकारमंत्र्यांनी जिल्हा बँकांना दिला.