शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कारवाई करणार, सहकारमंत्र्यांचा इशारा

By admin | Updated: June 19, 2017 17:01 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि १९ : शेतकरी कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून काही बँका कर्ज देताना असहकार्याची भूमिका घेत आहेत. या कर्जाला शासन तारण असल्याने बँकांनी काळजी करण्याचे कारण नाही, तरीही काही बँकांनी असहकार्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसून येते. अशा बँकांवर ठोस कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला.शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर १० हजारांचे अग्रीम कर्ज मंजूर करण्याबाबत सोलापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी असमर्थता दर्शवली होती. याकडे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात कर्जवाटप करण्याची ही संधी आहे. काही बँका यात राजकारण करीत आहेत. कर्जवाटपाबाबत त्यांच्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. शेतकरी प्रेमाचा इतका पुळका आला असेल तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १० लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या थकबाकीदारांची यादी फलकावर लावा, असे थेट आव्हानच राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. राज्यातील १४ जिल्हा बँका अडचणीत आहेत़ त्यामुळे कर्ज वितरणाबाबत त्यांच्यासमोर अडचणी असल्याने अशा बँकांना लीड बँक, पालक बँका जोडून देण्यात आल्या आहेत. त्यांची मदत घेऊन कर्जवाटपात या बँका पुढाकार घेऊ शकतात, अशी माहिती सहकारमंत्री देशमुख यांनी दिली. खरंच या बँका असहाय्य असतील तर विविध कार्यकारी सोसायट्या आणि शेतकरी कंपन्या कर्जवाटपात एजन्सी म्हणून काम करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे. त्यांच्या अडचणी जाणून घेऊ. त्यानंतर सोडविण्याचा प्रयत्न करु, मात्र बँकांनी कर्जवाटपाबाबत सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ----------------------------जुन्या नोटांचा निर्णय लवकरचसोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १०२ कोटी जुन्या नोटा पडून आहेत. त्या बदलून दिल्यास नवीन कर्जवाटप करणे सुलभ होईल, असे बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात बोलताना सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, जुन्या नोटांच्या बाबत नाबार्डने तीनवेळा संबंधित बँकांची तपासणी केली आहे. त्याचा अहवाल रिझर्व्ह बँकेला देण्यात आला आहे. लवकरच त्यांच्या नोटा बदलून मिळतील मात्र ही बाब सांगून त्यांना कर्जवाटप थांबवता येणार नाही, बँकांमध्ये पैसा असून, शेतकऱ्यांना देणार नसाल तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही सहकारमंत्र्यांनी जिल्हा बँकांना दिला.