शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

घुसखोर प्रवाशांवर कारवाई

By admin | Updated: May 2, 2015 10:24 IST

लोकलमध्ये अपंगांच्या आरक्षित डब्यात अन्य प्रवाशांची मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते. त्याचा त्रास अपंग प्रवाशांना होत असल्याने घुसखोर

मुंबई : लोकलमध्ये अपंगांच्या आरक्षित डब्यात अन्य प्रवाशांची मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते. त्याचा त्रास अपंग प्रवाशांना होत असल्याने घुसखोर प्रवाशांवर मध्य रेल्वेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आरपीएफने (रेल्वे सुरक्षा दल) विशेष संवेदना पथक स्थापन केले आहे. या पथकाकडून ९ एप्रिल ते २९ एप्रिलदरम्यान तब्बल सहा हजार घुसखोर प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.लोकलमधून अपंगांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी त्यांच्यासाठी स्वतंत्र डबा आरक्षित ठेवण्यात आला आहे. असे असूनही अन्य प्रवाशांकडून अपंगांच्या डब्यात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केली जाते. यामुळे प्रवास करताना अपंगांना मोठा त्रास तर होतोच तसेच वादही उद्भवतात. ही अन्य प्रवाशांची घुसखोरी थांबविण्यात यावी, अशी मागणी अपंग प्रवाशांकडून वारंवार रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली. त्याची दखल मध्य रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आली असून, आरपीएफच्या साहाय्याने ‘संवेदना’ पथक स्थापन करण्यात आले आहे. अशी एकूण आठ पथके असून, त्यामध्ये पाच ते सहा पोलीस आणि टीसींचा समावेश आहे. हे पथक ८ एप्रिल रोजी स्थापन केल्यानंतर ९ एप्रिलपासून मध्य रेल्वेच्या काही गर्दीच्या स्थानकांवर अपंगांच्या डब्यातील घुसखोर प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. २९ एप्रिलपर्यंत करण्यात आलेल्या या कारवाईत संवेदना पथकाकडून ६ हजार १२४ प्रवाशांना पकडण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. त्यांच्यावर टीसींकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, १९ लाख ३४ हजार ७२८ रुपये दंड वसूल केला, तर न्यायालयाकडूनही स्वतंत्रपणे दंड आकारण्यात आला असून, ४,७00 दंड वसूल केल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)