शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नऊ गावांनी उभारली अखंड श्रमदानाची गुढी

By admin | Updated: March 28, 2017 20:26 IST

ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 28 : दुष्काळातून कायमचे मुक्त होण्यासाठी मराठी नवीन वर्षानिमित्त पाणीदार करण्यासाठी पातूर तालुक्यातील नऊ ...

ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 28 : दुष्काळातून कायमचे मुक्त होण्यासाठी मराठी नवीन वर्षानिमित्त पाणीदार करण्यासाठी पातूर तालुक्यातील नऊ गावांनी अखंड श्रमदान करण्याची सामूहिक गुढी उभारली. शिर्ला येथे सरपंच रिना संजय शिरसाट यांच्या हस्ते गुढी उभारून पाण्यासाठी अभिनव संकल्प करण्यात आला.शिर्ला गावाच्या मुख्य चौकात आज सकाळी ९ वाजता जलसैनिक गावकऱ्यांच्या उपस्थितीत संकल्प गुढी उभारली. ह्यदुष्काळाशी दोन हात, दुष्काळावर करू कायमची मात अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. शिर्ला गावात गतवर्षी सुवर्ण नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या माध्यमातून केलेली जलसंधारणाची विविध कामे, त्यामुळे बदलत चाललेले शेतकरी जीवन आणि यावर्षी प्रस्तावित कामाची माहिती सरपंच रिना शिरसाट यांनी दिली. यावेळी कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते संजय शिरसाट, ग्रा.पं. सदस्य सुनील अंधारे, प्रकाश उगले, जलसैनिक इम्रान खान, हरीश कोकाटे, स्वप्निल मुळे, राजेश, प्रवीण इंगळे, रघुनाथ बोचरे, गजानन गवरे, रामकृ ष्ण खंडारे, प्रकाश इंगळे, जगन्नाथ राऊत, संजय खाडे, देवीदास बळकार, गजानन बळकार, संजय गिऱ्हे, संजय इंगळे, सचिन इंगळे, शंकर लांडे, लता अंधारे, दत्तात्रय निलखन, डिगांबर उगले, राऊत, ज्ञानदेव हिरळकार आदी उपस्थित होते. यावेळी श्रमदानातून गावाला दुष्काळमुक्त करण्याची शपथ गावकऱ्यांनी घेतली. संचालन, प्रास्ताविक संतोषकुमार गवई यांनी केले.

सामूहिक गुढी उभारून केला संकल्पपातूर तालुक्यातील शिर्ला, चिचखेड, चारमोळी, भंडारज, तांदळी, बेलुरा, अंधारसांगवी, शेकापूर, मळसूर आदी गावांमध्ये गुढीपाडव्यानिमित्त पाणी फाउंडेशनची सामूहिक गुढी उभारून ग्रामस्थांनी अखंड श्रमदान करण्याचा संकल्प केला. चारमोळी या गावात सामूहिकपणे उभारलेल्या गुढीची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील सर्वच ग्रामस्थ सहभागी झाले होते. चारमोळी या गावात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तब्बल १० खड्डे खोदून श्रमदान करण्याचा संकल्प करण्यात आला. पाणी फाउंडेशनच्या वाटर कपमुळे आमचे चारमोळी गाव एकत्र आले आहे. आजपर्यंत गावात सामूहिकपणे गुढी कधीही उभारली गेली नव्हती; परंतु वॉटर कपच्या माध्यमातून श्रमदानामुळे सर्व गाव एकत्र आले आहे.भीमाबाई हजारे, चारमोळी

https://www.dailymotion.com/video/x844utu